शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

‘त्या’ कामगारांचे बेमुदत उपोषण सुरूच

By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST

येथून काही अंतरावर असणाऱ्या मूल येथील राजुरी स्टील अ‍ॅण्ड अलॉय लिमिटेडच्या कामगारांनी कंपनी व प्रशासनाविरूद्ध अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.

चंद्रपूर : येथून काही अंतरावर असणाऱ्या मूल येथील राजुरी स्टील अ‍ॅण्ड अलॉय लिमिटेडच्या कामगारांनी कंपनी व प्रशासनाविरूद्ध अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाचा बुधवारी तेरावा दिवस असून कामगारांचे शारीरिक वजन कमी होऊ लागले आहे. आतापर्यंत १९ कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.कामगार विभागानेच या कंपनीतील ५५ कामगारांना बेरोजगार केले, असा आरोप विदर्भ प्रहार कामगार संघटनेने केला असून आंदोलनाच्या तेराव्या दिवशीही जिल्हा प्रशासन सुस्त असल्याने या कामगारांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान, कामगारांनी आता पाणीत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्ह्यातील मूल येथील राजुरी स्टील अ‍ॅण्ड अलॉय लिमी. या कंपनी मालकाने शासनाला कोणतीही सूचना न देता अचानक कंपनी बंद केली. त्यामुळे येथील ५५ कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. विशेष म्हणजे, या कामगारांनी कंपनीत सुरू असलेला कामगार कायदा विरोधातील प्रकार उघडकीस आणला होता. काही महिन्यांपूर्वी कामगारांनी यासंदर्भात कामगार विभागाकडे एका संघटनेच्या माध्यमातून तक्रार केल्यानंतर हे प्रकरण चर्चेस आले. कामगारांचे हित जोपासत असल्याचे नाट्य करून कामगार विभागाने त््यावेळी ५५ कामगारांची प्रत्यक्ष भेट घेऊन कंपनीत सुरू असलेला प्रकार नोंदवून घेतला. एवढेच नव्हे तर त्यावेळी कंपनीसोबत येथील राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेच्या एका कामगार नेत्याने कामगारांना न्याय मिळवून देण्याचे भरीव आश्वासन दिले. त्याचवेळी या कामगारांना १५ जून २०१४ पासून कामावर घेण्याचे आश्वासन कंपनीने दिले. यासोबतच कामगारांच्या मागण्या २५ जून २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र त्या पूर्ण केल्या नाही. (शहर प्रतिनिधी)