शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

संध्याकाळी लग्न अन् दुपारीच काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी नागपूरकडून येणाऱ्या एमएच ४० बीक्यू ५४४१ या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत भूषण आणि पवनचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गंभीररीत्या जखमी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : घरात सायंकाळी लग्नकार्य असल्याने, त्यासाठी आवश्यक साहित्य घेण्यासाठी बोकडे कुटुंबातील तिघे नागभीड दुचाकीने जात होते. मात्र, परसोडी फाट्यावर एका टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीररीत्या जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नकार्य होत असल्याने, आनंदात असलेल्या बोकडे परिवारावर शोककळा पसरली आहे, तर गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे.    भूषण श्यामराव बोकडे (२१), पवन विनोद बोकडे (१५)  अशी मृतकांची नावे आहेत, तर गिरीश सुधाकर बोकडे (१६) सर्व रा.चिखलपरसोडी असे जखमीचे नाव आहे.  आज म्हणजे ७ मे रोजी संध्याकाळी चिखलपरसोडी येथे बोकडे परिवारात लग्नकार्य होते. या निमित्ताने काही सामानाची खरेदी करण्यासाठी भूषण बोकडे, पवन बोकडे व गिरीश बोकडे हे तिथे दुचाकीने (एम एच ३१ डी आर १७४७) नागभीडला येत होते. परसोडी रस्त्याने नागभीडकडे दुचाकी वळवत असताना, नेमके त्याच वेळी नागपूरकडून येणाऱ्या एमएच ४० बीक्यू ५४४१ या टिप्परने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, या धडकेत भूषण आणि पवनचा जागीच मृत्यू झाला, तर गिरीश गंभीररीत्या जखमी झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गिरीशला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविले.

लग्नकार्य स्थगित - बोकडे परिवारातील एका तरुणाचे ७ मे रोजी संध्याकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील भालेश्वर येथे लग्नकार्य होते. त्यापूर्वीच मन हेलावून सोडणारी ही घटना घडल्याने हे लग्नकार्य स्थगित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, गावातील इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अक्षता उधळण्याऐवजी धर्मकाडी वाहण्याची वेळभूषण शामराव बोकडे आणि पवन विनोद बोकडे या दोघांवर शनिवारी सायंकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतकांच्या चुलतभावाचे लग्नकार्य असल्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांवर नवरदेवावर अक्षता उधळण्याऐवजी मृतकांच्या सरणावर धर्मकाडी वाहण्याची दुर्दैवी वेळ आली. लग्नासाठी बरीच नातेवाईक मंडळी चिखलपरसोडी येथे आली होती. सायंकाळी लग्न असल्याने दुपारी दोन वाजेदरम्यान ही पाहुणे मंडळी आणि गावकरी या लग्नासाठी भालेश्वर येथे जाणार होते. घरात सर्वत्र लगबग सुरू होती. अशातच घटनेची माहिती मिळाली. लग्नकार्य स्थगित होऊन पाहुण्यांना अंत्यसंस्कारात सहभागी व्हावे लागले.

 

टॅग्स :Accidentअपघात