शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पंचायत समितींमधील स्वच्छतेबाबत उदासीनता का?

By admin | Updated: November 12, 2014 22:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. चांगला उपक्रम असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. मात्र गावखेड्यापासून शहरांपर्यंत स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येत आहे.

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. चांगला उपक्रम असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. मात्र गावखेड्यापासून शहरांपर्यंत स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येत आहे.गोंडपिपरी- स्वच्छतेबाबत येथील पंचायत समिती परिसर व कार्यालय परिसराला बुधवारी भेट दिली असता परिसरातील गवत काढून पार्किंग सोय, ठिकठिकाणी कचरा कुंड्या, प्रवेशद्वारास सजावटी तोरण तसेच अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील कर्मचारी स्वच्छता करण्यात व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. मात्र सदर स्वच्छतेबाबत अधिक बारकाईने लक्ष घातले असता पं.स. कार्यालयाचे पुरुष मुत्रीघर रंगरंगोटीने जरी सजले असले, तरी मात्र सदर मुत्रीघराच्या मागील बाजुची मलमुत्र वाहून नेणारी पाईप लाईन फुटून असल्याचे निदर्शनास आले. तसेच पं.स. भवनातील अनेक कागदपत्रे धूळखात, पं.स. शिक्षण विभागाचे गटसाधन प्रशिक्षण केंद्रासमोर गवत वाढून परिसरात कचऱ्याची ढिगारे, पं.स. कार्यालयातील पेयजलचे रेफ्रीजरेटर असलेल्या ठिकाणी घाण तसेच अधिकाऱ्यांच्या चेंबरमधील प्रसाधन गृहाची पाईपलाईन फुटून असल्याचे आढळले.येत्या दोन दिवसात सुरू होणाऱ्या स्वच्छता सप्ताहाची सर्व विभागाने दखल घेतली; मात्र केवळ देखावा निर्माण करून वरिष्ठांची शाबासकी मिळविण्याहेतू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले.ब्रह्मपुरी : पंचायत समितीच्या आवारात ‘यशवंत बगीचा’ स्वच्छतेची साक्ष देत आहे. निर्मल भारत योजनेंतर्गत पंचायत समितीने मागील तीन वर्षापासूनच तालुक्यात स्वच्छता अभियान राबवून मानाचे स्थान प्राप्त केले आहे.ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या प्रांगणात प्रवेश होताच निरनिराळे फुलझाडे, मेहंदी, लॉन व छोटे छोटे कटींग करून झाडे निसर्गरम्य स्वरूपात निर्माण झाले आहे. या परिसरातील बगीचाला ‘यशवंत’ नाव देण्यात आले आहे. पंचायत समितीच्या परिसरात बगीचा, साफसफाई, शौचालय व कार्यालयाची स्वच्छता बघता या पंचायत समितीला राज्यात तिसरे तर विभागात दुसरे क्रमांक देऊन गौरविण्यात आले आहे. पंचायत समितीच्या आवारातील भिंतीवर अनेक स्वच्छतेविषयक चित्रे गेल्या तीन वर्षापूर्वीच काढून स्वच्छतेचा कानमंत्र देताना कम्पाऊंडवरील काढलेल्या चित्रावरुन दिसून येत आहे. आजघडीला ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या व्यतिरिक्त कोणत्याही कार्यालयात एवढी स्वच्छता दिसून येत नाही. त्या ठिकाणी स्वच्छतेबाबत उदासीनताच दिसून येते. पंचायत समितीच्या संदर्भात येथे ‘ड्रेस कोड’ कर्मचाऱ्यांना दिले आहे. ही बाब अन्य भागात कुठेही दिसून येत नाही. तत्कालिन संवर्ग विकास अधिकारी नारायण सानप यांनी ‘यशवंत बगीचा’ व कर्मचाऱ्यांना शिस्त, ड्रेस कोड आदी उपक्रम राबवून पंचायत समिती फुलविण्याचे काम केले आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी विद्यमान संवर्ग विकास अधिकारी गिडेवार हे प्रयत्न करीत आहेत. एकूणच ब्रह्मपुरीची पंचायत समिती ‘निर्मल ग्राम’ योजनेच्या अटीत खरी उतरते. भद्रावती : स्वच्छता ठेवण्याचे आदेश देणाऱ्या भद्रावती पंचायत समितीच्या वसाहतीमध्येच व सभापतींच्या निवासस्थान परिसरात अस्वच्छतेचा कळस आहे. पंचायत समितीची वसाहत जवळपास १० वर्षापासून पडीत आहे. या ठिकाणी कोणताही कर्मचारी वास्तव्यास नाही. त्यामुळे याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरात कचरा निर्माण झाला आहे. सध्या येथे बेवारस प्राण्यांनी आपला कब्जा केला आहे. सभापती निवासस्थान परिसरात घाण दिसून येते. (लोकमत चमू)