शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

चंद्रपुरातील मार्गांवरून बस कधी धावणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:00 IST

पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यसेवेत विलीनीकरण करावे, यासाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाला दोन महिन्यांचा कालावधी लोटला असूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नाही. परिणामी प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. याऊलट काही जिल्ह्यात थोड्या प्रमाणात का होईना एसटी महामंडळाच्या बसफेऱ्या सुरू आहे. त्यामुळे चंद्रपुरातील मार्गावरून बस कधी धावणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू केला आहे. संप मोडीत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागातील २०० च्या जवळपास कर्मचारी कर्तव्यावर आले. परंतु, चालक-वाहक अद्यापही कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे एकही बस आगाराबाहेर निघत नाही. परिणामी प्रवाशांना अडचणींची सामना करावा लागत आहे. 

एकही बस धावत नाहीराज्यामध्ये काही ठिकाणी महामंडळाच्या बसफेऱ्या धावत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील चारही आगारातून एकही बस धावत नसल्याचे वास्तव आहे. 

एकाच दिवशी धावल्या होत्या दोन बसमागील पंधरवाड्यापूर्वी चंद्रपूर आगारातून एक व वरोरा आगारातून एक अशा दोन बस धावल्या होत्या. मात्र चंद्रपूर आगारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दोघांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. 

एकही चालक वाहक कर्तव्यावर येत नसल्याने बसफेऱ्या बंद आहे. इतर विभागातील जवळपास २०० कर्मचारी कर्तव्यावर आहेत. दररोज आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना भेटून कर्तव्यावर येण्यास सांगत असते. -स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर

एसटीविना प्रवासाची सवय लागते की काय?

पूर्वी दररोज बसनेच प्रवास करायचो. संपापासून खासगी वाहनातून प्रवास करीत आहे. पूर्वी थोडीफार अडचण व्हायची. मात्र आता सवयच झाल्यासारखी वाटते. महामंडळाच्या संपामुळे खासगी वाहने वाढल्याने आता लवकर ट्रॅव्हल्स मिळते.- प्रशांत खोब्रागडे, प्रवासी

एसटी महामंडळाचा संप सुरू होण्यापूर्वीपासूनच मी ट्रॅव्हल्सने प्रवास करतो. ट्रॅव्हल्समध्ये टीव्ही किंवा साऊंड बॉक्स लावून मनोरंजनात्मक प्रवास करता येत असल्याने तसेच बसपेक्षा कमी तिकीट असल्याने मला ट्रॅव्हल्सचाच प्रवास आवडतो.- अजित गेडाम, प्रवासी

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप