शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

हवामान केंद्राचे स्थानांतरण अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:48 IST

उन्हाळा मे महिन्याच्या मध्यावर आला आहे. त्यात चंद्रपूर शहराचे तापमान कधी कमी तर कधी अधिक नोंदविले जात आहे.

मनपावर जबाबदारी ढकलली : २०१३ पासून प्रशासनाकडे पाठपुरावालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : उन्हाळा मे महिन्याच्या मध्यावर आला आहे. त्यात चंद्रपूर शहराचे तापमान कधी कमी तर कधी अधिक नोंदविले जात आहे. त्यावर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप नोंदविला आहे. प्रत्यक्षात चंद्रपूरच्या तुकूम परिसरात असलेल्या हवामान मापन केंद्राच्या स्थानांतरणाचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून रखडलेला आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गेल्या २ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोपवून हवामान मापन केंद्र स्थानांतर करण्याची जबाबदारी महानगरपालिकेवर सोपवून कळस केला आहे.चंद्रपूर शहराचे तापमान अधिक असल्याची नोंद ब्रिटिश राजवटीपासून घेण्यात येत आहे. विदर्भात चंद्रपूरचे तापमान अधिक असते, हेदेखील ब्रिटिश काळात नोंदविण्यात आले आहे. त्याकरिता ब्रिटिशांनी तुकूम परिसरात हवामान मापन केंद्राची स्थापन केली आहे. ते केंद्र आता भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भारत मौसम विज्ञान विभागाकडे सोपविण्यात आले आहे. त्या केंद्रातील तापमान व पावसाच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतल्या जातात. या केंद्राची स्थापना करताना तुकूम परिसरात लोकवस्ती नव्हती. आता तेथे अतिक्रमणासह उंच इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे.स्वयंचलित हवामान मापक केंद्राची गरजस्वयंचलित हवामान मापन केंद्र स्थापन करण्याची मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. त्यांनी २०१३ पासून मागणी रेटून धरली आहे. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्याला कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तरीही हा प्रश्न कायम आहे.उदासीनतेमुळे प्रश्न प्रलंबितचंद्रूपर जिल्हा पर्यावरण संतुलन समितीची बैठक १२ डिसेंबर २०१३ रोजी झाली होती. ही बैठक प्रत्येक तीन महिन्यांनी व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात १२ डिसेंबरच्या बैठकीचे इतिवृत्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी यांनी ९ मार्च रोजी उपलब्ध केले. त्यातही हवामान मापक केंद्र स्थानांतरणाची जबाबदारी संबंध नसलेल्या महानगरपालिकेवर सोपविण्यात आली. मनपाकडे नवीन ब्याध जोशींनी लावली आहे.