शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

समुपदेशनातून जुळले ३० जणांचे संसार

By admin | Updated: May 15, 2015 01:04 IST

पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात चालविण्यात येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्राने मागील वर्षभरात ३८६ प्रकरणात समझोता घडवून आणला आहे.

चंद्रपूर : पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात चालविण्यात येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्राने मागील वर्षभरात ३८६ प्रकरणात समझोता घडवून आणला आहे. तर ‘माझ काय चुकलं’ असे म्हणत संसार रूपी गाडा तोडण्याच्या वाटेवर असलेल्या ३० जणांना समुपदेशनातून एकत्र आणण्यात समुपदेशन कक्षाला यश आले आहे. समुपदेशनातून महिला सुरक्षा करणारे हे केंद्र महिला व कुटूंबाना आधार देणे यासोबतच महिला सहाय कक्षामार्फत अनेक युवती व महिलांना मनोधैर्य योजनेतंर्गत लाभ मिळवून देण्याचे काम करीत आहे.महिलांच्या कौटुंबिक व इतर तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात स्वतंत्र असा महिला तक्रार निवारण केंद्र कक्ष आहे. या कक्षामार्फत महिलांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येतो. सध्या चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय महिला तक्रार निवारण कक्ष आहे. बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, ब्रह्मपूरी, मूल व राजूरा या ठिकाणी अशाच प्रकारचा कक्ष प्रस्तावित आहे.या कक्षात गेल्या वर्षभरात महिलांनी विविध प्रकारच्या एक हजार तक्रारी नोंदविल्या. यापैकी ३८६ प्रकरणात समझोता करण्यात या कक्षाला यश प्राप्त झाले. तर तर ३० जणांचे संसार तुटण्यापासून वाचविण्यात आले. उर्वरीत तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी त्या त्या पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आल्या आहेत. महिला तक्रार निवारण केंद्रात आॅनलाईन तक्रारही घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाते. केवळ कार्यालयातच महिलांच्या तक्रारी स्वीकारल्या जात नाही तर महिला व मुलींमध्ये जनजागृती करण्याचे काम या कक्षामार्फत सुरू आहे. कक्षाच्या प्रमुख असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा खरसान यांनी गेल्या सहा महिण्यात ७ महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम घेऊन युवतींच्या समस्या व त्यावरील उपाय योजनाबाबत मार्गदर्शन केले. सोबतच इंटरनेटच्या माध्यमातून होणारी युवतींची फसवणूक व अभद्र व्यवहाराबाबत जागृती निर्माण करण्याचे काम सुरू आहे.तक्रारदार महिलांची व युवतींची केवळ समुपदेशन करूनच हा कक्ष थांबत नाही, तर सर्वकाही सुरळीत होईपर्यंत त्यांच्या संर्पकात सुध्दा राहतो. त्यामुळे महिला सहायता केंद्रात महिला आपल्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंदवितात. महिला व बाल कल्याण विभागातर्फे या ठिकाणी समुपदेशन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)महिला सुरक्षेला प्राधान्यमहिलावर होणाऱ्या अत्याचाराचा निपटारा करण्यासाठी महिला सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पीडित महिलांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येते. त्याचबरोबर महिला व मुलींच्या अनैतिक प्रकारास प्रतिबंध करण्याकरीता या कक्षामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रकरणांवर कक्षातर्फे उपाययोजनाहुंडाबळी, बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रतिबंध घालून उपाययोजना, कामकरी महिलांच्या लैगिक शोषणावर प्रतिबंध, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण, बालविहावर प्रतिबंध, भ्रृणहत्या रोखणे इत्यादी कामे या कक्षामार्फत सुरू आहेत. महिलांना आॅनलाईन तक्रार नोंदविण्याची सोयही समुपदेशन केंद्रामार्फत करून देण्यात आली आहे. ंमहिला तक्रार निवारण कक्षातर्फे महिलांना न्याय देण्यासोबतच कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. हा कक्ष महिलांसाठी आधार असून महिलांनी व युवतींनी आपल्या तक्रारी या कक्षास नोंदविल्यास त्यांना निश्चीत न्याय दिल्या जाईल. शाळा व महाविद्यालयीन युवतींना मार्गदर्शन करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे काम कक्षामार्फत सुरू आहे.- वर्षा खरसानपोलीस उपनिरीक्षक, कक्ष प्रमुख