शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पाण्याअभावी वन्यप्राणी-मानव संघर्ष

By admin | Updated: May 11, 2014 23:27 IST

जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात.

चंद्रपूर : जंगलव्याप्त चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा वगळता उर्वरीत भागात जंगल विरळ आहे. विरळ जंगलातील नैसर्गिक पाण्याचे साठे फेब्रुवारी महिन्यापासून आटायला लागतात. पानवठ्याचीही अशीच काहीशी स्थिती असते. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाच्या दिशेने येत असतात. यातून वन्यप्राणी हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गावाला लागून असलेले तलाव, नाल्याच्या परिसरात ठाण मांडून बसतात. गावकरी इंधनासाठी वृक्षतोड करतात. त्यांच्यासोबतच तस्करांनीही जंगलावर हात साफ करणे सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात गावाशेजारीत जंगल सपाट झाले आहे. जंंगलतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याने तृणभक्षी प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे हिंस्त्र प्राणी गेल्या काही वर्षांपासून गावात येत आहेत. गावातील सर्व घाण गावाबाहेर फेकली जाते. बाहेरच अनेकजण शौचास बसतात. या कचर्‍याच्या परिसरात कुत्र्याचा वावर असतो. कुत्रे आणि माकड बिबट्याचे सर्वात आवडते खाद्य आहे. माकडे हाती लागत नाही. मात्र कुत्रे सहज मिळतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी आणि शिकारीच्या शोधात बिबटे गावाशेजारी येऊ लागले आहेत. अशुद्ध वातावरणासोबतच जंगलात लावण्यात येणार्‍या आगीच्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे रस्तेच बदलत चालले आहेत. आगीच्या भितीपोटी बिबटे, वाघ, गावात येतात. पाण्याचे स्त्रोतही आटायला लागतात. त्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात वन्यप्राणी भटकत असतात. या भटकणार्‍या कालावधीत त्यांची गाठ कित्येकदा मानवासोबत पडते. उन्हाळ्याच्या दिवसात मोहफुल संकलनासाठी जाणार्‍यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसाळ्यात पाळीव प्राण्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मानव वन्यजीव संघर्षात महत्वाचा प्राणी बिबट्या आहे. बिबट्या कुठल्याही परिस्थितीत स्वत:ला जुळवून घेतो. अगदी मानवी वसाहतीलगत असलेल्या जंगलसदृश अधिवासात तो राहतो. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगलव्याप्त गावालगत अस्वच्छता, घाण व उरीकडे असेल तिथे या प्राण्याची संख्या अधिक असते. (शहर प्रतिनिधी)