शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाचे अश्रू पुसणार कोण ?

By admin | Updated: November 23, 2015 01:06 IST

गेवरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पावसा-अभावी रोवणी केली नाही. अशा शेतकऱ्यांच्या मदतीला शासन येणार का, ...

दिलीप फुलबांधे गेवरागेवरा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पावसा-अभावी रोवणी केली नाही. अशा शेतकऱ्यांच्या मदतीला शासन येणार का, असा प्रश्न या भागातील शेतकरी करीत आहेत. या क्षेत्रातील कोणत्याही राजकीय नेत्यांकडून या भागाची साधी दखल घेतली नसून कोणताही राजकीय पक्षांचा नेता, कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला तयार नसल्याने लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवाल उपस्थित होण्याची कारणेही आता पुढे येऊ लागली आहेत. मागील कित्येक दिवसांपासून लोकमतकडून या भागाची वास्तविकता प्रसारित करण्यात येत असली तरी प्रत्यक्षात काम मात्र शासन व प्रशासनाला करायचे आहे. यासाठी स्थानिक पातळीवरुन आवाज उठविण्याची नितांत आवश्यकता असल्याने हे मांडणार कोण, असा प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.धानाचा पट्टा म्हणून या भागाची ओळख असली तरी अपुरी सिंचन व्यवस्था आणि बहुतांश निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचे क्षेत्र मोठा आहे. त्यामुळे धानपिके हाती येईस्तोवर होणारा खर्च लक्षात घेता व्यापाऱ्याने ठरविलेली किंमत बळीराजाच्या जिव्हारी लागत आहे. या भागात कोणत्याही गावात शासकीय धान्य खरेदी केंद्र नाही. त्यामुळे व्यापारी ठरविल त्या दरात धान्य विकावे लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे समिकरणच बिघडत चालले आहे. सध्याच्या स्थितीमध्ये राजकीय स्तरावरुन बघितल्यास शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, गरजू, दुर्बल व वंचितांसाठी काम करणारा कार्यकर्ता आता दुर्मिळ झाला असून निवडणूका आल्या की एखाद्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेवून निवडणूका प्रतिष्ठेच्या बनवून आम्हीच जनतेचे कैवारी असा आव आणणारी मंडळी सक्रियतेने भाग घेताना दिसते. त्यामागील कारणेही स्पष्टच आहेत. पक्षाचे आम्ही सच्चे कार्यकर्ते आहोत, अशी बतावणी करुन पैसा व वशिलाच्या जोरावर आपली ठेकेदारी पाच वर्ष कशी चालेल, याकडे अधिक लक्ष या कार्यकर्त्यांचे असते. मात्र यामधून निष्ठावान कार्यकर्ता मागे पडताना दिसत आहे. इच्छाशक्ती असूनही कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणारी ध्येय धोरण कोणत्याही पक्षांकडे नसल्याने कार्यकर्ता हा स्थानिक समस्यांकडे कानाडोळा करताना दिसत आहे. ही एक समस्या या भागातील राजकीय पक्ष कार्यकर्त्यांची झाली आहे. त्यामुळे या परिसरात गावागावात काँक्रीटचे रोड, नाली बांधकाम पुलांचे बांधकाम शासकीय इमारतीचे बांधकाम, यातूनच गावांचा विकास होत असल्याचा देखावा दिसत असला, तरी प्रत्यक्ष मात्र या भागातील आरोग्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, सिंचन, बांधकामातील गुणवत्ता विद्युतचा प्रश्न याकडे कोणताही पक्ष कार्यकर्ता लक्ष घालताना दिसत नाही. या भागातील स्थानिक पातळीवरुन पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्तरावरुन जनतेचे नेतृत्व करणारी मंडळी जनतेच्या प्रश्नांपासून दूरच असल्याचे चित्र आहे. त्यांच्याकडून कधीही महत्त्वाची भूमिका माडताना जनतेने अनुभवले नाही. ज्या पक्षात त्यांना सुरक्षा मिळेल, तिथे बसून आपली कारकीर्द पूर्ण कशी करता येईल, याचीच काळजी घेतली जाते. त्यामुळे जनता आता नाकतोंड मुरडायला लागली आहेत. याची चणूक मागील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधून आलीच आहे.राजकीय पक्षांच्या बळावरच शासन व्यवस्था निट चालते. परंतु त्यामधील कार्यकर्त्यांची नाळ जनतेच्या प्रश्नांशी जुळणारी असावी म्हणजे तेथील विकासाचे गणित सोप होत असते. मात्र या भागात या विपरित परिस्थिती आहे. म्हणून आता गावागावांत आपआपल्या प्रश्नांवर गावातच ग्रामसभांतून आवाज उठविण्याची वेळ आली आहे. यासाठी आता सर्वच पक्षांनी समस्यांवर विचार मंथन करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.