शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
3
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
4
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
5
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
6
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
7
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
8
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
9
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
10
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
11
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
12
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
14
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
15
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
16
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
17
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
18
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
19
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
20
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!

कृषी कर्जपुरवठा बँकांच्या प्राधान्यक्रमात का नाही ?

By राजेश मडावी | Updated: July 7, 2025 17:48 IST

Chandrapur : यंदा पावसाने अजूनही वेग धरला नाही. पुढे काय होणार, या प्रश्नाने शेतकऱ्यांच्या मनात सध्या प्रचंड धास्ती आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हातउसने घेऊन पेरणी केली. पीककर्जासाठी धडपड सुरूच आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी यंदाच्या २०६ कोटी उद्दिष्टांपैकी केवळ ७१ कोटी ९० लाखांचे वितरण केले. त्यामुळे कृषी कर्जपुरवठा बँकांच्या प्राधान्यक्रमात का नाही, लोकप्रतिनिधी यावर का गप्प आहेत, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

राजेश मडावीचंद्रपूर : रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांकाप्रमाणे, एकूण कर्जाच्या तुलनेत शेतीला १८ टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. त्यात शेतीसाठी प्रत्यक्ष १२ टक्के, तर अप्रत्यक्ष कर्ज सहा टक्के वाटणे अपेक्षित आहे. यात पुन्हा छोटे व मध्यम शेतकऱ्यांसाठी १० टक्के कर्जाचे उद्दिष्ट निश्चित झाले. या शेती कर्जातील तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज सात टक्क्यांनी वाटले जाते. वर्षअखेर त्या खात्यात केंद्र सरकारचे तीन टक्के जमा झाले, तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना एक टक्का व्याज दराने मिळू शकते. यासाठी फक्त एकच अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जाची परतफेड केली पाहिजे. या तीन लाख रुपये कर्जातील पुन्हा दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज शेतकऱ्यांच्या सातबारावर कुठलाही बोजा न चढविता दिलाच पाहिजे, अशी माहिती राष्ट्रीयीकृत बँकेच्या जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने दिली. पण, कागदावरचा हा नियम प्रत्यक्षात एक स्वप्न आहे. लोकप्रतिनिधींनी सरकारविरुद्ध आवाज उठविल्यास कृषी कर्ज वाटपातील काही त्रुटी निश्चितपणे दूर होऊ शकतात. आम्ही त्या नियमांच्या चौकटीपलिकडे जाऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. 

विलंबावर शेतकऱ्याने सूचना एक तोडगाबँकांनी नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीनंतर एप्रिलमध्ये दरवर्षी नवीन कर्ज वाटप सुरू करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. काही शेतकरी एप्रिलपासून संबंधित बँकांमध्ये पीककर्ज मागणी अर्ज सादर करतात. परंतु, जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळल्यास अनेक बँकांमध्ये त्याची नोंदच ठेवली जात नाही. त्यामुळे अर्जाचा क्रम निश्चित होत नाही. पुढे थेट जून महिन्यात अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना कर्ज दिल्याची उदाहरणे आढळतात. हे टाळण्यासाठी पीककर्ज मागणी केलेल्या अर्जाची नोंद बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तारीखवार करून ठेवली पाहिजे, असा तोडगा चंद्रपूरचेशेतकरी प्रभाकर येलेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सुचवला आहे. 

आपत्तींचा मारा सुरूच...गेले वर्षभर नैसर्गिक आपत्तींचा मारा सुरू होता. खरीप अतिवृष्टीने वाहून गेला. रब्बी पिकांचे नियोजन कोलमडले. उन्हाळी पिकांवर गारपीट आणि वादळी पावसाचा मारा झाला. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसान भरपाईसाठी पाहणी-पंचनाम्याचा खेळ रंगला. मदतीच्या घोषणा झाल्या. परंतु बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी ना भरपाई पडली, ना कुठली मदत. ज्या काही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली ती नुकसानीच्या तुलनेत खूपच कमी होती. मागील वर्षीची ही संकटे झेलत यंदा शेतकरी खरिपाच्या कामाला लागला. मात्र, पीककर्जाने त्यांची वाट रोखून धरली. 

बँकांभोवती खेटे घालून निराशा

  • कोणताही व्यवसाय कर्ज काढल्याशिवाय करता येत नाही. शेती हा एक व्यवसायच आहे. शेती परावलंबी झाल्यापासून हा व्यवसाय खूपच भांडवली झाला आहे. त्यात सातत्याच्या तोट्याच्या शेतीने जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. अशावेळी शेतीला वेळेत पुरेसा कर्जपुरवठा होणे गरजेचे आहे.
  • कमी ठेवले जाते. त्यातही जिल्ह्याच्या पीककर्जाचे उद्दिष्ट उद्दिष्टांच्या जवळपास निम्मे पीककर्ज वाटप होत नाही. ज्या शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाते त्यांना बँकेभोवती अनेक खेटे मारावे लागतात. त्यात त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाया जातो. बहुतांश शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळाले नाही. त्यामुळे ज्यासाठी कर्ज घेतले तो हेतू साध्य होणार की नाही, हादेखील प्रश्नच आहे.
टॅग्स :Crop Loanपीक कर्जchandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीFarmerशेतकरी