शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोच्ची-पाचगाव रस्ता केव्हा कात टाकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:42 IST

राजुरा तालुक्यातील कोच्ची-पाचगाव रस्ता मागील अनेक वर्षांपासून असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी यातना सहन कराव्या लागत आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल : पाचगाव आरोग्य केंद्रात जाण्यासाठी अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील कोच्ची-पाचगाव रस्ता मागील अनेक वर्षांपासून असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. परिसरातील नागरिकांना रस्त्याअभावी यातना सहन कराव्या लागत आहे.कोच्ची-पाचगाव हा रस्ता दुर्लक्षित आहे. या मार्गावरून अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाचगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने नागरिकांना तिथे उपचारासाठी जावे लागते. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले. त्यामुळे गरोदर महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. पण, त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. गावाकडे जाण्यासाठी दुसरा मजबूत मार्ग नाही. या मार्गावर शेकडो शेतकºयांची शेती असल्याने पावसाळ्यात अनेक कामे अडतात. शेतावर बैलजोडी नेणेही कठीण होते. स्मार्ट सीटीच्या नावावर शहरातील रस्ते चकाचक करताना कोच्ची येथील नागरिकांना गावाकडे जाण्यासाठी पावसाळ्यात यातना सहन कराव्या लागतात. त्यामुळे शहरांचा विकास करताना ग्रामीण भागाचाही विचार करणे गरजेचे आहे. पण, जि.प.चा बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच कोच्ची-पाचगाव रस्त्याची दुरूस्ती करून समस्या सोडवावी, अशी मागणी उपसरपंच गोपाल जंबलवार, रूपेश गेडेकर, महेंद्र धोंगडे, शंकर पिपरे, सुभाष झाडे, रमेश जुलमे, वामन नमनकर, केशव झाडे आदींनी केली आहे.सावलहिरा-शिवापूर परिसरातही संतापकन्हाळगाव : कोरपना तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणारा शिवापूर ते राज्यसीमा तसेच सावलहिरा ते येल्लापूर या रस्तांची अवस्था अतिशय वाईट आहे. शिवापूरला जोेडणारा मार्ग तेलंगणा राज्य सीमेपासून गुळगुळीत झाला. पण, महाराष्ट्र हद्दीतील रस्ता जैसे-थे आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना २० किलोमीटर अतिरिक्त फेरा पडतो. यामध्ये वेळ वाया जाते. आर्थिक भुर्दंड बसतो. शिवापूर मांगलहिरा, थिप्पा, उमरहिरा, दुगार्डी आणि तेलंगणातील मांगरुड व पवनार आदी गावांसाठी हा रस्ता अत्यंत सोईचा व कमी अंतराचा आहे. सावलहिरा ते येल्लापूर या रस्त्याचेही तेच हाल झाले. वर्दळीच्या रस्त्यावर साधे मातीकाम करण्यात आले नाही. या मार्गाची दुरूस्ती केल्यास विकासाला चालना मिळू शकते. बहुतांश गावे आदिवासी व विकासापासून वंचित आहेत. बांधकाम विभागाने हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी केली जात आहे.