शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजनेची अंमलबजावणी केव्हा ?

By साईनाथ कुचनकार | Updated: June 15, 2023 15:19 IST

चालू सत्रापासून योजना सुरू न केल्यास आत्मदहन : ओबीसी सेवा संघाचा शासनाला इशारा

चंद्रपूर : स्वातंत्र्याची ७५ वर्षे झाली; परंतु आजही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शासकीय ओबीसी वसतिगृह नाही. एस.सी, एस.टी. विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणारी स्वाधार योजना लागू नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे.

हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्याची घोषणा केली; परंतु अंमलबजावणी झाली नाही. सध्या अतिशय बिकट परिस्थितीत ओबीसी विद्यार्थी सापडला आहे. चालू सत्रात ओबीसी मुलांचे, मुलींचे वसतिगृह जिल्हास्तरावर सुरू करावे, स्वाधार योजना लागू करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष, प्रा. अनिल डहाके यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला दिला आहे.

शेतकरी, शेतमजूर, कामगारांची ग्रामीण भागातील ओबीसी विद्यार्थी हुशार, होतकरू आहेत; परंतु त्यांना शहराच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ओबीसी वसतिगृह वेळेत सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.ओबीसी वसतिगृह व स्वाधार योजना सुरू न झाल्यास ओबीसी सेवा संघ सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिष्टमंडळात ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष,प्रा. अनिल डहाके, जिल्हा महासचिव ॲड. विलास माथनकार, भाविक येरगुडे, रंजित डवरे, विनय धोबे, प्रा. राहुल भोयर, प्रा. नीलेश बेलखेडे, कुसुम उदार, चंद्रकांत धांडे, प्रा. नामदेवराव मोरे, वसंत वडस्कर, अवधूत कोटेवार, प्रलय म्हशाखेत्री, आकाश कडूकर, सूरज पी. दहागावकर आणि इतर ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.

विद्यार्थी राहणार वंचित

महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढला; परंतु ३० जून २०२३ पासून नवीन सत्राला सुरुवात होत आहे. १० वी, १२ वीचे निकाल लागले आहेत; परंतु अजूनही वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात सरकारच्या, प्रशासनाच्या हालचालींना वेग नाही. कित्येक विद्यार्थी वसतिगृह सुरू होतील या आशेने शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहेत. ओबीसी विद्यार्थी वसतिगृह सुरू न झाल्यास कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू शकते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीchandrapur-acचंद्रपूर