शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चंद्रपूर जिल्ह्यात ११ दिवसांत दहा तर वर्षभरात ४९ व्याघ्रबळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 11:23 IST

सावली तालुक्यात दोन दिवसांत दोन बळी

सावली (चंद्रपूर) : कापूस काढणीकरिता गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खेडी येथे घडली. स्वरुपा प्रशांत येल्लेटीवार (४५, रा. खेडी) असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, बुधवारी याच तालुक्यात एकाचा वाघाने बळी घेतला होता. याचवेळी लगतच्याच मूल तालुक्यात एका गुराख्यालाही ठार केले होते.

तालुका परिसरातील गावे जंगलालगत असल्याने हिंस्त्र पशूंचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तालुक्यातील खेडी येथील स्वरूपा आणि सोबतच्या तीन महिला कापूस काढणीच्या कामाकरिता गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात गेल्या होत्या. यावेळी काम करत असताना त्यांच्या पाठीमागे दबा धरून बसलेल्या वाघाने स्वरूपा हिच्यावर हल्ला करून ठार केले. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्याने सोबतच्या महिला भयभीत होऊन आरडाओरडा करू लागल्या. त्यामुळे वाघाने मृतदेह टाकून पलायन केले.

वाघाच्या भीतीने लोकं दहशतीत, आणखी दोघांचा घेतला बळी

घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. सावली येथील वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु, संतप्त गावकऱ्यांनी हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याची मागणी करत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वन विभागाने सावली पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर तातडीने हजर झाले होते. मृतकाच्या कुटुंबाला तत्काळ २५ हजार रुपये व पाच लाखांचा धनादेश देण्यात आल्यानंतरच तणाव शांत झाला. यावेळी सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर, ठाणेदार आशिष बोरकर व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

११ दिवसांत दहा तर वर्षभरात ४९ बळी

चंद्रपूर जिल्ह्यासाठी वाघ सध्या कर्दनकाळ बनला आहे. वाघाने मागील ११ दिवसांत दहा जणांना ठार केले आहे. ३ डिसेंबरला एकाला वाघाने ठार केल्यानंतर १५ डिसेंबरपर्यंत तब्बल दहा जणांना वाघाने मारले आहे. विशेष म्हणजे, या वर्षभरात वाघाने जिल्ह्यातील ४९ जणांना ठार केले आहे.

नरभक्षक वाघांना जेरबंद करा - सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून, या नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करावे, अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर