शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जगाचा पोशिंदा झाला रामभरोसे !

By admin | Updated: March 22, 2015 00:01 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे.

गोवरी : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे. कधी सरकारकडून तोंडाला पाने पुसली जातात तर कधी निसर्ग कोपतो. यंदा खरीप हंगाम तर गेलाच; सोबत निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामही दिलासादायक नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंद्यावरच अन्नाविना उपाशी राहण्याची पाळी आली आहे.हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गराजाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. महागडे बि-बियाणे जमिनीत पेरणीसाठी टाकल्यावर अपुऱ्या पडलेल्या पावसाने बियाणे उमलण्याधीच करपून गेले. शेतीचे सुरुवातीचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. घरी रडणाऱ्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च करीत उसणवारीने, कर्ज काढून कसीबसी शेती पिकविली.यावर्षी कमी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. एका बॅगला एक पोते सोयाबीन, अशी शेतीची बिकट अवस्था झाली. उत्पादनाचा उतारा घटल्याने शेतीवर केलेला खर्च निघणारा नाही, अशी विपरित परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली. मात्र कुटुंबाची संपूर्ण भिस्त शेतीवर अवलंबून असल्याने पोटाचा आधार म्हणून शेती करावी लागत आहे.शेतात राबणाऱ्या मजुरांचे भाव गगनाला भिडले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना नाईलाजाने कापूस वेचणीला पाठविण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आल्याने तो काळजातील दु:ख काळजात लपवून मोठ्या हिंमतीने संघर्षाला तोंड देत जगतो आहे. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा एकही शेतकरी नेता पुढे आला नाही. निवडणूक काळात मतांचा जोगवा मागत आश्वासनाची खैरात वाटणारे राजकीय पुढारी कुठे गेले, हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा मालाला अत्यल्प दर असतानाही एकही नेता कास्तकारांच्या हितासाठी रस्त्यावर आला नाही. (वार्ताहर)