शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

विहिरी कोरड्या पडल्या, हातपंपाचे पाणी गेले खोलात

By admin | Updated: May 12, 2017 02:17 IST

तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे.

दररोजची कसरत: पाणी आणण्यासाठी ट्रॅक्टर, बैलबंडीचा वापर राजेश बारसागडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या तीन वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत आहे. यावर्षीसुध्दा पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने गावाच्या शेजारी शेतात असलेली बोअरवेल सावरगाववासीयांची तहान भागवित आहेत. गावातील सर्वंच विहिरी कोरड्या पडल्या असून हातपंपांचीही पातळी तळाला गेली असल्याने पाणी मिळविण्यासाठी नागरिकांना दररोज कसरत करावी लागत आहे. मागील तीन वर्षांपूर्वी गावात कधीच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. मात्र अलिकडे दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याकरिता कसरत करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, बैलबंडी आदी वाहनाने शेतकरी स्वत:च्या शेतातील बोअरवेलवरून पाणी आणून तहान भागवित आहेत. मात्र ज्याच्याकडे कुठलेच साधन नाही, अशांपुढे मोठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. शेतमालक निलकंठ पाटील बोरकर, मारोती निकुरे, राजेंद्र बरडे, अविनाश पुरी यांनी स्वत:च्या बोअरवेलचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे तात्पुर्ती पाणी समस्या कमी झाली असली तरी कोसोदूर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खोलात जाते. हे जरी खरे असले तरी सावरगावात पूर्वी पाणी टंचाई नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात बहुतांश शेतकऱ्यांनी स्वत:च्या शेतात बोअरवेल बसविले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धानपिकाची उन्हाळी लागवड केली आहे. दरम्यान, गावातील पाणी टंचाईला शेतातील बोअरवेल कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु या बाबीला कुठलाही ठोस पुरावा नाही. गावाशेजारील शेतजमीनधारक एक सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आहेत, ही समाधानाची बाब. गावात पाण्याच्या दोन टाक्या आहेत. एका टाकीत नदीचे पाणी भरले जात तर दुसऱ्या टाकीत बोअरवेलवरून पाणी आणले जाते. नदीला पाणी नसल्याने एक टाकी रिकामीच राहत आहे. दुसऱ्या टाकीत बोअरवेलचे खारे पाणी असल्याने ते नागरिक पित नाहीत. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे. दरम्यान, निलकंठ पाटील बोरकर यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले, माझे शेत गावाशेजारी बसथांब्यालगत आहे. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाल्याने शेतातील बोअरवेलचे पाणी महिलांना उपलब्ध करून दिले आहे. दररोज सकाळी व सायंकाळी बोअरवेलवर नागरिकांची मोठी गर्दी असते, असेही त्यांनी सांगितले.