शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

अतिक्रमण हटाव समित्या गेल्या कुठे ?

By admin | Updated: May 8, 2014 23:39 IST

ग्रामपंचायतींच्या आणि शासकीय जागेवर गावोगावी वाढणार्‍या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाव समितीच्या स्थापनेबाबत अध्यादेश काढला.

कोरपना : ग्रामपंचायतींच्या आणि शासकीय जागेवर गावोगावी वाढणार्‍या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाव समितीच्या स्थापनेबाबत अध्यादेश काढला. मात्र बहुतेक ग्रामपंचायतींनी या अध्यादेश धुडकावल्याने गावोगावी अतिक्रमण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्वतंत्र अध्यादेशाद्वारे प्रत्येक गावात ग्रामसभा आयोजित करुन अतिक्रमण हटाव समित्यांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. या समित्यांचे विभागीय पातळीवर विभागीय आयुक्तांमार्फत कामकाज चालवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गावपातळीवरील समितीत सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदींची नियुक्ती करुन सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचाही त्यामध्ये समावेश असावा, अशी सूचना करण्यात आली होती. उपरोक्त अनुषंगाने अतिक्रमण हटाव समितीने पहिल्या तीन महिन्यात गावातील ग्रामपंचायतीच्या व शासकीय जागेतील अतिक्रमणांची यादी तयार करावी, नोटीस द्यावी, तीन महिन्यांनी संबंधितांनी अतिक्रमण न काढल्यास समितीने पोलीस बंदोबस्तात ते हटवावे आणि त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्याबाबत निर्देश दिले आहेत. ग्रामविकास विभागाने हा अध्यादेश जिल्हास्तरावर पाठविल्यानंतर या समित्या स्थापन होणे आवश्यक होते. मात्र, कोरपना तालुक्यात बहुतेक ठिकाणी या समित्या स्थापनच झाल्या नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी स्थापन झाल्या असल्यातरी त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीच्या तसेच शासकीय जागेवर बड्यांचेच अतिक्रमण असल्याने वाईटपणा घ्यायला सहसा कुणी तयार नसतात. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचेच अतिक्रमण आहे.(तालुका प्रतिनिधी)