शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

पाण्याअभावी सोयाबीन करपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: October 3, 2014 01:20 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरूर उपकेंद्रावरून राजुरा तालुक्यातील विहीरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा....

सास्ती : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरूर उपकेंद्रावरून राजुरा तालुक्यातील विहीरगाव, नलफडी, कोहपरा, पंचाळा, चनाखा परिसरातील गावात जवळपास १ हजार १०० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा केला जातो. परंतु हा पुरवठा मागील काही दिवसापासून अनियमित व अपुऱ्या दाबाचा होत असल्याने शेतकरी सिंचनापासून वंचित आहे. सिंचनाअभावी शेतातील उभे पिक करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी हवालदिल झाला आहे.राजुरा तालुक्यातील विरूर, विहीरगाव, नलफडी, मुर्ती, सिंधी, कोहपरा, धानोरा, कविठपेठ, चनाखा, पंचाळा, सातरी, नवी सातरी, चुनाळा या गावातील जवळपास १ हजार १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज पुरवठा देण्यात आला आहे. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात कृषीपंप धारकांना वीज कनेक्शन दिल्यामुळे विजेचा अभाव असून कनेक्शन धारकांना कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंपेसुद्धा चालन नसून सिंचनाची सोय उपलब्ध असूनही अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे मात्र शेती सिंचनापासून वंचित आहे. सध्याच्या काळात शेतातील पिके भरणीवर आली असून पाण्याची आवश्यकता आहे. परंतु सिंचनाअभावी उत्पादन क्षमतेतही मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मोठ्या प्रमाणात कृषी पंप धारकांची संख्या असल्यामुळे वीज पुरवठा अपुरा पडतो. पंप सुरू होताच अनेकदा उच्च दाबामुळे लाईन ट्रिप होते. त्यामुळे वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होतो.या भागात मोठ्या प्रमाणात विद्युत भारनियमन असल्यामुळे दिवसाच्या २४ तासातील फक्त २-३ तासच वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करीत शेती करावी लागत असून आता नविनच संकटाला समोर जावे लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)