शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

अस्थायी वनमजूर कधी होणार नियमित ? वनमजुरांचा ३७ वर्षांचा संघर्ष कायम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:47 IST

Chandrapur : प्रतीक्षा करून अनेक वनमजूर झाले सेवानिवृत्त

राजू गेडामलोकमत न्यूज नेटवर्कमूल : बारमाही वनमजूर सन १९८६ पासून वन विभागामध्ये काम करीत असून, त्यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी सन २०१२ मध्ये शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला. मात्र, त्या निर्णयाची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी चुकीचे निकष लावून शासन सेवेत कायम करण्यापासून दूर केले. त्यामुळे आजच्या स्थितीत जवळपास ३७ वर्षे काम करूनदेखील स्थायी न झाल्याने अनेक वन मजुरांच्या कुटुंबाची वाताहत होताना दिसत आहे. यात काही सेवेचा कालावधी संपल्याने सेवेतून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

वनाचे संरक्षण व देखभाल करण्यासाठी सन १९८६ ला अनेक वनमजुरांना वन विभागाने अस्थायी स्वरूपात कामावर घेतले. मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ३० वनमजूर कार्यरत आहेत. काहींचे वय निघून गेल्याने सेवेतून कमी करण्यात आले आहे. मात्र, आज ना उद्या शासन सेवेत सामावून घेतले जाईल, या आशेवर वन विभागात काम करीत आहेत. शासन दरबारी वेळोवेळी कायम करण्यासाठी मागणी केल्यानंतर सन २०१२ ला शासनाने वनमजुरांना कायम करण्यासाठी आदेशित केले. मात्र, वन अधिकाऱ्यांनी चुकीचे निकष लावत वनमजुरांना कायम करण्यापासून वंचित ठेवण्यात आले.

२०१२ मध्ये अजूनही निर्णयाची अंमलबजावणी नाही२०१२ मध्ये शासनाने परिपत्रक काढून वनमजुरांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

माहिती अधिकारात दिली चुकीची माहितीअनेक वन मजुरांनी माहितीच्या अधिकारात नियुक्तीपासूनची माहिती मागितली असता चुकीची माहिती देण्यात आली. तर, काही वेळेस माहिती उपलब्ध नसल्याचे सांगून आपली वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे अनेक वन मजुरांच्या कुटुंबांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. चुकी अधिकाऱ्यांनी करायची व झळ मात्र वनमजुरांच्या कुटुंबांना सोसावी लागत असेल, तर हे न्यायाला धरून नाही.

वन विभागाकडून शासन निर्णयाला बगलस्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातदेखील वन विभागाकडून शासन निर्णयाला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मूल तालुक्यासह जिल्ह्यात अनेक वनमजुरांवर अन्याय होत आहे. वनमजुरांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

"जंगलाचे रक्षण इमानेइतबारे गेल्या ३७ वर्षांपासून करीत आहे. सन २०१२ च्या शासन निर्णयानुसार सेवेत कायम करण्याचा निर्णय झाला असताना, अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देऊन शासनाची व आमची दिशाभूल केली. त्यामुळे कायम होऊ शकलो नाही. यात माझ्यासह अनेकांचे वय झाल्याने सेवेतून कमी करण्यात आले. मात्र, माझा अनेक महिन्यांचा सेवा केल्याचा पगार देण्यात आला नाही. असा प्रकार अनेक वनमजुराबाबत झाला असून, याकडे लक्ष देण्याची गरज आहे."- रवी खोब्रागडे, वनमजूर, मूल

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरforest departmentवनविभाग