शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने का वाढतेय? देशभरातील क्षेत्र संचालकांना कोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 07:15 IST

Chandrapur News महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने वाघांच्या संख्येत आघाडी घेण्याचे कारण काय,असा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी शुक्रवारी चंद्रपुरातील वन अकादमीत झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उपस्थित केला.

ठळक मुद्देराष्ट्रीय चर्चासत्रात ताडोबातील संघर्ष ऐरणीवर

राजेश मडावी

चंद्रपूर : रशियातील सेंट पीटस्बर्ग येथील २०१० च्या जागतिक अजेंडानुसार २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पटीने वाढविण्यावर जगभरात काम सुरू झाले. त्याप्रमाणे,भारतातही सर्व व्याघ्र प्रकल्पांत अंमल होत असताना महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने मात्र वाघांच्या संख्येत आघाडी घेण्याचे कारण काय,असा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी शुक्रवारी चंद्रपुरातील वन अकादमीत झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात उपस्थित केला.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण,महाराष्ट्र वनविभाग चंद्रपूर व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रासाठी पुढाकार घेतला होता. विविध राज्यांतील मुख्य वन्यजीव संरक्षक तसेच देशभरातील ५२ क्षेत्र संचालक व तज्ज्ञांनी बदलत्या आव्हानांवर विचारमंथन केले. महाराष्ट्रात बोर,मेळघाट,पेंच,नवेगाव नागझिरा,सह्याद्री,ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पात २०१४ मध्ये १९० वाघ होते ते वाढून २०२० मध्ये ३४० पर्यंत पोहोचले. राज्यातील एकूण वाघांपैकी सुमारे २५० वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. वाघांच्या या संख्येमुळे महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून आता चौथ्या स्थानावर आला आहे.

संधी व संकटांकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले

ताडोबात वाघांची संख्या झपाट्याने का वाढली, हा प्रश्न देशभरातील क्षेत्र संचालकांनी चर्चासत्रात उपस्थित केल्यानंतर ताडोबाची क्षेत्र पाहणी करून कोअर व बफर झोनचे स्वरूप जाणून घेतले. सर्वच प्रकल्पांत वाघांची संख्या वाढविण्यावर भर देणे सुरू असताना ताडोबात झपाट्याने वाघ वाढले. तर दुसरीकडे मानव व वन्यजीव संघर्ष टोकदार का झाला, याची कारणे जाणून घेतली. तेलंगणाचे विनोदकुमार,डेहराडूनचे रमेशकुमार,डॉ.कौशिक,राजेश गोपाल,सातपुडा फाउंडेशनचे किशोर रिठे,कमल कुरेशी,डॉ. तिलोतमा वर्मा आदींनी समस्यांवर शास्त्रशुद्ध प्रकाश टाकून संधी व संकटांची जाणीव करून दिली.

महाराष्ट्रातील वाघांची स्थिती

२००६-१०३

२०१०-१६८

२०१४ -१९०

२०२०- ३४०

मानव व वन्यजीव संघर्ष कमी कसा होईल, पर्यायी रोजगार संधी विकसित कशा होतील यावर चंद्रपुरात सखोल चर्चा झाली. अनेकांनी नवे मुद्दे मांडले. सातपुडा फाउंडेशनमुळेे मेळघाटात २० वर्षांत २२ गावांचे पुनर्वसन व २५०० हेक्टर जमीन वन्यजीवांना मोकळी झाली. त्यातील ५ गावांच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल चर्चासत्रात प्रकाशित झाला. हा अहवाल सर्वच प्रकल्पांसाठी दिशादर्शक आहे.

-किशोर रिठे,सदस्य,वन्यजीव मंडळ,महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Tigerवाघ