शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हवे सजग नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:39 IST

शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,.....

ठळक मुद्देगुणवंत हंगरगेकर : कृषी महोत्सवाच्या समारोपीय सत्रात विविध विषयांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष व शेतीतज्ज्ञ गुणवंत हंगरगेकर यांनी केले. येथे आयोजित शेतकरी संघटनेच्या कृषी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप तर प्रमुख अतिथी माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे, माजी आमदार सरोज काशीकर, पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉ. जी.एस खाजा, उद्योजक रतिलाल चव्हाण, डाँ. दाभेरे, बी. के. खाजा, बाजार समिती सभापती कवडू पोटे, उपसभापती नारायण गड्डमवार,रंभा गोठी, सतीश दाणी, उल्हास कोटमकर, तेजस्विनी कावळे, अरुण नवले, अ‍ॅड. मुरलीधर देवाळकर, निळकंठ कोरांगे, रमेश नळे, सिंधु बारसिंगे, रविंद्र गोखरे, प्रभाकर ढवस, भाऊजी किन्नाके, अ‍ॅड. श्री निवास मुसळे, ज्योती तोटेवार, कमल वडस्कर, हरिदास बोरकुटे,नानाजी पोटे, संजय करमनकर, रवी गोखरे, आबाजी ढवस, अँड. राजेंद्र जेनेकर, सुभाष रामगिरवार, रमाकांत मालेकर आदी उपस्थित होते. अ‍ॅड. चटप म्हणाले, या महोत्सवातून शेतकºयांचे आत्मभान जागृत झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाची व शेतीसंबंधी विविध विषयांचे विचारमंथन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे शेतकरी अधिक प्रगल्भ होऊन आपल्या व्यवसायाकडे नव्या दृष्टिकोनाने बघू शकेल, असेही त्यांनी सांगितले. कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीचा, सरकारी शोषणाचा, शेतमालाच्या किंमतीचा, देशावरील कर्ज व अर्थशात्राचा विषय समजून घेऊ शकले. सन्मानासाठी आता लढाईला सिद्ध होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगिले. माजी आमदार काशीकर म्हणाल्या, विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना कुणी दिसत नाही, ही उणिव भरून काढण्याची शेतकऱ्यांनी जबाबदार नेतृत्वाला पुढे नेले पाहिजे. कायद्याची जाण असणारा माणूस विधीमंडळात पाहिजे. डॉ. खाजा यांनी वेगळा विदर्भ मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणे दुरापास्त असल्याचे सांगितले.प्रास्ताविक प्रभाकर दिवे, संचालन प्राचार्य अनिल ठाकूरवार यांनी केले. कपिल इद्दे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी बंडू राजुरकर, अभिजित सावंत, अनंता येरणे, पी. यु. बोंडे, आबाजी धानोरकर, नरेंद्र काकडे, बंडू माणुसमारे, हसनभाई रिझवी, दिनकर डोहे आदींसह राजुरा, कोरपना तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.जागृत शेतकऱ्यांचा सत्कारविविध क्षेत्रात उत्तम कार्य करणारे किसन अवताडे, गोसाई देरकर, रंभा नवरतन गोठी, रूखमा राठोड, संतोष आस्वले, किसन महात्मे, श्यामराव ठाणेकर, शेख खाजा, देवाजी हुलके, खुशाल सोयाम, मारोती लोहे, आबाजी धानोरकर, बाबुराव चिकटे, देविदास वारे, डॉ. मुसळे, दोरखंडे, डॉ. निरंजने, भिवसन गायकवाड, फकरु मडावी, अनिल वलादे, कुंडगीर, बाबुराव चिकटे, अंजना पेंदोर, विमल गेडाम, मुकुंद चन्ने आदींचा महोत्सवात सत्कार करण्यात आला.