शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

लाभार्थीच लाभाविना !

By admin | Updated: November 6, 2015 02:09 IST

शासनाच्या विशेष घटक उपयोजेनंतर्गत अनुसूचित जमाती, कोलाम व समाजातील इतर दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना

चंद्रपूर : शासनाच्या विशेष घटक उपयोजेनंतर्गत अनुसूचित जमाती, कोलाम व समाजातील इतर दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना सन २०१३ ते २०१५ या वर्षात बैलजोड्या, बैलगाडी व सिंचनासाठी विहीर, तुषार सिंचन संचाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. मात्र सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना तात्पुरताच मिळाला असून बैलजोड्या व सिंचनाचे संच सावकरांकडे असल्याची माहिती आहे.आदिवासी कोलाम शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता यावे म्हणून या योजनेमध्ये शेकडो लाभार्थ्यांची निवड करुन बैलबंडी, बैलजोड्या वाटपाचा कार्यक्रम गाजावाजा करीत राबविला. मात्र अल्पावधित सदर बैलगाड्या निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड सर्वत्र झाली. सध्या बैलबंड्या दुरुस्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. कोरपना तालुक्यात तांगारा, निजामगोंदी, कमलापूर, थिप्पा, बेलगाव आदी गुड्यांवर कोलाम शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच लोणी, हिरापूर, सोनुर्ली, गडचांदूर, अंतरगाव, परसोडा आदी अनेक गावात बैलजोड्यांचे वाटप करण्यात आले. मात्र सावकारी कर्ज असल्याने त्यातील अनेक बैलजोड्या सावकारांच्या घशात गेल्याचे समजते. याचबरोबर शेतात उत्पादनात वाढ व्हावी म्हणून सिंचन विहिरीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. यातही काही लाभार्थ्यांकडे विद्युत मीटर, आॅईल इंजिन नसल्याने याचा उपयोग त्यांनाच घेता आलेला नाही. तर दुसरीकडे काही विहिरींचे काम अर्धवट असल्याची ओरड शेतकरी करताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)