शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी कोरड्या पडल्या, हातपंपाचे पाणी गेले खोलात

By admin | Updated: May 12, 2017 02:17 IST

तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे.

दररोजची कसरत: पाणी आणण्यासाठी ट्रॅक्टर, बैलबंडीचा वापर राजेश बारसागडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. यावर्षीसुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने गावाच्या शेजारी शेतात असलेली बोअरवेल सावरगाववासीयांची तहान भागवित आहेत. गावातील सर्वंच विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपांचीही पातळी तळाला गेली असल्याने पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना दररोज कसरत करावी लागत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी गावात कधीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. मात्र अलिकडे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याकरिता कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, बैलबंडी आदी वाहनाने शेतकरी स्वत:च्या शेतातील बोअरवेलवरून पाणी आणून तहान भागवित आहेत. मात्र ज्याच्याकडे कुठलेच साधन नाही, अशांपुढे मोठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. शेतमालक निलकंठ पाटील बोरकर, मारोती निकुरे, राजेंद्र बरडे, अविनाश पुरी यांनी स्वत:च्या बोअरवेलचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे तात्पुर्ती पाणी समस्या कमी झाली असली तरी कोसोदूर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोलात जाते. हे जरी खरे असले तरी सावरगावात पूर्वी पाणी टंचाई नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात बोअरवेल बसविले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धानपिकाची उन्हाळी लागवड केली आहे. दरम्यान, गावातील पाणी टंचाईला शेतातील बोअरवेल कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु या बाबीला कुठलाही ठोस पुरावा नाही. गावाशेजारील शेतजमीनधारक एक सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आहेत, ही समाधानाची बाब. गावात पाण्याच्या दोन टाक्या आहेत. एका टाकीत नदीचे पाणी भरले जात तर दुसऱ्या टाकीत बोअरवेलवरून पाणी आणले जाते. नदीला पाणी नसल्याने एक टाकी रिकामीच राहत आहे. दुसऱ्या टाकीत बोअरवेलचे खारे पाणी असल्याने ते नागरिक पित नाहीत. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे. दरम्यान, निलकंठ पाटील बोरकर यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, माझे शेत गावाशेजारी बसथांब्यालगत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने शेतातील बोअरवेलचे पाणी महिलांना उपलब्ध करून दिले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी बोअरवेलवर नागरिकांची मोठी गर्दी असते, असेही त्यांनी सांगितले.