शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जगाचा पोशिंदा झाला रामभरोसे !

By admin | Updated: March 22, 2015 00:01 IST

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे.

गोवरी : भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा म्हणजेच अन्नदाता समजले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीवर अवकळा येत आहे. कधी सरकारकडून तोंडाला पाने पुसली जातात तर कधी निसर्ग कोपतो. यंदा खरीप हंगाम तर गेलाच; सोबत निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामही दिलासादायक नाही. त्यामुळे जगाच्या पोशिंद्यावरच अन्नाविना उपाशी राहण्याची पाळी आली आहे.हंगामाच्या सुरुवातीलाच निसर्गराजाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. महागडे बि-बियाणे जमिनीत पेरणीसाठी टाकल्यावर अपुऱ्या पडलेल्या पावसाने बियाणे उमलण्याधीच करपून गेले. शेतीचे सुरुवातीचे गणित चुकल्याने शेतकऱ्यांसमोर कर्जाचा डोंगर उभा राहिला. घरी रडणाऱ्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च करीत उसणवारीने, कर्ज काढून कसीबसी शेती पिकविली.यावर्षी कमी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातून गेला. एका बॅगला एक पोते सोयाबीन, अशी शेतीची बिकट अवस्था झाली. उत्पादनाचा उतारा घटल्याने शेतीवर केलेला खर्च निघणारा नाही, अशी विपरित परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली. मात्र कुटुंबाची संपूर्ण भिस्त शेतीवर अवलंबून असल्याने पोटाचा आधार म्हणून शेती करावी लागत आहे.शेतात राबणाऱ्या मजुरांचे भाव गगनाला भिडले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना नाईलाजाने कापूस वेचणीला पाठविण्याची वेळ जगाच्या पोशिंद्यावर आल्याने तो काळजातील दु:ख काळजात लपवून मोठ्या हिंमतीने संघर्षाला तोंड देत जगतो आहे. मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा एकही शेतकरी नेता पुढे आला नाही. निवडणूक काळात मतांचा जोगवा मागत आश्वासनाची खैरात वाटणारे राजकीय पुढारी कुठे गेले, हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा मालाला अत्यल्प दर असतानाही एकही नेता कास्तकारांच्या हितासाठी रस्त्यावर आला नाही. (वार्ताहर)