शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

काटेरी पिंजऱ्यात आक्रंदने विरतात तेव्हा ...

By admin | Updated: February 9, 2015 23:09 IST

आयुष्याच्या एका वळणावर चुकीची पावलं पडली अन् अख्खी जिंदगानीच काळवंडून गेली. काटेरी पिंजऱ्यात अडकलेल्या ‘त्या’ अबलांचं आक्रंदन पिंजऱ्यातच विरलं आहे. वासनेनं बरबटलेल्या विद्रुप

रुपेश कोकावार - बाबुपेठ (चंद्रपूर)आयुष्याच्या एका वळणावर चुकीची पावलं पडली अन् अख्खी जिंदगानीच काळवंडून गेली. काटेरी पिंजऱ्यात अडकलेल्या ‘त्या’ अबलांचं आक्रंदन पिंजऱ्यातच विरलं आहे. वासनेनं बरबटलेल्या विद्रुप घटकांच्या दुनियेत जगणाऱ्या या असहाय्य महिलांचा आक्रोश मात्र कुणाच्याच कानापर्यंत पोहचत नाही. बदनाम वस्तीत पडत, धडपडत, ठेचकाळत जगणाऱ्या या महिलांची व्यथाच निराळी आहे. घरच्या प्रतिकूल परिस्थितीनं जगणं नकोसं झालं...नेमकी हिच संधी साधून देहविक्रीच्या व्यवसायातील दलालांनी त्यांना हेरलं. विविध आमिष दाखविली. आणि चंद्रपुरच्या कुंटणखान्यात त्यांंना आणल्या गेलं. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात आहे. अनेकींनी सुरुवातीला विरोध केला. मात्र त्यांचा आक्रोश तेथेच दाबल्या गेला. आता त्यातील अनेकजणी वस्तीलाच शरण गेल्या आहेत. या काटेरी पिंजऱ्यातून मुक्त होण्याची आसही संपली आहे. ईच्छेविरूद्ध होत असलेलं शोषण सहन करण्यापलिकडे आता त्यांच्या हाती काहीच उरले नाही. बालपणी बाहुल्यांसोबत खेळत असताना भविष्यात आपल्या नशिबी असा भयाण काळोख असेल, अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल. कुंटणखान्यात दाखल झालेल्या काही युवतींनी सुरुवातीला होत असलेल्या शोषणाला विरोध केला; परंतु त्यांच्या मदतीला कुणीही धावून आले नाही. त्यानंतर आपल्याच नशिबाला दोष देत त्या आजही तेथेच जगत आहेत. या वस्तीत ५० ते ६० महिला, मुली देहविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांपैकी काहीजणींकडून जबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची चर्चा आहे. तडजोड करून जगताना कुणी मिनलची मोना झाली तर कुणी राणीची रोमा...! तेथील अन्य मुली त्यांच्या संवगडी बनल्या अन् मालकीन ‘अम्मा’ बनली. स्थनिक वेश्या अड्डयावर आंध्रप्रदेश तसेच मराठवाड्यातील ५० ते ६० मुली वेश्या व्यवसायात गुंतल्या आहेत. त्या तेथे कशा आणि कुठून आल्यात, याचा शोध घेण्याची गरज कुणालाच वाटली नाही. या व्यवसायात गुंतणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत आहे. त्या स्वखुशीने या व्यवसायात आल्यात की त्यांना यात जबरीने गोवल्या गेले, याचा शोध पोलीस यंत्रणाही घेताना दिसत नाही. या वस्तीवर गुन्हेगारांचे वर्चस्व आहे. त्या मुलींना मुक्त करण्यासाठी गेल्यानंतर हिंसा होईल, या भीतीपोटी कोणत्याही सामाजिक संस्था या भानगडीत पडत नाही. नेमकी ही बाब या व्यवसायाला पुरक ठरत आहे. मागील वर्षी याच परिसरात आंध्रप्रदेशातील चार मुलींना घर कामाचे आमिष दाखवून येथे आणल्या गेले होते. पंरतु काही दिवसातच त्यातील एकीने तेथून पळ काळत पोलिस ठाणे गाठल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर चारही मुलींना कुंटणखान्यातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आले. वेश्याव्यवसायातून बाहेर पडल्यानंतर समाज पुन्हा आपल्याला स्वीकारणार नाही, या भीतीपोटीही अनेकजणी होणारा अत्याचार मूकपणे सहन करीत आहेत.