शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणासारखी ‘डीआईएस’ योजना महाराष्ट्रात का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:50 IST

तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रती एकर ४ हजार रुपये थेट आर्थिक लाभ (डायरेक्ट इन्कम सपोर्ट) या योजनेअंतर्गत रक्कम वाटपाचे काम सुरू केले. ही योजना महाराष्ट्रात का नाही, असा सवालही प्रगतीशील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा सवालपीक कर्जासाठी झिजवताहेत उंबरठे

लोकमत न्यूज नेटवर्क राजेश मडावीचंद्रपूर : तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रती एकर ४ हजार रुपये थेट आर्थिक लाभ (डायरेक्ट इन्कम सपोर्ट) या योजनेअंतर्गत रक्कम वाटपाचे काम सुरू केले. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील फसलेली शेतमाल आधारभूत योजना, मनमानी वीज बिले आदी कारणांमुळे सीमावर्ती भागातील महाराष्ट्राचे शेतकरी आगामी हंगामासाठी बँकांचे उंबरठे झिजवित आहे. त्यामुळे तेलंगणासारखी ‘डीआईएस’ ही योजना महाराष्ट्रात का नाही, असा सवालही प्रगतीशील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना वर्षभर मोफत वीज देण्याची घोषणा करून अंमलबजावणी सुरू केली. याशिवाय कृषी निविष्ठांवर भरघोस सवलती देऊन शेतकऱ्यांनी आपलेसे करून घेतले. महाराष्ट्रात मात्र उलट चित्र दिसून येते. शेतमाल आधारभूत किंमतीनुसार खरेदी करण्यासाठी सरकारने पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाही. आॅनलाईन नोंदणीची सक्ती करून अडचणी वाढविल्या. तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झालेत. वीज बिलांमध्येही त्रुटी असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. सीमावर्ती भागातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांचा तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांशी कौटुंबीक संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी एकत्र येतात. परिणामी, तेलंगणा सरकारने सुरू केलेली ‘डीआईएस’ योजनेची उपयोगीता पाहून महाराष्ट्र सरकार का बोध घेत नाही, असा प्रश्न विचारू लागले आहेत. मध्य प्रदेशामध्ये शेतमालास हमीभाव न देता भावांतर ही योजना सुरू केली. त्यातही गैरव्यवहार झाल्याने भाजप सरकारने ही योजना गुंडाळली. तेलंगणासारख्या नव्या राज्याने आधारभूत किंमत न देता थेट आर्थिक मदत देणे सुरू केल्याचे पाहून सीमावर्ती भागातील चंद्रपूर जिल्ह्याचे शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.काय आहे योजना?तेलंगणा सरकारने शेतमालाला आधारभूत किंमत न देता प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ४ हजार रुपये देत आहे. थेट आर्थिक मदत देण्याच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना हंगामासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, सीमावर्ती भागातील चंद्रपूर जिल्ह्याचे शेतकरी आगामी हंगामासाठी पीककर्ज मिळावे म्हणून बँकांचे उंबरठे झिजवित असल्याचे दिसून येत आहे.अर्थतज्ज्ञांचेही समर्थनकेंद्रीय कृषी व किंमत आयोगाचे माजी अध्यक्ष तथा नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक गुलाटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंडियन कौन्सिल फार रिसर्च अ‍ॅन्ड इंटरनॅशनल एकॉनॉमिक्स रिलेशन या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील शेती समस्यांचा अभ्यास करून नुकताच अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या डीआईएस योजनेचे समर्थन केले. ही योजना केंद्र सरकारने संपूर्ण राज्यांमध्ये लागू केल्यास शेतकऱ्यांची अडचण दूर होईल, असा आशावादही व्यक्त केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती