शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

अपूर्ण बंधारा पूर्ण होणार का ?

By admin | Updated: January 5, 2017 00:54 IST

पाण्याअभावी शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल,

लाखोंचा खर्च पाण्यात : सिंचनाअभावी शेती लागली सुकायला प्रकाश काळे गोवरी पाण्याअभावी शेतीला अवकळा आली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, या उद्दात हेतुने शासनाने दहा-बारा वर्षांपूर्वी गोवरी गावालत असलेल्या नाल्यावर बंधारा बांधकाम केले. परंतु, बंधारा बांधकामाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने शेतकऱ्यांचे हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे. आज ना, उद्या बंधारा बांधकाम होईल, या आशेवर शेतकरी आहे. मात्र अनेक वर्षांचा कालावधी लोटूनही बंधाऱ्याचे बांधकाम झालेले नाही. राजुरा तालुक्यातील गोवरी गावालगत मोठा नाला वाहतो. या नाल्यावर गेल्या दहा-बारा वर्षांपूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधकाम सुरू केले. बंधाऱ्याचे बांधकाम सुरू झाल्याने नाल्याच्या काठावरील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार होती. शेतीला पाणी मिळणार म्हणून शेतकऱ्यांना हरितक्रांतीचे स्वप्न पल्लवित होते. परंतु, ‘शासनाचे काम, वर्षानुवर्षे थांब’ अशीच अवस्था गोवरी येथील बंधाऱ्याची झाली. बंधाऱ्याचे बांधकाम उशीरा सुरू झाले. त्यामुळे बंधाऱ्याचा आर्थिक बजेट वाढत गेला. कंत्राटदाराने बंधाऱ्याचा बजेट वाढल्याचे कारण पुढे करीत बंधाऱ्याचे काम अर्ध्यावरच सोडले. याला तब्बल दहा-बारा वर्षाचा कालावधी उलटला आहे. परंतु, बंधारा अजूनही अखेरच्या घटका मोजत आहे. अर्धवट बंधारा बांधकामामुळे शासनाच्या लाखो रुपयाचा चुराडा झाला आहे. शासनाचा बंधारा बांधकामाचा उद्देश चांगला होता. परंतु प्रशासनाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांंनी याकडे दुर्लक्ष केल्याने लाखो रुपये खर्च करून बंधाऱ्यात पाण्याचा एक थेंबही अडविता आला नाही. उलट बंधारा अर्धवट असल्याने प्रत्यक्षात किती बांधकाम केले, हे कळायला मार्ग नाही. बांधकामात अनेकांनी आपले खिसे गरम करून घेतले. परंतु बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. सध्या शेतीला पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याअभावी शेतपिके सुकायला लागली आहेत. मात्र आज बंधाऱ्यात पाण्याचा थेंबही नाही. त्यामुळे बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी भाऊराव रणदिवे, भाऊजी लोहे, भास्कर लोहे, अनिल रणदिवे, देवराव वासाडे, अमित रणदिवे, गणपत लांडे, शंकर लांडे, मोरेश्वर रणदिवे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. तीन आमदार बदलले मात्र बंधारा अपूर्णच गोवरी नाल्यावर बंधारा बांधकाम सुरू झाल्यानंतर राजुरा विधानसभा क्षेत्राचे तीन आमदार बदलले. अनेकदा शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे बंधारा बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने दहा-बारा वर्षानंतर बंधारा अर्धवट अवस्थेत तसाच अखेरचा घटका मोजत आहे. कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी व परिसरातील शेतकरी, नागरिकांना पाणी मिळावे यासाठी बंधारा बांधण्यात आला. परंतु शासनाचे लाखो रुपये खर्चूनही बंधारा पूर्ण झाला नाही. त्यामुळे शेतपिके पाण्याअभावी सुकायला लागली असून बंधारा बांधकाम पूर्ण करण्यात यावे. - नागोबा लांडे अध्यक्ष बंधारा समिती गोवरी