शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

कोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. राखीव असलेल्या रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे. अशा रुग्णालयामध्ये सर्व टीम पीपीपी किट घालून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट आली. आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना आजार होऊन गेल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांनी इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी कराव्या, यासंदर्भात आजही रुग्णांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे योग्य वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी शस्त्रक्रिया केल्यास पुढील संकट टाळता येणे सहज शक्य आहे.

दीड महिन्याचा  कालावधी आवश्यक

- रुग्णांनी इतर आजाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोरोना झाल्यानंतर दीड महिन्याचा कालावधी होऊन गेलेला असावा. मात्र, अत्यावश्यक असल्यास त्यापूर्वीसुद्धा शस्त्रक्रिया करता येते. मधुमेह, बीपी, दमा आदी  असल्यास त्यांना प्रथम नाॅर्मल आणणे गरजेचे आहे. त्यानंतर ८ ते १२   आठवड्यानंतर शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.- कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर फुप्फुसाचे इन्फेक्शन तसेच खोकल्याचा त्रास उद्भवल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

 अशी घ्या काळजीकोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. राखीव असलेल्या रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे. अशा रुग्णालयामध्ये सर्व टीम पीपीपी किट घालून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. 

ही घ्या काळजीn एखाद्या  रुग्णाला कोरोना झाली नाही. असेही काही रुग्ण सध्या कोरोनामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरतात. मात्र, रुग्णांनी न घाबरता शस्त्रक्रिया करून घ्यावी. गरज असताना  शस्त्रक्रिया न केल्यामुळे  आपल्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. n  डाॅक्टरांकडून कोरोना चाचणीसोबतच छातीचा एक्स-रे, ईसीजी, तसेच फिजिशियशनचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन शस्त्रक्रिया करता येते. मात्र, रुग्णालयात गर्दी    करू नये, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास कमीत कमी लोकांनी भेटावे,    जेवण, औषधी व व्यायाम, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे, कोरोनाचा फैलाव होणार नाही याची   काटेकोर काळजी       घ्यावी.

इमर्जन्सी शस्त्रक्रियाया नावाप्रमाणेच अत्यंत तातडीने करावयाची शस्त्रक्रिया आहे. ती न केल्यास रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकते. यामध्ये रुग्णाला कोरोना असेल किंवा होऊन गेला असेल तरीही डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये हृदयरोग, मेंदू विकार, कॅन्सर, अपघात, किडनी आदी. 

प्लान सर्जरीया शस्त्रक्रियेमध्ये ठरवून आपल्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी आपली प्रकृती स्थिर झाल्यानंतर डाॅक्टर तसेच रुग्णांच्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. 

कोरोना प्रादुर्भाव आता काही प्रमाणात कमी होत आहे. असे असले तरी कोरोनासोबतच आपल्याला जगावेच लागणार आहे. योग्य काळजी घेऊन कोरोना संकटाला न घाबरता शस्त्रक्रियेमुळे बरे होणारे आजार अंगावर काढू नये. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे आपल्याला इतर आजारांतून मुक्तता मिळेल. आजही अनेक रुग्ण कोरोना संकटामुळे शस्त्रक्रिया करण्यास घाबरतात. अशा वेळी त्यांना इतर आजारांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.-डाॅ. संजय घाटे, मूत्ररोग आणि किडनी सर्जन तथाविदर्भ सर्जन असोसिएशन संस्थापक सचिव

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य