शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने का वाढतेय? देशभरातील क्षेत्र संचालकांना कोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 07:15 IST

Chandrapur News महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने वाघांच्या संख्येत आघाडी घेण्याचे कारण काय,असा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी शुक्रवारी चंद्रपुरातील वन अकादमीत झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उपस्थित केला.

ठळक मुद्देराष्ट्रीय चर्चासत्रात ताडोबातील संघर्ष ऐरणीवर

राजेश मडावी

चंद्रपूर : रशियातील सेंट पीटस्बर्ग येथील २०१० च्या जागतिक अजेंडानुसार २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पटीने वाढविण्यावर जगभरात काम सुरू झाले. त्याप्रमाणे,भारतातही सर्व व्याघ्र प्रकल्पांत अंमल होत असताना महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने मात्र वाघांच्या संख्येत आघाडी घेण्याचे कारण काय,असा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी शुक्रवारी चंद्रपुरातील वन अकादमीत झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उपस्थित केला.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण,महाराष्ट्र वनविभाग चंद्रपूर व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी पुढाकार घेतला होता. विविध राज्यांतील मुख्य वन्यजीव संरक्षक तसेच देशभरातील ५२ क्षेत्र संचालक व तज्ज्ञांनी बदलत्या आव्हानांवर विचारमंथन केले. महाराष्ट्रात बोर,मेळघाट,पेंच,नवेगाव नागझिरा,सह्याद्री,ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पात २०१४ मध्ये १९० वाघ होते ते वाढून २०२० मध्ये ३४० पर्यंत पोहोचले. राज्यातील एकूण वाघांपैकी सुमारे २५० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. वाघांच्या या संख्येमुळे महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून आता चौथ्या स्थानावर आला आहे.

संधी व संकटांकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले

ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने का वाढली, हा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी चर्चासत्रात उपस्थित केल्यानंतर ताडोबाची क्षेत्र पाहणी करून कोअर व बफर झोनचे स्वरूप जाणून घेतले. सर्वच प्रकल्पांत वाघांची संख्या वाढविण्यावर भर देणे सुरू असताना ताडोबात झपाट्याने वाघ वाढले. तर दुसरीकडे मानव व वन्यजीव संघर्ष टोकदार का झाला, याची कारणे जाणून घेतली. तेलंगणाचे विनोदकुमार,डेहराडूनचे रमेशकुमार,डॉ.कौशिक,राजेश गोपाल,सातपुडा फाउंडेशनचे किशोर रिठे,कमल कुरेशी,डॉ. तिलोतमा वर्मा आदींनी समस्यांवर शास्त्रशुद्ध प्रकाश टाकून संधी व संकटांची जाणीव करून दिली.

महाराष्ट्रातील वाघांची स्थिती

२००६-१०३

२०१०-१६८

२०१४ -१९०

२०२०- ३४०

मानव व वन्यजीव संघर्ष कमी कसा होईल, पर्यायी रोजगार संधी विकसित कशा होतील यावर चंद्रपुरात सखोल चर्चा झाली. अनेकांनी नवे मुद्दे मांडले. सातपुडा फाउंडेशनमुळेे मेळघाटात २० वर्षांत २२ गावांचे पुनर्वसन व २५०० हेक्टर जमीन वन्यजीवांना मोकळी झाली. त्यातील ५ गावांच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल चर्चासत्रात प्रकाशित झाला. हा अहवाल सर्वच प्रकल्पांसाठी दिशादर्शक आहे.

-किशोर रिठे,सदस्य,वन्यजीव मंडळ,महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Tigerवाघ