शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

भाजपाच्या इच्छाशक्तीने महापौरपदाची चुरस वाढणार

By admin | Updated: October 25, 2014 22:36 IST

केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत.

काँग्रेस विभागली तीन गटात : पुगलिया-नागरकर यांचा गट एकत्रगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरकेंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत. काँग्रेसमधील एका गटाला मदत करण्यापेक्षा असंतुष्टांच्या सहकार्याने आपलीच सत्ता स्थापण्याचे मनसुबे भाजपाच्या गोटात रचले जात असल्याने चंद्रपुरातील महापौर पदाच्या निवडणुकीत रंग भरला जाण्याची शक्यता आहे.चंद्रपूर महानगर पालिकेत काँगे्रस हा सर्वात मोठा पक्ष आहे. २६ सदस्य या पक्षाकडे आहेत. त्या पाठोपाठ भाजपाकडे १८ सदस्य असल्याने या पक्षाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेस तीन गटात विभागली आहे. विद्यमान महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी वेगळी चुल मांडल्यापासून पक्षातील अंतर्गत वातावरण ताणाताणीचे झाले आहे. आपल्या गटाकडे १० ते १२ सदस्य असल्याचा या गटाचा दावा आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे काँगे्रसच्या गटाची सर्व सुत्रे होती. मात्र रिलायन्स जीओच्या मुद्यावरून महापौरांचा गट वेगळा झाला. असे असले तरी नरेश पुगलिया यांनी मनपाच्या राजकारणातील आपली पकड घट्ट ठेवली आहे. १२ ते १५ सदस्य आपल्या गटाशी अद्यापही जुळून असल्याचा दावा या गटाकडून होत आहे.तिसरा गट माजी स्थायी समिती सभापती आणि विद्यमान महानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांचा आहे. माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया यांच्यासह पाच नगरसेवक या गटासोबत जुळून आहेत. काँग्रेस महानगर अध्यक्ष या नात्याने नागरकर यांची जबाबदारी मनपात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे ते स्वत: मनपाच्या राजकारणात सक्रिय असून नगरसेवक आहेत. त्यामुळे आपली कामगिरी त्यांना पक्षापुढे दाखवावीच लागणार आहे.राजकारणातील बेरीज-वजाबाकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर महापौर अमृतकर यांचा गट आणि भाजपा जवळ आले आहेत. अमृतकर गटाने राखी कंचर्लावार यांना भावी महापौर म्हणून पुढे केले आहे. भाजपानेही या नावावर सहमती दर्शवित या गटाला मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची मानसिकताहीे सत्तास्थापनेकडे झुकल्याने महापौरांचा गट अस्वस्थ झाला आहे. दरम्यान, तडजोडीच्या राजकारणात नंदू नागरकर आणि नरेश पुगलिया यांचा गट बराच जवळ आला आहे. या गटाच्या आजवर किमान दोन ते तीन वेळा बैठकाही झाल्या असून एकत्रित येऊन महापौरपदाची निवडणूक लढण्याची रणनिती आखली आहे. या दोन्ही गटांचे मिळून १५ नगरसेवकांचे संख्याबळ जुळले आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महापौर गटातील नगरसेवकही आपल्या संपर्कात असल्याचा दावा या गटाकडून होत असल्याने पुगलिया- नागरकर गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या गटाने अद्याप आपला महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी सोमवारनंतर संयुक्त बैठकीतून महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.