शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सोनियानगरच्या महिलांचा एल्गार

By admin | Updated: May 6, 2015 01:20 IST

शहरातील सोनियानगर मधील घनकचरा प्रकल्पा पुढील आणि बगीचाच्या प्रस्तावित जागेवर मागील अनेक दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या ...

राजुरा : शहरातील सोनियानगर मधील घनकचरा प्रकल्पा पुढील आणि बगीचाच्या प्रस्तावित जागेवर मागील अनेक दिवसांपासून वास्तव्य करणाऱ्या १०० अतिक्रमणधारकांना स्थायी पट्टे देऊन त्याचे पूनर्वसन करणार नाही तो पर्यंत श्रमिक एल्गारचा संघर्ष सुरुच राहील. प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमणधारकांचे पूर्नवसन करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी दिला. राजुरा उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी शेकडो महिलाचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा विश्रामगृह गेटवरच पोलिसानी अडविला. त्यानंतर पाच प्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. धनाड्याचे अतिक्रमण केव्हा काढणार, गरीबांच्या घरांवर बुल्डोजर चालविली, मोठ्या अतिक्रमण धारकांवर का नाही, असा सवाल त्यांनी एसडीओंना केला. अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी घनकचरा प्रकल्पापुढील अतिक्रमण धारक त्याच ठिकाणी राहतील, असे म्हणत अल्का चंद्रशेखर यांच्या सूचनेवरुन या झोपडपट्टीला ‘संघर्ष नगर’ असे नाव घोषित केले. प्रस्तावित बगीचाच्या जागेवरील अतिक्रमण धारकही तिथेच राहतील. अतिक्रमणग्रस्तांना न्याय द्या, असे म्हणत बारा मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. लघु वेतन गृहनिर्माण सहकारी संस्थेमधील बिना परवानगीने हडपलेल्या जमिनधारकांवर कारवाई करा, इंदिरानगर, सोनियानगर, रमाबाईनगर, बेघरवस्ती, चुनाभट्टी येथील नागरिकांना पट्टे द्यावे, चुनाभट्टी मधील बालवाडीसाठी आरक्षित ११ हजार फूट जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, जिल्हा मध्यवर्ती बँक, राजुराचे अतिक्रमण तोडण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. याप्रसंगी अल्काताई चंद्रशेखर, विजय सिद्धावार, संगीता गेडाम, चरणदास नगराळे, मिलिंद गड्डमवार, रंगराव कुळसंगे, महिपाल मडावी, उमेश मारशेट्टीवार, राजू डोहे, बादल बेले, मालता मडावी, तुळसाबाई खडसे, रंजिता खडसे, प्रकाश खडसे, मनप्रित सिंधू, मंदा कोटनाके उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)