शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

निर्बंधांमध्ये काय हवे ते सांगा? दुकाने हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले होते. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले होते. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यावसायिकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने सुरू करण्याची मुभा दिली होती. काही दिवस नियमांचे पालन केल्यानंतर आता अनेक हॉटेल्स, किराणा व इतर व्यावसायिक आपल्या दुकानाचे शटर ४ वाजता बंद करतात. परंतु, त्याची एखादी व्यक्ती दुकानाच्या बाहेर उभी असते. ग्राहक येताच त्याला हवी ती वस्तू बिनदिक्कत दिली जाते. मनपा व जिल्हाधिकारी प्रशासनाने अशांवर कारवाई करण्यासाठी पथक गठित केले होते. त्या पथकाद्वारे काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर आता कारवाई थंडावली असल्याने हवी ती वस्तू हवे त्या वेळेवर शहरात बिनदिक्कत भेटत असल्याचे चित्र आहे.

कोट

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

-विपीन पालिवाल,

अतिरिक्त आयुक्त मनपा

-----

या दुकानांवर लक्ष कुणाचे

प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा तसेच पोलीस विभागाचे पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. परंतु, सद्यस्थितीत तिन्ही पथकांद्वारे कारवाईची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे.

-------

किराणा हवा की जेवण

सर्व प्रतिष्ठाने ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे प्रशानाचे आदेश आहेत. मात्र सर्वच दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण तसेच किराणा दुकानात किराणा साहित्य मिळत असल्याचे चित्र आहे.

---

हे घ्या पुरावे

जटपुरा गेट

शहरातील जटपुरा गेट परिसरात अनेक दुकाने आहेत. ही सर्व दुकाने सायंकाळी ५ वाजताच्या नंतरसुद्धा सुरू दिसून येतात. काही दुकानाचे शटर अर्धवट बंद असते. तर काही शटर बंद करुन एक माणूस बाहेर ठेवत असतात. ग्राहक येताच त्याला साहित्य देत असतात.

------

मनपा चौक

गोल बाजार परिसरात अनेक प्रतिष्ठाणे आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येते. सायंकाळी चार वाजताच्या नंतरही येथे हवी ते वस्तू सहज उपलब्ध होत असते.