शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

कोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. राखीव असलेल्या रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे. अशा रुग्णालयामध्ये सर्व टीम पीपीपी किट घालून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिली लाट त्यानंतर दुसरी लाट आली. आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना आजार होऊन गेल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांनी इतर आजाराच्या शस्त्रक्रिया कधी कराव्या, यासंदर्भात आजही रुग्णांमध्ये गैरसमज आहेत. त्यामुळे योग्य वेळी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांनी शस्त्रक्रिया केल्यास पुढील संकट टाळता येणे सहज शक्य आहे.

दीड महिन्याचा  कालावधी आवश्यक

- रुग्णांनी इतर आजाराची शस्त्रक्रिया करण्यासाठी कोरोना झाल्यानंतर दीड महिन्याचा कालावधी होऊन गेलेला असावा. मात्र, अत्यावश्यक असल्यास त्यापूर्वीसुद्धा शस्त्रक्रिया करता येते. मधुमेह, बीपी, दमा आदी  असल्यास त्यांना प्रथम नाॅर्मल आणणे गरजेचे आहे. त्यानंतर ८ ते १२   आठवड्यानंतर शस्त्रक्रिया करणे शक्य आहे.- कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेदरम्यान किंवा त्यानंतर फुप्फुसाचे इन्फेक्शन तसेच खोकल्याचा त्रास उद्भवल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

 अशी घ्या काळजीकोरोना झालेल्या रुग्णांना इतर आजारासाठी शस्त्रक्रिया करावी लागल्यास अत्यंत काळजी घ्यावी लागते. कोरोना रुग्णांना खोकला, सर्दी असते. अशा वेळी इतरांना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वसोयीयुक्त कोरोना रुग्णालय असणे आवश्यक आहे. राखीव असलेल्या रुग्णालयात भरती करणे गरजेचे आहे. अशा रुग्णालयामध्ये सर्व टीम पीपीपी किट घालून शस्त्रक्रिया करता येऊ शकते. 

ही घ्या काळजीn एखाद्या  रुग्णाला कोरोना झाली नाही. असेही काही रुग्ण सध्या कोरोनामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरतात. मात्र, रुग्णांनी न घाबरता शस्त्रक्रिया करून घ्यावी. गरज असताना  शस्त्रक्रिया न केल्यामुळे  आपल्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. n  डाॅक्टरांकडून कोरोना चाचणीसोबतच छातीचा एक्स-रे, ईसीजी, तसेच फिजिशियशनचे फिटनेस प्रमाणपत्र घेऊन शस्त्रक्रिया करता येते. मात्र, रुग्णालयात गर्दी    करू नये, शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णास कमीत कमी लोकांनी भेटावे,    जेवण, औषधी व व्यायाम, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार करावे, कोरोनाचा फैलाव होणार नाही याची   काटेकोर काळजी       घ्यावी.

इमर्जन्सी शस्त्रक्रियाया नावाप्रमाणेच अत्यंत तातडीने करावयाची शस्त्रक्रिया आहे. ती न केल्यास रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकते. यामध्ये रुग्णाला कोरोना असेल किंवा होऊन गेला असेल तरीही डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. यामध्ये हृदयरोग, मेंदू विकार, कॅन्सर, अपघात, किडनी आदी. 

प्लान सर्जरीया शस्त्रक्रियेमध्ये ठरवून आपल्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी आपली प्रकृती स्थिर झाल्यानंतर डाॅक्टर तसेच रुग्णांच्या सोयीनुसार शस्त्रक्रिया केली जाते. 

कोरोना प्रादुर्भाव आता काही प्रमाणात कमी होत आहे. असे असले तरी कोरोनासोबतच आपल्याला जगावेच लागणार आहे. योग्य काळजी घेऊन कोरोना संकटाला न घाबरता शस्त्रक्रियेमुळे बरे होणारे आजार अंगावर काढू नये. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करून घ्यावी. यामुळे आपल्याला इतर आजारांतून मुक्तता मिळेल. आजही अनेक रुग्ण कोरोना संकटामुळे शस्त्रक्रिया करण्यास घाबरतात. अशा वेळी त्यांना इतर आजारांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.-डाॅ. संजय घाटे, मूत्ररोग आणि किडनी सर्जन तथाविदर्भ सर्जन असोसिएशन संस्थापक सचिव

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य