शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

वृद्ध मातासाठी प्रशासन ‘श्रावणबाळ’ ठरेल काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:36 IST

बापु, आमचा लई महिने झाले पगार आला नाही गा... जरा सांगनं त्या साईबाले, असे उद्गार काढून चक्क गालाला हात लावत मायेचा स्पर्श करणाऱ्या सत्तरीतल्या १५ ते २० वृध्द महिला आपल्या व्यथा मांडत होत्या.

कुणीही लक्ष देईना ! : मानधनासाठी वृद्ध मातांची तहसीलमध्ये पायपीट.राजकुमार चुनारकर । लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : बापु, आमचा लई महिने झाले पगार आला नाही गा... जरा सांगनं त्या साईबाले, असे उद्गार काढून चक्क गालाला हात लावत मायेचा स्पर्श करणाऱ्या सत्तरीतल्या १५ ते २० वृध्द महिला आपल्या व्यथा मांडत होत्या. त्यांच्या मायेतही एक प्रकारची अगतिकता दिसत होती. शासनाकडून मिळणाऱ्या मानधनासाठी त्यांची ही केविलवानी धडपड सुरू होती.हा प्रसंग क्रांतीभूमीतील गजबजलेल्या नेहरू चौकातील जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या जनसंपर्क कार्यालयात बघायला मिळाला आणि निराधार वृध्द महिलांना खरेच शासनाचा आधार मिळाला का, असा प्रश्न निर्माण झाला. तालुक्याच्या टोकावर असलेल्या बामनगाव येथील वृद्ध मातांचे वृद्धापकाळ निवृत्ती मानधन काही महिन्यापासुन रखडले आहे. या वृद्ध मातांनी अनेकदा तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले. शासकीय कार्यालयच ते, दप्तर दिरंगाई ठासून भरलेली. या वृद्ध मातांना त्याचीच प्रचिती आली. त्यामुळे आपले मानधन किंवा रोजची होत असलेली कुचंबना याची कैफीयत मांगण्यासाठी या वृद्धमाता गजानन बुटके यांच्याकडे पोहचल्या. बुटके यांनी महिलांची अवस्था व शासकीय लेटलतीफशाहीमुळे या वृद्ध मातांना होणाऱ्या त्रासाची कैफीयत या मातासह तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विनायक मंगर यांच्यापुढे मांडली. या २९ महिलांपैकी काही महिलांना मागील चार-पाच महिन्यांपासून श्रावणबाळ, निराधार योजनेचे मानधन मिळाले नाही तर काही मातांनी निराधार योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत. मात्र त्यांना अजूनही शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या महिलांना जीवनाच्या सायंकाळी मोठा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.अनेक मातांना त्यांच्या आप्तेष्टांनी दूर केल्याने त्यांना जगण्याचा एकमेव आधार म्हणजे शासनाचे श्रावण बाळ योजना, निराधार योजना. या योजनाचे मानधन वेळेवर जमा न झाल्यास या असंख्य महिलांना जगण्यासाठी कसरत करावी लागते. त्यांच्या थकत्या काळात कुणीच मदत करीत नाही तर शासनाच्या या योजनाच त्यांना जीवन जगण्याचे साधन ठरले आहे. मात्र बाबुगिरीमुळे अनेक वृद्ध मातांचे मानधन थकल्याने या मातांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कावड घेऊन त्यात वृद्ध मातापित्यांना ठेवत त्यांची सेवा करणाऱ्या श्रावण बाळाचा आदर्श समाजापुढे आहे. तरी अनेक वृद्ध माता-पिता उपेक्षित जिणे जगत आहेत. किमान शासन तरी त्यांच्यासाठी श्रावणबाळ ठरावे, अशी अपेक्षा आहे.