शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चंद्रपूर जिल्ह्यात ११ दिवसांत दहा तर वर्षभरात ४९ व्याघ्रबळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:23 IST

सावली तालुक्यात दोन दिवसांत दोन बळी

सावली (चंद्रपूर) : कापूस काढणीकरिता गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खेडी येथे घडली. स्वरुपा प्रशांत येल्लेटीवार (४५, रा. खेडी) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, बुधवारी याच तालुक्यात एकाचा वाघाने बळी घेतला होता. याचवेळी लगतच्याच मूल तालुक्यात एका गुराख्यालाही ठार केले होते.

तालुका परिसरातील गावे जंगलालगत असल्याने हिंस्त्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यातील खेडी येथील स्वरूपा आणि सोबतच्या तीन महिला कापूस काढणीच्या कामाकरिता गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेल्या होत्या. यावेळी काम करत असताना त्यांच्या पाठीमागे दबा धरून बसलेल्या वाघाने स्वरूपा हिच्यावर हल्ला करून ठार केले. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्याने सोबतच्या महिला भयभीत होऊन आरडाओरडा करू लागल्या. त्यामुळे वाघाने मृतदेह टाकून पलायन केले.

वाघाच्या भीतीने लोकं दहशतीत, आणखी दोघांचा घेतला बळी

घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. सावली येथील वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, संतप्त गावकऱ्यांनी हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याची मागणी करत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वन विभागाने सावली पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर तातडीने हजर झाले होते. मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये व पाच लाखांचा धनादेश देण्यात आल्यानंतरच तणाव शांत झाला. यावेळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर, ठाणेदार आशिष बोरकर व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

११ दिवसांत दहा तर वर्षभरात ४९ बळी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी वाघ सध्या कर्दनकाळ बनला आहे. वाघाने मागील ११ दिवसांत दहा जणांना ठार केले आहे. ३ डिसेंबरला एकाला वाघाने ठार केल्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत तब्बल दहा जणांना वाघाने मारले आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरात वाघाने जिल्ह्यातील ४९ जणांना ठार केले आहे.

नरभक्षक वाघांना जेरबंद करा - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून, या नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करावे, अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर