शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करा

By admin | Updated: September 29, 2016 00:58 IST

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत.

बाबासाहेब वासाडे : विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकांचा सत्कारचंद्रपूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत. विविध कार्यकारी संस्थांनी आता शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. सुदैवाने आपल्या परिसरात आता सिंचनाची सोय झाली असून पतपुरवठा सुरू झाला तर त्यांचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनियुक्त संचालकांनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करावे, असे आवाहन सहकारी व शिक्षण महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.ते कृषी जीवन विकास प्रतिष्ठानच्या वतीने बल्लारपूर इंस्टिट्युट आॅफ टेक्नालॉजी येथे आयोजित विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठारीच्या नवनियुक्त संचालकांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी वरिष्ठ नेते डॉ. देवानंद गुरू, संस्थेचे सचिव विजय वासाडे, जि.प. सदस्य चंद्रकांत गुरू, प्राचार्य वासुदेव कांबळे यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. वासाडे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी इस्त्राईल येथे जाऊन डॉ. माही व कृ.जि.वि. प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत वासाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासोबत तेथील आधुनिक शेतीचा अभ्यास केला. त्या आधारावर बल्लारपूर, पोंभूर्णा, गोंडपिपरी व राजुरा येथील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. इस्त्राईल तत्वावर शेतकरी शेती करण्यास तयार असला तरी त्याला तंत्रज्ञान मिळवून देणे, पाणी देणे, पतपुरवठा करणे काळाची गरज आहे. सुदैवाने पळसागाव, आमडी उपसा सिंचन योजना ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून पूर्ण झाली. पाईप लाईनचा वापर सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे आता नुकसान होणार नाही. असे असले तरी इस्त्राईलच्या धरतीवर शेती करण्यासाठी तयार असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. उपसा योजना पूर्ण झाल्याने पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टी, दहेली व बामनी या गावातील सहा हजार एकराला सिंचनाची सोय होणार आहे. या शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अ‍ॅड. वासाडे यांनी चंद्रकांत गुरू यांचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)