शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटाव समित्या गेल्या कुठे ?

By admin | Updated: May 8, 2014 23:39 IST

ग्रामपंचायतींच्या आणि शासकीय जागेवर गावोगावी वाढणार्‍या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाव समितीच्या स्थापनेबाबत अध्यादेश काढला.

कोरपना : ग्रामपंचायतींच्या आणि शासकीय जागेवर गावोगावी वाढणार्‍या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाव समितीच्या स्थापनेबाबत अध्यादेश काढला. मात्र बहुतेक ग्रामपंचायतींनी या अध्यादेश धुडकावल्याने गावोगावी अतिक्रमण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्वतंत्र अध्यादेशाद्वारे प्रत्येक गावात ग्रामसभा आयोजित करुन अतिक्रमण हटाव समित्यांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. या समित्यांचे विभागीय पातळीवर विभागीय आयुक्तांमार्फत कामकाज चालवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गावपातळीवरील समितीत सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदींची नियुक्ती करुन सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचाही त्यामध्ये समावेश असावा, अशी सूचना करण्यात आली होती. उपरोक्त अनुषंगाने अतिक्रमण हटाव समितीने पहिल्या तीन महिन्यात गावातील ग्रामपंचायतीच्या व शासकीय जागेतील अतिक्रमणांची यादी तयार करावी, नोटीस द्यावी, तीन महिन्यांनी संबंधितांनी अतिक्रमण न काढल्यास समितीने पोलीस बंदोबस्तात ते हटवावे आणि त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्याबाबत निर्देश दिले आहेत. ग्रामविकास विभागाने हा अध्यादेश जिल्हास्तरावर पाठविल्यानंतर या समित्या स्थापन होणे आवश्यक होते. मात्र, कोरपना तालुक्यात बहुतेक ठिकाणी या समित्या स्थापनच झाल्या नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी स्थापन झाल्या असल्यातरी त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीच्या तसेच शासकीय जागेवर बड्यांचेच अतिक्रमण असल्याने वाईटपणा घ्यायला सहसा कुणी तयार नसतात. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचेच अतिक्रमण आहे.(तालुका प्रतिनिधी)