शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

विहिरी कोरड्या पडल्या, हातपंपाचे पाणी गेले खोलात

By admin | Updated: May 12, 2017 02:17 IST

तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे.

दररोजची कसरत: पाणी आणण्यासाठी ट्रॅक्टर, बैलबंडीचा वापर राजेश बारसागडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. यावर्षीसुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने गावाच्या शेजारी शेतात असलेली बोअरवेल सावरगाववासीयांची तहान भागवित आहेत. गावातील सर्वंच विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपांचीही पातळी तळाला गेली असल्याने पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना दररोज कसरत करावी लागत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी गावात कधीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. मात्र अलिकडे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याकरिता कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, बैलबंडी आदी वाहनाने शेतकरी स्वत:च्या शेतातील बोअरवेलवरून पाणी आणून तहान भागवित आहेत. मात्र ज्याच्याकडे कुठलेच साधन नाही, अशांपुढे मोठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. शेतमालक निलकंठ पाटील बोरकर, मारोती निकुरे, राजेंद्र बरडे, अविनाश पुरी यांनी स्वत:च्या बोअरवेलचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे तात्पुर्ती पाणी समस्या कमी झाली असली तरी कोसोदूर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोलात जाते. हे जरी खरे असले तरी सावरगावात पूर्वी पाणी टंचाई नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात बोअरवेल बसविले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धानपिकाची उन्हाळी लागवड केली आहे. दरम्यान, गावातील पाणी टंचाईला शेतातील बोअरवेल कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु या बाबीला कुठलाही ठोस पुरावा नाही. गावाशेजारील शेतजमीनधारक एक सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आहेत, ही समाधानाची बाब. गावात पाण्याच्या दोन टाक्या आहेत. एका टाकीत नदीचे पाणी भरले जात तर दुसऱ्या टाकीत बोअरवेलवरून पाणी आणले जाते. नदीला पाणी नसल्याने एक टाकी रिकामीच राहत आहे. दुसऱ्या टाकीत बोअरवेलचे खारे पाणी असल्याने ते नागरिक पित नाहीत. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे. दरम्यान, निलकंठ पाटील बोरकर यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, माझे शेत गावाशेजारी बसथांब्यालगत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने शेतातील बोअरवेलचे पाणी महिलांना उपलब्ध करून दिले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी बोअरवेलवर नागरिकांची मोठी गर्दी असते, असेही त्यांनी सांगितले.