शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

लाभार्थीच लाभाविना !

By admin | Updated: November 6, 2015 02:09 IST

शासनाच्या विशेष घटक उपयोजेनंतर्गत अनुसूचित जमाती, कोलाम व समाजातील इतर दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना

चंद्रपूर : शासनाच्या विशेष घटक उपयोजेनंतर्गत अनुसूचित जमाती, कोलाम व समाजातील इतर दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना सन २०१३ ते २०१५ या वर्षात बैलजोड्या, बैलगाडी व सिंचनासाठी विहीर, तुषार सिंचन संचाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. मात्र सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तात्पुरताच मिळाला असून बैलजोड्या व सिंचनाचे संच सावकरांकडे असल्याची माहिती आहे.आदिवासी कोलाम शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता यावे म्हणून या योजनेमध्ये शेकडो लाभार्थ्यांची निवड करुन बैलबंडी, बैलजोड्या वाटपाचा कार्यक्रम गाजावाजा करीत राबविला. मात्र अल्पावधित सदर बैलगाड्या निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड सर्वत्र झाली. सध्या बैलबंड्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोरपना तालुक्यात तांगारा, निजामगोंदी, कमलापूर, थिप्पा, बेलगाव आदी गुड्यांवर कोलाम शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच लोणी, हिरापूर, सोनुर्ली, गडचांदूर, अंतरगाव, परसोडा आदी अनेक गावात बैलजोड्यांचे वाटप करण्यात आले. मात्र सावकारी कर्ज असल्याने त्यातील अनेक बैलजोड्या सावकारांच्या घशात गेल्याचे समजते. याचबरोबर शेतात उत्पादनात वाढ व्हावी म्हणून सिंचन विहिरीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. यातही काही लाभार्थ्यांकडे विद्युत मीटर, आॅईल इंजिन नसल्याने याचा उपयोग त्यांनाच घेता आलेला नाही. तर दुसरीकडे काही विहिरींचे काम अर्धवट असल्याची ओरड शेतकरी करताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)