शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण बंधारा पूर्ण होणार का ?

By admin | Updated: January 5, 2017 00:54 IST

पाण्याअभावी शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल,

लाखोंचा खर्च पाण्यात : सिंचनाअभावी शेती लागली सुकायला प्रकाश काळे गोवरी पाण्याअभावी शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, या उद्दात हेतुने शासनाने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधकाम केले. परंतु, बंधारा बांधकामाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने शेतकऱ्यांचे हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे. आज ना, उद्या बंधारा बांधकाम होईल, या आशेवर शेतकरी आहे. मात्र अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही बंधाऱ्याचे बांधकाम झालेले नाही. राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत मोठा नाला वाहतो. या नाल्यावर गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधकाम सुरू केले. बंधाऱ्याचे बांधकाम सुरू झाल्याने नाल्याच्या काठावरील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार होती. शेतीला पाणी मिळणार म्हणून शेतकऱ्यांना हरितक्रांतीचे स्वप्न पल्लवित होते. परंतु, ‘शासनाचे काम, वर्षानुवर्षे थांब’ अशीच अवस्था गोवरी येथील बंधाऱ्याची झाली. बंधाऱ्याचे बांधकाम उशीरा सुरू झाले. त्यामुळे बंधाऱ्याचा आर्थिक बजेट वाढत गेला. कंत्राटदाराने बंधाऱ्याचा बजेट वाढल्याचे कारण पुढे करीत बंधाऱ्याचे काम अर्ध्यावरच सोडले. याला तब्बल दहा-बारा वर्षाचा कालावधी उलटला आहे. परंतु, बंधारा अजूनही अखेरच्या घटका मोजत आहे. अर्धवट बंधारा बांधकामामुळे शासनाच्या लाखो रुपयाचा चुराडा झाला आहे. शासनाचा बंधारा बांधकामाचा उद्देश चांगला होता. परंतु प्रशासनाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांंनी याकडे दुर्लक्ष केल्याने लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही अडविता आला नाही. उलट बंधारा अर्धवट असल्याने प्रत्यक्षात किती बांधकाम केले, हे कळायला मार्ग नाही. बांधकामात अनेकांनी आपले खिसे गरम करून घेतले. परंतु बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी शेतपिके सुकायला लागली आहेत. मात्र आज बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी भाऊराव रणदिवे, भाऊजी लोहे, भास्कर लोहे, अनिल रणदिवे, देवराव वासाडे, अमित रणदिवे, गणपत लांडे, शंकर लांडे, मोरेश्वर रणदिवे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. तीन आमदार बदलले मात्र बंधारा अपूर्णच गोवरी नाल्यावर बंधारा बांधकाम सुरू झाल्यानंतर राजुरा विधानसभा क्षेत्राचे तीन आमदार बदलले. अनेकदा शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे बंधारा बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने दहा-बारा वर्षानंतर बंधारा अर्धवट अवस्थेत तसाच अखेरचा घटका मोजत आहे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी व परिसरातील शेतकरी, नागरिकांना पाणी मिळावे यासाठी बंधारा बांधण्यात आला. परंतु शासनाचे लाखो रुपये खर्चूनही बंधारा पूर्ण झाला नाही. त्यामुळे शेतपिके पाण्याअभावी सुकायला लागली असून बंधारा बांधकाम पूर्ण करण्यात यावे. - नागोबा लांडे अध्यक्ष बंधारा समिती गोवरी