शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बुधवार ठरला आंदोलन ‘वार’

By admin | Updated: December 3, 2014 22:46 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज बुधवारी चंद्रपूर व आसन येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर एसीसी कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीसाठी कामगारांनी मुंडण आंदोलन केले.

संभाजी ब्रिगेडचे पडोली तर आसनच्या शेतकऱ्यांचे गडचांदूर मार्गावर रास्ता रोकोचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज बुधवारी चंद्रपूर व आसन येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर एसीसी कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीसाठी कामगारांनी मुंडण आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेड चंद्रपूरच्यावतीने चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील पडोली चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शेतकरी बैलबंडी घेऊन सहभागी झाले होते. संभाजी ब्रिगेडने १ नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन, मंत्र्यांना घेराव, निवेदन इत्यादी माध्यमातून शेतपिकाला हमीभाव मिळावा यासाठी राज्यात आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. दुपारी १२.३० वाजता नागपूर- चंद्रपूर महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. त्यामुळे काही काळ येथे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.कापूस पिकाला ७ हजार, धान पिकाला पाच हजार, सोयाबिनला पाच हजार प्रती क्विंटल हमीभाव देऊन शेतीला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा, प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, जलसिंचनाच्या सोयी व १२ तास वीज द्यावी आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या. आंदोलनस्थळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धरणाच्या पाण्यासाठी आसन येथील शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलनकोरपना : तालुक्यातील पकडीगुडम धरणाचे पाणी शेतकऱ्यांना सिंचनानासाठी मिळावे, १३ गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा याकरीता आज गडचांदूर-कोरपना मुख्य मार्गावरील आसन फाट्यावर पकडीगुडम धरणातील बारा गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे मुख्य मार्गवरील वाहतूक खोळंबली. यावेळी गडचांदूर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.कोरपना तालुक्यातील अमलनाला व पकडीगुड्डम मोठ्या धरणाची निर्मिती शेतकऱ्यांच्या हितासाठी झाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अजूनही पाणी पोहचलेले नाही. परंतु, तालुक्यातील सिमेंट उद्योगाला या दोन्ही धरणाचे पाणी दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेकांची शेती कोरडवाहू आहे. कंपन्यांशी केलेला करार संपुष्टात आणावा, पकडीगुड्डम धरणाचे पाणी २६८० हेक्टर शेतजमीनीच्या सिंचनाकरिता उपलब्ध करुन द्यावे, १३ गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्यावे, रबी पिकांसाठी धरणाचे पाणी तातडीने सोडण्यात यावे आदी मागण्या रास्ता रोको आंदोलनातून करण्यात आले. शेतकऱ्यांना धरणाचे पाणी न दिल्यास आमरण उपोषण व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मत सोनुर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम आस्वले, मडावी, ईश्वर पडवे, देवराव चांदेकर, मधू करघागे, बंडू देवालकर, हिरालाल पडवे, संतोष टोंगे, शंकर निमकर, मंगेश भोयर, माजी सरपंच भोंगळे यांनी दिला. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (लोकमत चमू)