शहरं
Join us  
Trending Stories
1
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
4
IND vs SA: टी२० मध्ये सुपरफास्ट ४००० धावा, तिलक वर्माचा नवा विक्रम, विराटलाही टाकलं मागं!
5
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
6
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
7
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
8
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
9
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
10
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
11
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
12
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
13
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
14
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
15
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
16
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
17
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
18
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
19
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
20
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हवे सजग नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:39 IST

शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,.....

ठळक मुद्देगुणवंत हंगरगेकर : कृषी महोत्सवाच्या समारोपीय सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष व शेतीतज्ज्ञ गुणवंत हंगरगेकर यांनी केले. येथे आयोजित शेतकरी संघटनेच्या कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप तर प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, माजी आमदार सरोज काशीकर, पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉ. जी.एस खाजा, उद्योजक रतिलाल चव्हाण, डाँ. दाभेरे, बी. के. खाजा, बाजार समिती सभापती कवडू पोटे, उपसभापती नारायण गड्डमवार,रंभा गोठी, सतीश दाणी, उल्हास कोटमकर, तेजस्विनी कावळे, अरुण नवले, अ‍ॅड. मुरलीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे, रमेश नळे, सिंधु बारसिंगे, रविंद्र गोखरे, प्रभाकर ढवस, भाऊजी किन्नाके, अ‍ॅड. श्री निवास मुसळे, ज्योती तोटेवार, कमल वडस्कर, हरिदास बोरकुटे,नानाजी पोटे, संजय करमनकर, रवी गोखरे, आबाजी ढवस, अँड. राजेंद्र जेनेकर, सुभाष रामगिरवार, रमाकांत मालेकर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चटप म्हणाले, या महोत्सवातून शेतकºयांचे आत्मभान जागृत झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाची व शेतीसंबंधी विविध विषयांचे विचारमंथन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे शेतकरी अधिक प्रगल्भ होऊन आपल्या व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनाने बघू शकेल, असेही त्यांनी सांगितले. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीचा, सरकारी शोषणाचा, शेतमालाच्या किंमतीचा, देशावरील कर्ज व अर्थशात्राचा विषय समजून घेऊ शकले. सन्मानासाठी आता लढाईला सिद्ध होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगिले. माजी आमदार काशीकर म्हणाल्या, विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना कुणी दिसत नाही, ही उणिव भरून काढण्याची शेतकऱ्यांनी जबाबदार नेतृत्वाला पुढे नेले पाहिजे. कायद्याची जाण असणारा माणूस विधीमंडळात पाहिजे. डॉ. खाजा यांनी वेगळा विदर्भ मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे दुरापास्त असल्याचे सांगितले.प्रास्ताविक प्रभाकर दिवे, संचालन प्राचार्य अनिल ठाकूरवार यांनी केले. कपिल इद्दे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी बंडू राजुरकर, अभिजित सावंत, अनंता येरणे, पी. यु. बोंडे, आबाजी धानोरकर, नरेंद्र काकडे, बंडू माणुसमारे, हसनभाई रिझवी, दिनकर डोहे आदींसह राजुरा, कोरपना तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.जागृत शेतकऱ्यांचा सत्कारविविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे किसन अवताडे, गोसाई देरकर, रंभा नवरतन गोठी, रूखमा राठोड, संतोष आस्वले, किसन महात्मे, श्यामराव ठाणेकर, शेख खाजा, देवाजी हुलके, खुशाल सोयाम, मारोती लोहे, आबाजी धानोरकर, बाबुराव चिकटे, देविदास वारे, डॉ. मुसळे, दोरखंडे, डॉ. निरंजने, भिवसन गायकवाड, फकरु मडावी, अनिल वलादे, कुंडगीर, बाबुराव चिकटे, अंजना पेंदोर, विमल गेडाम, मुकुंद चन्ने आदींचा महोत्सवात सत्कार करण्यात आला.