शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

वाघाच्या भीतीने कापूस वेचणीसाठी महिलांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. साखरवाही परिसरात मागील चार दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. कुणी या परिसरात वाघ दिसल्याचे सांगतात तर कुणी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत असले तरी या परिसरातील नागरिकात वाघाची मोठी दहशत पसरल्याने कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील शेतात जाण्यासाठी नकार देत आहे.

ठळक मुद्देसाखरवाही, सुमठाना परिसरात वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील साखरवाही, सुमठाना परिसरात गेल्या चार दिवसांपासून वाघ आल्याच्या अफवेने नागरिकांत दहशत पसरली आहे. शेतकऱ्यांमध्ये व कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या महिला कापूस वेचणीसाठी शेतात जाण्यास नकार देत आहेत.राजुरा तालुक्यात वन्यप्राणी व मानव संघर्ष सुरू आहे. वाघाने जंगल सोडून वस्तीत धाव घेतल्याने नागरिकात मोठी दहशत पसरली आहे. साखरवाही, सूमठणा परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे शेतकºयात मोठी दहशत पसरली असून कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील कापूस वेचणीसाठी जायला तयार नाही. या परिसरात मोठया प्रमाणात जंगल असल्याने नेहमी गावालगत वन्यप्राणी येतात. आता चक्क वाघच आल्याने या परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहे. जंगलात झुडुपे मोठया प्रमाणात वाढली आहे. दिवसा येथे वन्यप्राणी राहत असल्याने शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान करण्यात येत आहे. सध्या शेतात कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. साखरवाही परिसरात मागील चार दिवसांपासून वाघ आल्याची अफवा पसरली आहे. कुणी या परिसरात वाघ दिसल्याचे सांगतात तर कुणी ही निव्वळ अफवा असल्याचे सांगत असले तरी या परिसरातील नागरिकात वाघाची मोठी दहशत पसरल्याने कापूस वेचणी करायला जाणाऱ्या महिलादेखील शेतात जाण्यासाठी नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस वेचणीसाठी मोठी पंचाईत झाली आहे. जंगल नष्ट होऊ लागल्याने वन्यप्राणी वस्तीकडे धाव घेत आहे. राजुरा तालुक्यात वन्यप्राण्यांनी मानवावर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांत मोठी दहशत पसरली आहे. कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी बाहेरून मजूर आणून कापूस वेचणी करीत आहे. परंतु साखरवाही परिसरात वाघ आल्यामुळे या परिसरात बाहेरून येणाऱ्या महिला कापूस वेचणीसाठी नकार देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कापूस वेचणीसाठी मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे वनविभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघ