शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

काम करा अन्यथा घरी बसा!

By admin | Updated: January 4, 2015 23:07 IST

जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सीईओंनी कंबर कसली आहे. गावागावांत जाऊन भेटी देणे सुरु केले आहे. या भेटीमध्ये त्यांना अनेक गावांमध्ये अधिकारी,

सीईओंनी दिला कर्मचाऱ्यांना अल्टिमेटमचंद्रपूर : जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सीईओंनी कंबर कसली आहे. गावागावांत जाऊन भेटी देणे सुरु केले आहे. या भेटीमध्ये त्यांना अनेक गावांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शौचालयांचे बांधकाम रखडल्याचे लक्षात आल्याने आता अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. ग्रामसेवकांपासून तर बिडीओंपर्यंत सर्व जण आता सीईओंच्या रडारवर आहे.मागील काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले तथा मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांनी गाव भेटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या भेटीमुळे गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मात्र कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटत आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी शासकीय कामात हयगय केली आहे. लाभार्थ्यांना योजनांचा फायदा न देता कागदोपत्री काम पूर्ण झाल्याचे दाखवून अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. आता मात्र खुद्द सीईओ गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत असल्याने कर्मचाऱ्यांचा खोडारडेपणा त्यांच्या लक्षात येत आहे. एवढेच नाही तर, ग्रामस्थ थेट अध्यक्ष, सीईओंकडे तक्रार दाखल करीत आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सीईओंनी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम दिला आहे. काम दाखवा अन्यथा कारवाई करू, असे बजावल्याने काही कर्मचाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे.दोन दिवसापूर्वी मूल तालुक्यातील गांगलवाडी, चिखली, चितेगाव, मारोडा, उश्राळा या गावांनी भेट देण्यात आली. यावेळी सलिल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, एवढेच नाही तर, त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. अंगणवाडी सेविकेसोबत संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी कार्यकारी अधिकारी( पाणी व स्वच्छता) रवींद्र मोहीते, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, मापारी,उपसभापती वलकेवार आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)