शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पाण्याअभावी वन्यप्राणी-मानव संघर्ष

By admin | Updated: May 11, 2014 23:27 IST

जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात.

चंद्रपूर : जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात. पानवठ्याचीही अशीच काहीशी स्थिती असते. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाच्या दिशेने येत असतात. यातून वन्यप्राणी हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गावाला लागून असलेले तलाव, नाल्याच्या परिसरात ठाण मांडून बसतात. गावकरी इंधनासाठी वृक्षतोड करतात. त्यांच्यासोबतच तस्करांनीही जंगलावर हात साफ करणे सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात गावाशेजारीत जंगल सपाट झाले आहे. जंंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याने तृणभक्षी प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे हिंस्त्र प्राणी गेल्या काही वर्षांपासून गावात येत आहेत. गावातील सर्व घाण गावाबाहेर फेकली जाते. बाहेरच अनेकजण शौचास बसतात. या कचर्‍याच्या परिसरात कुत्र्याचा वावर असतो. कुत्रे आणि माकड बिबट्याचे सर्वात आवडते खाद्य आहे. माकडे हाती लागत नाही. मात्र कुत्रे सहज मिळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आणि शिकारीच्या शोधात बिबटे गावाशेजारी येऊ लागले आहेत. अशुद्ध वातावरणासोबतच जंगलात लावण्यात येणार्‍या आगीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे रस्तेच बदलत चालले आहेत. आगीच्या भितीपोटी बिबटे, वाघ, गावात येतात. पाण्याचे स्त्रोतही आटायला लागतात. त्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी भटकत असतात. या भटकणार्‍या कालावधीत त्यांची गाठ कित्येकदा मानवासोबत पडते. उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुल संकलनासाठी जाणार्‍यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मानव वन्यजीव संघर्षात महत्वाचा प्राणी बिबट्या आहे. बिबट्या कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीलगत असलेल्या जंगलसदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उरीकडे असेल तिथे या प्राण्याची संख्या अधिक असते. (शहर प्रतिनिधी)