शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंधांमध्ये काय हवे ते सांगा? दुकाने हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले होते. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले होते. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यावसायिकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने सुरू करण्याची मुभा दिली होती. काही दिवस नियमांचे पालन केल्यानंतर आता अनेक हॉटेल्स, किराणा व इतर व्यावसायिक आपल्या दुकानाचे शटर ४ वाजता बंद करतात. परंतु, त्याची एखादी व्यक्ती दुकानाच्या बाहेर उभी असते. ग्राहक येताच त्याला हवी ती वस्तू बिनदिक्कत दिली जाते. मनपा व जिल्हाधिकारी प्रशासनाने अशांवर कारवाई करण्यासाठी पथक गठित केले होते. त्या पथकाद्वारे काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर आता कारवाई थंडावली असल्याने हवी ती वस्तू हवे त्या वेळेवर शहरात बिनदिक्कत भेटत असल्याचे चित्र आहे.

कोट

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

-विपीन पालिवाल,

अतिरिक्त आयुक्त मनपा

-----

या दुकानांवर लक्ष कुणाचे

प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा तसेच पोलीस विभागाचे पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. परंतु, सद्यस्थितीत तिन्ही पथकांद्वारे कारवाईची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे.

-------

किराणा हवा की जेवण

सर्व प्रतिष्ठाने ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे प्रशानाचे आदेश आहेत. मात्र सर्वच दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण तसेच किराणा दुकानात किराणा साहित्य मिळत असल्याचे चित्र आहे.

---

हे घ्या पुरावे

जटपुरा गेट

शहरातील जटपुरा गेट परिसरात अनेक दुकाने आहेत. ही सर्व दुकाने सायंकाळी ५ वाजताच्या नंतरसुद्धा सुरू दिसून येतात. काही दुकानाचे शटर अर्धवट बंद असते. तर काही शटर बंद करुन एक माणूस बाहेर ठेवत असतात. ग्राहक येताच त्याला साहित्य देत असतात.

------

मनपा चौक

गोल बाजार परिसरात अनेक प्रतिष्ठाणे आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येते. सायंकाळी चार वाजताच्या नंतरही येथे हवी ते वस्तू सहज उपलब्ध होत असते.