शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

निर्बंधांमध्ये काय हवे ते सांगा? दुकाने हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:26 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले होते. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. ...

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध लादले होते. दरम्यान रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यावसायिकांना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आपली प्रतिष्ठाने सुरू करण्याची मुभा दिली होती. काही दिवस नियमांचे पालन केल्यानंतर आता अनेक हॉटेल्स, किराणा व इतर व्यावसायिक आपल्या दुकानाचे शटर ४ वाजता बंद करतात. परंतु, त्याची एखादी व्यक्ती दुकानाच्या बाहेर उभी असते. ग्राहक येताच त्याला हवी ती वस्तू बिनदिक्कत दिली जाते. मनपा व जिल्हाधिकारी प्रशासनाने अशांवर कारवाई करण्यासाठी पथक गठित केले होते. त्या पथकाद्वारे काही दिवस कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर आता कारवाई थंडावली असल्याने हवी ती वस्तू हवे त्या वेळेवर शहरात बिनदिक्कत भेटत असल्याचे चित्र आहे.

कोट

सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

-विपीन पालिवाल,

अतिरिक्त आयुक्त मनपा

-----

या दुकानांवर लक्ष कुणाचे

प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा तसेच पोलीस विभागाचे पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. परंतु, सद्यस्थितीत तिन्ही पथकांद्वारे कारवाईची मोहीम थंडावली असल्याचे दिसून येत आहे.

-------

किराणा हवा की जेवण

सर्व प्रतिष्ठाने ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे प्रशानाचे आदेश आहेत. मात्र सर्वच दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण तसेच किराणा दुकानात किराणा साहित्य मिळत असल्याचे चित्र आहे.

---

हे घ्या पुरावे

जटपुरा गेट

शहरातील जटपुरा गेट परिसरात अनेक दुकाने आहेत. ही सर्व दुकाने सायंकाळी ५ वाजताच्या नंतरसुद्धा सुरू दिसून येतात. काही दुकानाचे शटर अर्धवट बंद असते. तर काही शटर बंद करुन एक माणूस बाहेर ठेवत असतात. ग्राहक येताच त्याला साहित्य देत असतात.

------

मनपा चौक

गोल बाजार परिसरात अनेक प्रतिष्ठाणे आहेत. येथे मोठी गर्दी दिसून येते. सायंकाळी चार वाजताच्या नंतरही येथे हवी ते वस्तू सहज उपलब्ध होत असते.