शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील मार्गांवरून बस कधी धावणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यसेवेत विलीनीकरण करावे, यासाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नाही. परिणामी प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. याऊलट काही जिल्ह्यात थोड्या प्रमाणात का होईना एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू आहे. त्यामुळे चंद्रपुरातील मार्गावरून बस कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू केला आहे. संप मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे. 

एकही बस धावत नाहीराज्यामध्ये काही ठिकाणी महामंडळाच्या बसफेऱ्या धावत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील चारही आगारातून एकही बस धावत नसल्याचे वास्तव आहे. 

एकाच दिवशी धावल्या होत्या दोन बसमागील पंधरवाड्यापूर्वी चंद्रपूर आगारातून एक व वरोरा आगारातून एक अशा दोन बस धावल्या होत्या. मात्र चंद्रपूर आगारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 

एकही चालक वाहक कर्तव्यावर येत नसल्याने बसफेऱ्या बंद आहे. इतर विभागातील जवळपास २०० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. दररोज आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना भेटून कर्तव्यावर येण्यास सांगत असते. -स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर

एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय?

पूर्वी दररोज बसनेच प्रवास करायचो. संपापासून खासगी वाहनातून प्रवास करीत आहे. पूर्वी थोडीफार अडचण व्हायची. मात्र आता सवयच झाल्यासारखी वाटते. महामंडळाच्या संपामुळे खासगी वाहने वाढल्याने आता लवकर ट्रॅव्हल्स मिळते.- प्रशांत खोब्रागडे, प्रवासी

एसटी महामंडळाचा संप सुरू होण्यापूर्वीपासूनच मी ट्रॅव्हल्सने प्रवास करतो. ट्रॅव्हल्समध्ये टीव्ही किंवा साऊंड बॉक्स लावून मनोरंजनात्मक प्रवास करता येत असल्याने तसेच बसपेक्षा कमी तिकीट असल्याने मला ट्रॅव्हल्सचाच प्रवास आवडतो.- अजित गेडाम, प्रवासी

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप