शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

कोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. राखीव असलेल्या रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे. अशा रुग्णालयामध्ये सर्व टीम पीपीपी किट घालून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट आली. आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना आजार होऊन गेल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांनी इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी कराव्या, यासंदर्भात आजही रुग्णांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे योग्य वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी शस्त्रक्रिया केल्यास पुढील संकट टाळता येणे सहज शक्य आहे.

दीड महिन्याचा  कालावधी आवश्यक

- रुग्णांनी इतर आजाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोरोना झाल्यानंतर दीड महिन्याचा कालावधी होऊन गेलेला असावा. मात्र, अत्यावश्यक असल्यास त्यापूर्वीसुद्धा शस्त्रक्रिया करता येते. मधुमेह, बीपी, दमा आदी  असल्यास त्यांना प्रथम नाॅर्मल आणणे गरजेचे आहे. त्यानंतर ८ ते १२   आठवड्यानंतर शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.- कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर फुप्फुसाचे इन्फेक्शन तसेच खोकल्याचा त्रास उद्भवल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

 अशी घ्या काळजीकोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. राखीव असलेल्या रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे. अशा रुग्णालयामध्ये सर्व टीम पीपीपी किट घालून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. 

ही घ्या काळजीn एखाद्या  रुग्णाला कोरोना झाली नाही. असेही काही रुग्ण सध्या कोरोनामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरतात. मात्र, रुग्णांनी न घाबरता शस्त्रक्रिया करून घ्यावी. गरज असताना  शस्त्रक्रिया न केल्यामुळे  आपल्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. n  डाॅक्टरांकडून कोरोना चाचणीसोबतच छातीचा एक्स-रे, ईसीजी, तसेच फिजिशियशनचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन शस्त्रक्रिया करता येते. मात्र, रुग्णालयात गर्दी    करू नये, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास कमीत कमी लोकांनी भेटावे,    जेवण, औषधी व व्यायाम, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे, कोरोनाचा फैलाव होणार नाही याची   काटेकोर काळजी       घ्यावी.

इमर्जन्सी शस्त्रक्रियाया नावाप्रमाणेच अत्यंत तातडीने करावयाची शस्त्रक्रिया आहे. ती न केल्यास रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकते. यामध्ये रुग्णाला कोरोना असेल किंवा होऊन गेला असेल तरीही डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये हृदयरोग, मेंदू विकार, कॅन्सर, अपघात, किडनी आदी. 

प्लान सर्जरीया शस्त्रक्रियेमध्ये ठरवून आपल्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी आपली प्रकृती स्थिर झाल्यानंतर डाॅक्टर तसेच रुग्णांच्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. 

कोरोना प्रादुर्भाव आता काही प्रमाणात कमी होत आहे. असे असले तरी कोरोनासोबतच आपल्याला जगावेच लागणार आहे. योग्य काळजी घेऊन कोरोना संकटाला न घाबरता शस्त्रक्रियेमुळे बरे होणारे आजार अंगावर काढू नये. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे आपल्याला इतर आजारांतून मुक्तता मिळेल. आजही अनेक रुग्ण कोरोना संकटामुळे शस्त्रक्रिया करण्यास घाबरतात. अशा वेळी त्यांना इतर आजारांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.-डाॅ. संजय घाटे, मूत्ररोग आणि किडनी सर्जन तथाविदर्भ सर्जन असोसिएशन संस्थापक सचिव

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य