शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

का फुटताहेत मामा तलाव; दुरुस्तीचा निधी गेला कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 14:19 IST

चिचपल्लीपासून सुरुवात : जिल्ह्यात आतापर्यंत सहा तलाव फुटले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चिचपल्ली येथील माजी मालगुजार तलाव (मामा) फुटल्याने ३०० घरांमध्ये पाणी शिरून हाहाकार उडाला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात सहा तलाव फुटले. राज्य शासनाने तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी २०२० मध्ये टाटा कन्सल्टन्सीजच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांना २९ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होता. पावसाने तलाव धडाधड फुटू लागल्याने दुरुस्तीचा निधी गेला कुठे, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

गोंडराजे आणि इंग्रजांच्या कालावधीत सिंचनासाठी मामा तलावांची निर्मिती झाली. पूर्वी या तलावांची मालकी मालगुजारांकडे होती. मात्र, १९५० च्या संपत्ती हक्क कायद्यानुसार शासनाच्या ताब्यात गेले. शासनाने १९६३ मध्ये देखभाल व पाणीवाटप व्यवस्थापनासाठी नेमलेल्या बर्वे आयोगाच्या पर शिफारशीनुसार दुरुस्ती व पाणी वाटपावर कर आकारण्याची शिफारस केली होती. शेतकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला.

त्यानंतर तत्कालीन सरकारने निर्णय घेऊन १०० हेक्टर सिंचन क्षमतेचे तलाव जि. प. जलसंधारण विभागाकडे, तर त्यापेक्षा अधिक हा क्षमतेचे तलाव पाटबंधारे विभागाकडे दिले. पण, दुरुस्तीसाठी जि. प. ला राज्य शासनाकडे हात पसरावे लागते. पाटबंधारे विभागालाही पुरेसा निधी ही मिळत नाही, अशी तक्रार होती. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०२० च्या कार्यकाळात तलाव पुनरुज्जीवनासाठी टाटा उद्योगाच्या सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांना २९ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती

येथे फुटले तलावचिचपल्ली, डोंगरगाव, गिरगाव, (नागभीड), दाबगाय मवत्ता (मूल), मालडोंगरी (बह्मपुरी). भिसी (चिमूर) येथील मामा तलाव फुटले. चिचपल्ली तलावाने गावकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान केले. या घटनेने प्रशासनही हादरल्याचे दिसून आले. यातील काही तलाव शिवारात, तर काही गावाला लागून आहेत. तलाव फुटल्याने शेकडो एकरातील भात रोवणी व पन्हें वाहून गेले. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्याने तलाव फुटल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मामा तलाव किती? जिल्हा परिषद - १६८१ (सिंचन क्षमता १०० हेक्टरच्या आत) पाटबंधारे विभाग - ५२ (१०० हेक्टर क्षमतेपेक्षा अधिक)

असे आहे वास्तव

  • जि. प. जलसंधारण विभागाकडील १६८१ मामा तलाव रोहयो कामापुरते मर्यादित राहिले. पावसाळ्यात भरलेला तलाव दोन महिन्यांत रिकामा होतो, एकेकाळी शेकडो एकर शेती सिंचित करण्याची क्षमता असलेले तलाव दुर्लक्षामुळे निरुपयोगी ठरले. यंदा तर काही धडाधड फुटत आहेत.
  • १०० हेक्टरखाली सिंचन २१०० सिंचन विभागाच्या अखत्यारीत येतात. तलावांची जबाबदारी जि. प. कडे व परिसर वन विभागाच्या हद्दीत असल्याने दुरुस्तीची कामे थांबविण्यात आली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
  • तलावांच्या खोलीकरणासोबतच शेतीपर्यंत जाणारे नहर बुजले. नहरापासून बांधापर्यंत जाणारे कॅनल गायब झाले. योजनेतून तलावातील गाळ काढला नाही. खोलीकरणही झाले नाही. तलावांवरील अतिक्रमण हटविणे व सीमांकनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर