शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पांढऱ्या सोन्याला व्यापारपेठेचे ग्रहण

By admin | Updated: November 22, 2014 22:57 IST

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. मात्र मात्र कापसाला व्यापारपेठच मिळत नसल्याने कापूस उत्पादक विवंचनेत सापडला आहे. शासनाचे कापूस

प्रशासनाचे शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष : शासनाचे संकलन केंद्र गेले कुठे ?राजकुमार चुनारकर - खडसंगीचंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. मात्र मात्र कापसाला व्यापारपेठच मिळत नसल्याने कापूस उत्पादक विवंचनेत सापडला आहे. शासनाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यात कुठेही सुरू झालेले नाही. खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत असल्याने विवंचनेत असलेला कापूस उत्पादक आर्थिक संकटातही सापडला आहे. धान उत्पादक तालुका म्हणून ओळख असलेल्या चिमूर तालुक्यात काही वर्षांपूर्वी कापसाची लागवड झाली. चिमूर तालुक्यात अनेक वर्षांपासून कापसाचे चांगले उत्पादन होत आहे. मात्र कापसावर आधारीत एकही उद्योग नसल्याने तालुक्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे तर उत्पादन असूनही कापूस संकलन केंद्र नसल्याने येथील शेतकरीही अडचणीत आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लाखाहून अधिक हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यावर्षीही कापसाची बऱ्यापैकी लागवड झाली. आता कापूस शेतकऱ्यांच्या हाती येऊ लागला आहे. मात्र शासनाचे शेतकऱ्यांकडे लक्षच नसल्याचे दिसून येते. अद्याप जिल्ह्यात कुठेही शासकीय कापूस संकलन केंद्र सुरू झालेले नाही. उद्योग विरहीत तालुका म्हणून ओळख असलेल्या चिमूर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामध्ये मागील वर्षात ६१९७२.६६ हेक्टर आर जमीन पिकाखाली आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यालगतच्या सिंदेवाही, नवरगाव, नेरी, शंकरपूर, खांबाडा या गावात मुख्य धानाचे पीक घेण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून सिंचनाच्या सोयीअभावी धान उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कल कापूस व सोयाबीन पिकाकडे वळला. मात्र मागील दोन वर्षांपासून निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी सोयाबीन पिकापासून वंचित राहिला. परिणामी शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पसंती दिली.आजघडीला चिमूर तालुक्यातील मासळ, पिपर्डा, शंकरपूर, भिसी, साठगाव, वाकर्ला, कोलारी, खडसंगी, आमडी, बोथली, चारगाव, रेंगाबोडी या भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली. मात्र कापसाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात येत असतानाही तालुक्यात एकही कापूस विक्री संकलन केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीला हिंगणघाट, वरोरा येथील खासगी व्यापाऱ्याकडे विकावा लागतो. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करुन कमी दरात कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी व्यापाऱ्याकडूनही नाडवला जात आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आपणच वाचा फोडू, असे आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान अनेक पुढाऱ्याकडून देण्यात आले. मात्र आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ या शेतकऱ्याचा आपण वाली म्हणणाऱ्या पुढाऱ्यावर आली आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवून शेतकरी कसा सुखी होईल. याकरिता नव्या सरकारकडून नियोजन होणे गरजेचे झाले आहे.