शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हवे सजग नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:39 IST

शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,.....

ठळक मुद्देगुणवंत हंगरगेकर : कृषी महोत्सवाच्या समारोपीय सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष व शेतीतज्ज्ञ गुणवंत हंगरगेकर यांनी केले. येथे आयोजित शेतकरी संघटनेच्या कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप तर प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, माजी आमदार सरोज काशीकर, पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉ. जी.एस खाजा, उद्योजक रतिलाल चव्हाण, डाँ. दाभेरे, बी. के. खाजा, बाजार समिती सभापती कवडू पोटे, उपसभापती नारायण गड्डमवार,रंभा गोठी, सतीश दाणी, उल्हास कोटमकर, तेजस्विनी कावळे, अरुण नवले, अ‍ॅड. मुरलीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे, रमेश नळे, सिंधु बारसिंगे, रविंद्र गोखरे, प्रभाकर ढवस, भाऊजी किन्नाके, अ‍ॅड. श्री निवास मुसळे, ज्योती तोटेवार, कमल वडस्कर, हरिदास बोरकुटे,नानाजी पोटे, संजय करमनकर, रवी गोखरे, आबाजी ढवस, अँड. राजेंद्र जेनेकर, सुभाष रामगिरवार, रमाकांत मालेकर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चटप म्हणाले, या महोत्सवातून शेतकºयांचे आत्मभान जागृत झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाची व शेतीसंबंधी विविध विषयांचे विचारमंथन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे शेतकरी अधिक प्रगल्भ होऊन आपल्या व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनाने बघू शकेल, असेही त्यांनी सांगितले. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीचा, सरकारी शोषणाचा, शेतमालाच्या किंमतीचा, देशावरील कर्ज व अर्थशात्राचा विषय समजून घेऊ शकले. सन्मानासाठी आता लढाईला सिद्ध होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगिले. माजी आमदार काशीकर म्हणाल्या, विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना कुणी दिसत नाही, ही उणिव भरून काढण्याची शेतकऱ्यांनी जबाबदार नेतृत्वाला पुढे नेले पाहिजे. कायद्याची जाण असणारा माणूस विधीमंडळात पाहिजे. डॉ. खाजा यांनी वेगळा विदर्भ मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे दुरापास्त असल्याचे सांगितले.प्रास्ताविक प्रभाकर दिवे, संचालन प्राचार्य अनिल ठाकूरवार यांनी केले. कपिल इद्दे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी बंडू राजुरकर, अभिजित सावंत, अनंता येरणे, पी. यु. बोंडे, आबाजी धानोरकर, नरेंद्र काकडे, बंडू माणुसमारे, हसनभाई रिझवी, दिनकर डोहे आदींसह राजुरा, कोरपना तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.जागृत शेतकऱ्यांचा सत्कारविविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे किसन अवताडे, गोसाई देरकर, रंभा नवरतन गोठी, रूखमा राठोड, संतोष आस्वले, किसन महात्मे, श्यामराव ठाणेकर, शेख खाजा, देवाजी हुलके, खुशाल सोयाम, मारोती लोहे, आबाजी धानोरकर, बाबुराव चिकटे, देविदास वारे, डॉ. मुसळे, दोरखंडे, डॉ. निरंजने, भिवसन गायकवाड, फकरु मडावी, अनिल वलादे, कुंडगीर, बाबुराव चिकटे, अंजना पेंदोर, विमल गेडाम, मुकुंद चन्ने आदींचा महोत्सवात सत्कार करण्यात आला.