शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

जगाचा पोशिंदा झाला रामभरोसे !

By admin | Updated: March 22, 2015 00:01 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे.

गोवरी : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे. कधी सरकारकडून तोंडाला पाने पुसली जातात तर कधी निसर्ग कोपतो. यंदा खरीप हंगाम तर गेलाच; सोबत निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामही दिलासादायक नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंद्यावरच अन्नाविना उपाशी राहण्याची पाळी आली आहे.हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गराजाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. महागडे बि-बियाणे जमिनीत पेरणीसाठी टाकल्यावर अपुऱ्या पडलेल्या पावसाने बियाणे उमलण्याधीच करपून गेले. शेतीचे सुरुवातीचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. घरी रडणाऱ्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च करीत उसणवारीने, कर्ज काढून कसीबसी शेती पिकविली.यावर्षी कमी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. एका बॅगला एक पोते सोयाबीन, अशी शेतीची बिकट अवस्था झाली. उत्पादनाचा उतारा घटल्याने शेतीवर केलेला खर्च निघणारा नाही, अशी विपरित परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली. मात्र कुटुंबाची संपूर्ण भिस्त शेतीवर अवलंबून असल्याने पोटाचा आधार म्हणून शेती करावी लागत आहे.शेतात राबणाऱ्या मजुरांचे भाव गगनाला भिडले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना नाईलाजाने कापूस वेचणीला पाठविण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आल्याने तो काळजातील दु:ख काळजात लपवून मोठ्या हिंमतीने संघर्षाला तोंड देत जगतो आहे. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा एकही शेतकरी नेता पुढे आला नाही. निवडणूक काळात मतांचा जोगवा मागत आश्वासनाची खैरात वाटणारे राजकीय पुढारी कुठे गेले, हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा मालाला अत्यल्प दर असतानाही एकही नेता कास्तकारांच्या हितासाठी रस्त्यावर आला नाही. (वार्ताहर)