शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

बुधवार ठरला आंदोलन ‘वार’

By admin | Updated: December 3, 2014 22:46 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज बुधवारी चंद्रपूर व आसन येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर एसीसी कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीसाठी कामगारांनी मुंडण आंदोलन केले.

संभाजी ब्रिगेडचे पडोली तर आसनच्या शेतकऱ्यांचे गडचांदूर मार्गावर रास्ता रोकोचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज बुधवारी चंद्रपूर व आसन येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर एसीसी कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीसाठी कामगारांनी मुंडण आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड चंद्रपूरच्यावतीने चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पडोली चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी बैलबंडी घेऊन सहभागी झाले होते. संभाजी ब्रिगेडने १ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन, मंत्र्यांना घेराव, निवेदन इत्यादी माध्यमातून शेतपिकाला हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. दुपारी १२.३० वाजता नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे काही काळ येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.कापूस पिकाला ७ हजार, धान पिकाला पाच हजार, सोयाबिनला पाच हजार प्रती क्विंटल हमीभाव देऊन शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, जलसिंचनाच्या सोयी व १२ तास वीज द्यावी आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धरणाच्या पाण्यासाठी आसन येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलनकोरपना : तालुक्यातील पकडीगुडम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनानासाठी मिळावे, १३ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा याकरीता आज गडचांदूर-कोरपना मुख्य मार्गावरील आसन फाट्यावर पकडीगुडम धरणातील बारा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे मुख्य मार्गवरील वाहतूक खोळंबली. यावेळी गडचांदूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम मोठ्या धरणाची निर्मिती शेतकऱ्यांच्या हितासाठी झाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अजूनही पाणी पोहचलेले नाही. परंतु, तालुक्यातील सिमेंट उद्योगाला या दोन्ही धरणाचे पाणी दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेकांची शेती कोरडवाहू आहे. कंपन्यांशी केलेला करार संपुष्टात आणावा, पकडीगुड्डम धरणाचे पाणी २६८० हेक्टर शेतजमीनीच्या सिंचनाकरिता उपलब्ध करुन द्यावे, १३ गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्यावे, रबी पिकांसाठी धरणाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे आदी मागण्या रास्ता रोको आंदोलनातून करण्यात आले. शेतकऱ्यांना धरणाचे पाणी न दिल्यास आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मत सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले, मडावी, ईश्वर पडवे, देवराव चांदेकर, मधू करघागे, बंडू देवालकर, हिरालाल पडवे, संतोष टोंगे, शंकर निमकर, मंगेश भोयर, माजी सरपंच भोंगळे यांनी दिला. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (लोकमत चमू)