शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

तेलंगणासारखी ‘डीआईएस’ योजना महाराष्ट्रात का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:50 IST

तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रती एकर ४ हजार रुपये थेट आर्थिक लाभ (डायरेक्ट इन्कम सपोर्ट) या योजनेअंतर्गत रक्कम वाटपाचे काम सुरू केले. ही योजना महाराष्ट्रात का नाही, असा सवालही प्रगतीशील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा सवालपीक कर्जासाठी झिजवताहेत उंबरठे

लोकमत न्यूज नेटवर्क राजेश मडावीचंद्रपूर : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रती एकर ४ हजार रुपये थेट आर्थिक लाभ (डायरेक्ट इन्कम सपोर्ट) या योजनेअंतर्गत रक्कम वाटपाचे काम सुरू केले. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील फसलेली शेतमाल आधारभूत योजना, मनमानी वीज बिले आदी कारणांमुळे सीमावर्ती भागातील महाराष्ट्राचे शेतकरी आगामी हंगामासाठी बँकांचे उंबरठे झिजवित आहे. त्यामुळे तेलंगणासारखी ‘डीआईएस’ ही योजना महाराष्ट्रात का नाही, असा सवालही प्रगतीशील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना वर्षभर मोफत वीज देण्याची घोषणा करून अंमलबजावणी सुरू केली. याशिवाय कृषी निविष्ठांवर भरघोस सवलती देऊन शेतकऱ्यांनी आपलेसे करून घेतले. महाराष्ट्रात मात्र उलट चित्र दिसून येते. शेतमाल आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाही. आॅनलाईन नोंदणीची सक्ती करून अडचणी वाढविल्या. तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झालेत. वीज बिलांमध्येही त्रुटी असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. सीमावर्ती भागातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांचा तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांशी कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी एकत्र येतात. परिणामी, तेलंगणा सरकारने सुरू केलेली ‘डीआईएस’ योजनेची उपयोगीता पाहून महाराष्ट्र सरकार का बोध घेत नाही, असा प्रश्न विचारू लागले आहेत. मध्य प्रदेशामध्ये शेतमालास हमीभाव न देता भावांतर ही योजना सुरू केली. त्यातही गैरव्यवहार झाल्याने भाजप सरकारने ही योजना गुंडाळली. तेलंगणासारख्या नव्या राज्याने आधारभूत किंमत न देता थेट आर्थिक मदत देणे सुरू केल्याचे पाहून सीमावर्ती भागातील चंद्रपूर जिल्ह्याचे शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.काय आहे योजना?तेलंगणा सरकारने शेतमालाला आधारभूत किंमत न देता प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ४ हजार रुपये देत आहे. थेट आर्थिक मदत देण्याच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, सीमावर्ती भागातील चंद्रपूर जिल्ह्याचे शेतकरी आगामी हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून बँकांचे उंबरठे झिजवित असल्याचे दिसून येत आहे.अर्थतज्ज्ञांचेही समर्थनकेंद्रीय कृषी व किंमत आयोगाचे माजी अध्यक्ष तथा नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक गुलाटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंडियन कौन्सिल फार रिसर्च अ‍ॅन्ड इंटरनॅशनल एकॉनॉमिक्स रिलेशन या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील शेती समस्यांचा अभ्यास करून नुकताच अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या डीआईएस योजनेचे समर्थन केले. ही योजना केंद्र सरकारने संपूर्ण राज्यांमध्ये लागू केल्यास शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, असा आशावादही व्यक्त केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती