शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी वन्यप्राणी-मानव संघर्ष

By admin | Updated: May 11, 2014 23:27 IST

जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात.

चंद्रपूर : जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात. पानवठ्याचीही अशीच काहीशी स्थिती असते. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाच्या दिशेने येत असतात. यातून वन्यप्राणी हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गावाला लागून असलेले तलाव, नाल्याच्या परिसरात ठाण मांडून बसतात. गावकरी इंधनासाठी वृक्षतोड करतात. त्यांच्यासोबतच तस्करांनीही जंगलावर हात साफ करणे सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात गावाशेजारीत जंगल सपाट झाले आहे. जंंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याने तृणभक्षी प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे हिंस्त्र प्राणी गेल्या काही वर्षांपासून गावात येत आहेत. गावातील सर्व घाण गावाबाहेर फेकली जाते. बाहेरच अनेकजण शौचास बसतात. या कचर्‍याच्या परिसरात कुत्र्याचा वावर असतो. कुत्रे आणि माकड बिबट्याचे सर्वात आवडते खाद्य आहे. माकडे हाती लागत नाही. मात्र कुत्रे सहज मिळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आणि शिकारीच्या शोधात बिबटे गावाशेजारी येऊ लागले आहेत. अशुद्ध वातावरणासोबतच जंगलात लावण्यात येणार्‍या आगीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे रस्तेच बदलत चालले आहेत. आगीच्या भितीपोटी बिबटे, वाघ, गावात येतात. पाण्याचे स्त्रोतही आटायला लागतात. त्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी भटकत असतात. या भटकणार्‍या कालावधीत त्यांची गाठ कित्येकदा मानवासोबत पडते. उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुल संकलनासाठी जाणार्‍यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मानव वन्यजीव संघर्षात महत्वाचा प्राणी बिबट्या आहे. बिबट्या कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीलगत असलेल्या जंगलसदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उरीकडे असेल तिथे या प्राण्याची संख्या अधिक असते. (शहर प्रतिनिधी)