शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

२४६० शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून विमा कंपनीने का केले अपात्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:03 IST

बल्लारपूर तालुक्यातील प्रकार : शेतकरी विम्यापासून वंचित

आशिष खाडेलोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव: प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये बल्लारपूर तालुक्यातील ६७५४ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा काढला. मात्र, त्यात फक्त पीक नुकसानीचा २८५६ शेतकऱ्यांना पीकविमा प्राप्त झाला. २४६० विमा काढलेले शेतकरी पात्र असूनदेखील त्यांना विमा कंपनीने विविध कारणे दाखवून अपात्र केल्याचा प्रकार बल्लारपूर तालुक्यात उघडकीस आला आहे.

बल्लारपूर तालुक्यातील १७ गावांमधील ६७५४ शेतकऱ्यांनी एका रुपयात पीकविमा काढला. २०२३ मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ना झाले होते. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नियमानुसार ७२ तासांच्या आत क्लेम केली. त्यापैकी नुकसानभरपाई म्हणून २८५६ शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले. तर २४६० कापूस, धान उत्पादक पात्र शेतकऱ्यांना विमा कंपनीने आपले स्वतःची विविध कारणे उपस्थित करून त्या सर्व शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र करण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अतोनात होऊनदेखील विमा कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे त्या २४६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून. पीकविमा कंपनीचे तांत्रिक प्रॉब्लेम, वेळेवर शेतावर पंचनामा करण्यासाठी न येणे, अचूक करणे दाखवणे, टोल फ्री नंबरवर तक्रार न घेणे, या कारणांमुळे त्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विमा कंपनीने अपात्र केल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे.

शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना आणली खरी; मात्र ती शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे. आता शेतकऱ्यांना विमा काढून पीक नुकसानीपोटी पात्र असून देखील अपात्र करण्याचा सपाटा विमा कंपनी केला असल्याने या शेतकऱ्यांकडे थेट कृषिमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन विमा कंपनीचे कान टोचण्याची गरज आहे.

पालकमंत्र्यांनी बैठक घेण्याची गरजबल्लारपूर तालुक्यातील २४६० शेतकरी विमा लाभ मिळण्यासाठी पात्र असून देखील विमा कंपनीने त्या शेतकऱ्यांना विविध मनमर्जीने कारणे दाखवून अपात्र केले. त्यामुळे संकटकाळात शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी राहणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकारी व विमा प्रतिनिधी यांची बैठक घेऊन बल्लारपूर तालुक्यातील अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व यानंतर समोर नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा प्रतिनिधी अपात्र करणार नाही, अशी पारदर्शकता आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिल्हा विमा अधिकारी यांना शेतकऱ्यांनी फोन केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप देखील शेतकरी करत आहे.

"शेतकऱ्यांना विमा कंपनीने किरकोळ कारणे देत विमा नाकारला आहे; परंतु व्यवहारिकदृष्ट्या विचार केला तर हे शेतकरी नुकसान भरपाईस पात्र आहे." - श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, बल्लारपूर 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाCropपीकfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर