शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

डोळ्यांत अश्रू अन् पाण्याखाली बुडालेला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली परिसरातून वेकोलिने जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाले तयार केल्यामुळे परिसरातील गावांना नेहमीच बॅक वॉटरचा फटका बसत आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने गोवरी वसास्ती गावांसह इतर गावांना पुराचा धोका होण्याचे भाकीत महिनाभरापूर्वी  वर्तविले होते. 

ठळक मुद्देगोवरी येथील पूरग्रस्तांची व्यथा : पूरस्थितीबाबत लोकमतने वर्तविले होते भाकीत

नितीन मुसळे/प्रकाश काळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती /गोवरी : पूराची पुसटशी कल्पनाही गोवरीवासीयांना नव्हती.  वसभर मुसळधार पाऊस पडल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास गावालगतच्या नाल्याला अचानक पूर आला. क्षणार्धात पुराचे पाणी पाहता पाहता घरात शिरले. आणि गोवरीवासीयांचा संसार पुराच्या पाण्याखाली आला.  संसार सावरताना  डोळ्यांतील अश्रू अंतर्मुख करणारे होते.राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे टाकले आहे. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली परिसरातून वेकोलिने जिवंत नाल्याचे पात्र बदलून नवीन नाले तयार केल्यामुळे परिसरातील गावांना नेहमीच बॅक वॉटरचा फटका बसत आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने गोवरी वसास्ती गावांसह इतर गावांना पुराचा धोका होण्याचे भाकीत महिनाभरापूर्वी  वर्तविले होते. पुराचे पाणी गोवरी गावात शिरले आणि काही कळायच्या आत घरात शिरल्याने शेकडो कुटुंबांचा संसार  उघड्यावर आला. डोळ्यादेखत पुराचे पाणी घरात शिरत असल्याचे पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकायला लागला. घरातील अन्नधान्य, जीवन उपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले. राहत्या घरात पाच फुटांपर्यंत पाणी असल्याने अनेकांना कुटुंबातील साहित्य इतरत्र हलविण्याची दुर्दैवी वेळ आली. काही कुटुंबांनी चार पाच फूट पाण्यातून संसार पाण्याबाहेर काढत होते.   डोळ्यादेखत संसार  वाहून जात असल्याचे पाहून अनेकांच्या डोळ्यात   अश्रू तरळत होते. शेकडो कुटुंब उघड्यावर आले. शुक्रवारी गोवरी येथील सरपंच आशा उरकुडे, शिवसेना नेते बबन उरकुडे, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे, कोतवाल चंद्रशेखर मादनेलवार व गावकऱ्यांना घेऊन तलाठी सुनील रामटेके यांनी पूरग्रस्त भागातील घरांचा मोका पंचनामा केला. यावेळी अनेक पूरग्रस्त गावकऱ्यांना पाण्यात वाहून गेलेला संसार पाहून अश्रू आवरता आले नाही.

पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावीगोवरी येथील शेकडो घरात पाणी शिरल्याने कुटुंब उघड्यावर आले.गावात पुराने सर्वत्र पसरल्याने हाहाकार झाला. वेकोलीच्या दुष्परिणामांचा मोठा फटाका गावकऱ्यांना बसला. त्यामुळे शासनाने पूरग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर