शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

देशातील २० कोटी तरुणांना मिळणार काम

By admin | Updated: September 23, 2015 04:52 IST

देशात वाढत चाललेल्या बेरोजगारावर मात करण्यासाठी मोदी सरकारने गंभीरपणाने विचार सुरू केला असून उद्योगातून

मूल : देशात वाढत चाललेल्या बेरोजगारावर मात करण्यासाठी मोदी सरकारने गंभीरपणाने विचार सुरू केला असून उद्योगातून रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा लाभ देशातील २० कोटी तरुणांना होणार असून त्यांच्या हाताला काम मिळून ते आत्मनिर्भर करण्याचा सरकारचे प्रयत्न असल्याचे मत कें़द्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. मूल तालुका पत्रकार संघाशी ‘संवाद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, नगरसेवक मोती टहलियानी, प्रभाकर भोयर, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, प्रशांत लाडवे, अनिल संतोषवार, अनिल साखरकर, सुनील आयलनवार, नंदू रणदिवे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. अहीर म्हणाले, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एका वर्षात सात हजार कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे. खतांचे पुढील चार वर्षे भाव वाढणार नाही, असा धाडसी निर्णय सुद्धा केंद्र शासनाने घेतला आहे. देशाला ३०० लाख टन युरियाची गरज आहे. आपल्या देशात २३० टन युरिया तयार होत असून उर्वरित चीन, रशिया या देशातून आयात केला जातो. यावेळी सरकारने निमकोटेट युरियाची निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे युरियाची इतर पदार्थात भेसळ केली जाणार नाही.बेरोजगारांनी मदत करून कौशल्य विकासातून उद्योग निर्माण करण्याचा व बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. देशातील तरुणांना काम, निर्भत्सना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. शासनाने शेतकऱ्याच्या हितार्थ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निर्माण केली असून यातून शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होईल. याचबरोबर राज्य शासनाने देखील जलयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ केल्याने केंद्र व राज्य शासनाची सिंचनाची योजना शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. मात्र गरिबी हटली नाही यासाठी काँग्रेसकडे गरीबांचे धोरण आखले नव्हते. गरिबीचे मुळ कारण बेरोजगारी असल्याने बेरोजगारांना काम दिल्यास आपोआपच गरीबीचे निर्मूलन होण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार संघातर्फे संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी ना. हंसराज अहीर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)भूमी अधिग्रहण कायद्यात बदलभूमी अधिग्रहण कायदा हा १८९४ चा इंग्रजकालीन होता. त्यात बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. भाजपा सरकारने चार पट मोबदला व एकास नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सव्वा लाख भूमी अधिग्रहीत करुन लाखो कुटुंबाची तत्कालीन सरकारने लूट केल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.