शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

खासगी व्यापाऱ्यांकडून पांढऱ्या सोन्याची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 05:01 IST

खासगी व्यापाऱ्यांकडून पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची कवडीमोल भावात खरेदी सुरू आहे. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असून त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

ठळक मुद्देकापसाची कवडीमोल भावात खरेदी : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : खासगी व्यापाऱ्यांकडून पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची कवडीमोल भावात खरेदी सुरू आहे. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असून त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.यावर्षी राजुरा तालुक्यात २८ हजार ५५० हेक्टरवर कापूस पिकांची लागवड केली. अकाली आलेल्या पावसाने कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या उसंतीनंतर शेतकऱ्यांनी कापसाची वेचणी करायला सुरुवात केली आहे. काही शेतकरी आर्थिक अडचणीपोटी खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री करीत आहे. मात्र त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांकडून घेतला जात असून कापसाला पाच हजार ५४० रुपये हमीभाव असताना खासगी व्यापारी चार हजार ते चार हजार ५०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी करीत आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असून शेतकरी अडचणीत सापडला आहे.खासगी कापूस घेणाऱ्या व्यापाऱ्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने खासगी व्यापारी कापसाची अक्षरश: लूट करीत आहे. त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. परतीच्या पावसाने आधीच शेतकरी होरपळला असताना खासगी व्यापारी कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे झाडावरच सडली तर कापूस काळा पडला. त्यामुळे शेतकºयांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. असे असताना खासगी कापूस संकलन केंद्रावर कापूस घेऊन जाणाºया शेतकºयांना ओला कापूस असल्याचे कारण सांगत कापसाला खासगी व्यापारी कवडीमोल भाव देत आहे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.हमी भावापेक्षा पाचशे,हजार रुपयांच्या फरकाने खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. दरवर्षी शेतकरी कापूस पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. परंतु शेतकरी दरवर्षी अस्मानी-सुलतानी संकटात सापडतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीला कोणीही धाऊन जात नाही, हे वास्तव आहे. राजकीय पुढारी शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष द्यायला तयार नाही. निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे राजकीय नेते शेतकºयांच्या समस्या जाणून घ्यायला तयार नाही.त्यामुळे शेतकरी केविलवाना झाला आहे. निसर्ग साथ देत नाही, सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देत नाही. खासगी व्यापारी शेतमालाची कवडीमोल भावात खरेदी करीत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता शेतकरी निराधार झाला आहे. त्याला यावेळी मोठ्या आधाराची गरज आहे. मात्र त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकºयांच्या मदतीसाठी आता कोण पुढे येते, याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू करावेखासगी व्यापारी कपसाची कवडीमोल भावात खरेदी करून अक्षरश: लूट करीत असताना राजुरा तालुक्यात शासनाने अद्यापही कापूस खरेदी संकलन केंद्र सुरू केले नाही. याचा फायदा खासगी व्यापारी घेत असून कवडीमोल भावात कापसाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे राजुरा तालुक्यात सरकारी कापूस संकलन केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती