शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करा

By admin | Updated: September 29, 2016 00:58 IST

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत.

बाबासाहेब वासाडे : विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकांचा सत्कारचंद्रपूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत. विविध कार्यकारी संस्थांनी आता शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. सुदैवाने आपल्या परिसरात आता सिंचनाची सोय झाली असून पतपुरवठा सुरू झाला तर त्यांचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनियुक्त संचालकांनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करावे, असे आवाहन सहकारी व शिक्षण महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.ते कृषी जीवन विकास प्रतिष्ठानच्या वतीने बल्लारपूर इंस्टिट्युट आॅफ टेक्नालॉजी येथे आयोजित विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठारीच्या नवनियुक्त संचालकांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी वरिष्ठ नेते डॉ. देवानंद गुरू, संस्थेचे सचिव विजय वासाडे, जि.प. सदस्य चंद्रकांत गुरू, प्राचार्य वासुदेव कांबळे यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. वासाडे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी इस्त्राईल येथे जाऊन डॉ. माही व कृ.जि.वि. प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत वासाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासोबत तेथील आधुनिक शेतीचा अभ्यास केला. त्या आधारावर बल्लारपूर, पोंभूर्णा, गोंडपिपरी व राजुरा येथील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. इस्त्राईल तत्वावर शेतकरी शेती करण्यास तयार असला तरी त्याला तंत्रज्ञान मिळवून देणे, पाणी देणे, पतपुरवठा करणे काळाची गरज आहे. सुदैवाने पळसागाव, आमडी उपसा सिंचन योजना ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून पूर्ण झाली. पाईप लाईनचा वापर सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे आता नुकसान होणार नाही. असे असले तरी इस्त्राईलच्या धरतीवर शेती करण्यासाठी तयार असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. उपसा योजना पूर्ण झाल्याने पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टी, दहेली व बामनी या गावातील सहा हजार एकराला सिंचनाची सोय होणार आहे. या शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अ‍ॅड. वासाडे यांनी चंद्रकांत गुरू यांचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)