शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

काटेरी पिंजऱ्यात आक्रंदने विरतात तेव्हा ...

By admin | Updated: February 9, 2015 23:09 IST

आयुष्याच्या एका वळणावर चुकीची पावलं पडली अन् अख्खी जिंदगानीच काळवंडून गेली. काटेरी पिंजऱ्यात अडकलेल्या ‘त्या’ अबलांचं आक्रंदन पिंजऱ्यातच विरलं आहे. वासनेनं बरबटलेल्या विद्रुप

रुपेश कोकावार - बाबुपेठ (चंद्रपूर)आयुष्याच्या एका वळणावर चुकीची पावलं पडली अन् अख्खी जिंदगानीच काळवंडून गेली. काटेरी पिंजऱ्यात अडकलेल्या ‘त्या’ अबलांचं आक्रंदन पिंजऱ्यातच विरलं आहे. वासनेनं बरबटलेल्या विद्रुप घटकांच्या दुनियेत जगणाऱ्या या असहाय्य महिलांचा आक्रोश मात्र कुणाच्याच कानापर्यंत पोहचत नाही. बदनाम वस्तीत पडत, धडपडत, ठेचकाळत जगणाऱ्या या महिलांची व्यथाच निराळी आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीनं जगणं नकोसं झालं...नेमकी हिच संधी साधून देहविक्रीच्या व्यवसायातील दलालांनी त्यांना हेरलं. विविध आमिष दाखविली. आणि चंद्रपुरच्या कुंटणखान्यात त्यांंना आणल्या गेलं. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात आहे. अनेकींनी सुरुवातीला विरोध केला. मात्र त्यांचा आक्रोश तेथेच दाबल्या गेला. आता त्यातील अनेकजणी वस्तीलाच शरण गेल्या आहेत. या काटेरी पिंजऱ्यातून मुक्त होण्याची आसही संपली आहे. ईच्छेविरूद्ध होत असलेलं शोषण सहन करण्यापलिकडे आता त्यांच्या हाती काहीच उरले नाही. बालपणी बाहुल्यांसोबत खेळत असताना भविष्यात आपल्या नशिबी असा भयाण काळोख असेल, अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल. कुंटणखान्यात दाखल झालेल्या काही युवतींनी सुरुवातीला होत असलेल्या शोषणाला विरोध केला; परंतु त्यांच्या मदतीला कुणीही धावून आले नाही. त्यानंतर आपल्याच नशिबाला दोष देत त्या आजही तेथेच जगत आहेत. या वस्तीत ५० ते ६० महिला, मुली देहविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांपैकी काहीजणींकडून जबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची चर्चा आहे. तडजोड करून जगताना कुणी मिनलची मोना झाली तर कुणी राणीची रोमा...! तेथील अन्य मुली त्यांच्या संवगडी बनल्या अन् मालकीन ‘अम्मा’ बनली. स्थनिक वेश्या अड्डयावर आंध्रप्रदेश तसेच मराठवाड्यातील ५० ते ६० मुली वेश्या व्यवसायात गुंतल्या आहेत. त्या तेथे कशा आणि कुठून आल्यात, याचा शोध घेण्याची गरज कुणालाच वाटली नाही. या व्यवसायात गुंतणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्या स्वखुशीने या व्यवसायात आल्यात की त्यांना यात जबरीने गोवल्या गेले, याचा शोध पोलीस यंत्रणाही घेताना दिसत नाही. या वस्तीवर गुन्हेगारांचे वर्चस्व आहे. त्या मुलींना मुक्त करण्यासाठी गेल्यानंतर हिंसा होईल, या भीतीपोटी कोणत्याही सामाजिक संस्था या भानगडीत पडत नाही. नेमकी ही बाब या व्यवसायाला पुरक ठरत आहे. मागील वर्षी याच परिसरात आंध्रप्रदेशातील चार मुलींना घर कामाचे आमिष दाखवून येथे आणल्या गेले होते. पंरतु काही दिवसातच त्यातील एकीने तेथून पळ काळत पोलिस ठाणे गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर चारही मुलींना कुंटणखान्यातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आले. वेश्याव्यवसायातून बाहेर पडल्यानंतर समाज पुन्हा आपल्याला स्वीकारणार नाही, या भीतीपोटीही अनेकजणी होणारा अत्याचार मूकपणे सहन करीत आहेत.