शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

अतिक्रमण हटाव समित्या गेल्या कुठे ?

By admin | Updated: May 8, 2014 23:39 IST

ग्रामपंचायतींच्या आणि शासकीय जागेवर गावोगावी वाढणार्‍या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाव समितीच्या स्थापनेबाबत अध्यादेश काढला.

कोरपना : ग्रामपंचायतींच्या आणि शासकीय जागेवर गावोगावी वाढणार्‍या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अतिक्रमण हटाव समितीच्या स्थापनेबाबत अध्यादेश काढला. मात्र बहुतेक ग्रामपंचायतींनी या अध्यादेश धुडकावल्याने गावोगावी अतिक्रमण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. शासकीय जागेवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने स्वतंत्र अध्यादेशाद्वारे प्रत्येक गावात ग्रामसभा आयोजित करुन अतिक्रमण हटाव समित्यांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. या समित्यांचे विभागीय पातळीवर विभागीय आयुक्तांमार्फत कामकाज चालवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गावपातळीवरील समितीत सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक आदींची नियुक्ती करुन सामाजिक कार्यकर्ते, वकील यांचाही त्यामध्ये समावेश असावा, अशी सूचना करण्यात आली होती. उपरोक्त अनुषंगाने अतिक्रमण हटाव समितीने पहिल्या तीन महिन्यात गावातील ग्रामपंचायतीच्या व शासकीय जागेतील अतिक्रमणांची यादी तयार करावी, नोटीस द्यावी, तीन महिन्यांनी संबंधितांनी अतिक्रमण न काढल्यास समितीने पोलीस बंदोबस्तात ते हटवावे आणि त्याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना पाठविण्याबाबत निर्देश दिले आहेत. ग्रामविकास विभागाने हा अध्यादेश जिल्हास्तरावर पाठविल्यानंतर या समित्या स्थापन होणे आवश्यक होते. मात्र, कोरपना तालुक्यात बहुतेक ठिकाणी या समित्या स्थापनच झाल्या नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी स्थापन झाल्या असल्यातरी त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. बहुतांश ग्रामपंचायतीच्या तसेच शासकीय जागेवर बड्यांचेच अतिक्रमण असल्याने वाईटपणा घ्यायला सहसा कुणी तयार नसतात. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचेच अतिक्रमण आहे.(तालुका प्रतिनिधी)