शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

संध्याकाळी लग्न अन् दुपारीच काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी नागपूरकडून येणाऱ्या एमएच ४० बीक्यू ५४४१ या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत भूषण आणि पवनचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गंभीररीत्या जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : घरात सायंकाळी लग्नकार्य असल्याने, त्यासाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी बोकडे कुटुंबातील तिघे नागभीड दुचाकीने जात होते. मात्र, परसोडी फाट्यावर एका टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नकार्य होत असल्याने, आनंदात असलेल्या बोकडे परिवारावर शोककळा पसरली आहे, तर गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.    भूषण श्यामराव बोकडे (२१), पवन विनोद बोकडे (१५)  अशी मृतकांची नावे आहेत, तर गिरीश सुधाकर बोकडे (१६) सर्व रा.चिखलपरसोडी असे जखमीचे नाव आहे.  आज म्हणजे ७ मे रोजी संध्याकाळी चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी नागपूरकडून येणाऱ्या एमएच ४० बीक्यू ५४४१ या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत भूषण आणि पवनचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गंभीररीत्या जखमी झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गिरीशला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले.

लग्नकार्य स्थगित - बोकडे परिवारातील एका तरुणाचे ७ मे रोजी संध्याकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर येथे लग्नकार्य होते. त्यापूर्वीच मन हेलावून सोडणारी ही घटना घडल्याने हे लग्नकार्य स्थगित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, गावातील इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अक्षता उधळण्याऐवजी धर्मकाडी वाहण्याची वेळभूषण शामराव बोकडे आणि पवन विनोद बोकडे या दोघांवर शनिवारी सायंकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकांच्या चुलतभावाचे लग्नकार्य असल्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर नवरदेवावर अक्षता उधळण्याऐवजी मृतकांच्या सरणावर धर्मकाडी वाहण्याची दुर्दैवी वेळ आली. लग्नासाठी बरीच नातेवाईक मंडळी चिखलपरसोडी येथे आली होती. सायंकाळी लग्न असल्याने दुपारी दोन वाजेदरम्यान ही पाहुणे मंडळी आणि गावकरी या लग्नासाठी भालेश्वर येथे जाणार होते. घरात सर्वत्र लगबग सुरू होती. अशातच घटनेची माहिती मिळाली. लग्नकार्य स्थगित होऊन पाहुण्यांना अंत्यसंस्कारात सहभागी व्हावे लागले.

 

टॅग्स :Accidentअपघात