शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:35 IST

नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण, संवर्धन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तालुक्यात आहेत. मात्र, काही वर्षांपासून वातावरणात अनिष्ट बदल झाल्याने बºयाच प्रजातींनी स्थलांतरण केले. तर काही प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. त्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत सुुमारे ५० पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्रांचे सहकार्य घेवून वनविभागाने जनजागृती मोहीम सुरू केली पाहिजे. कोणतेही पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाकल्यास त्या तालुक्यातील अधिवासाशी जुळवून घेतील. शिवाय, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली पाहिजे. वाढत्या वृक्षतोडीमुळे ऋतु चक्रावर वाईट परिणाम होत आहे. तप्त उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस पक्ष्यांचे दैनंदिन जीवन बदलत आहे. कावळा, चिमणी, कवडी, गोच्या सुतार, निलकंठ हरेल. मैना, पोपट, बुलबुल, सूर्यपक्षी, सुगरण, शिकरा, हुळी, गिधाड, खार, घुबड, लालपंखांचे कावळे, घोरपड, रानकोंबडी, देवपक्षी, लावे, तितीर, पिंजरा, कोकीळ, सारस, पानबुडी, ढोकरी, सातभाई हे आदी पक्षी सहजपणे दिसत होते. पण, हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. साधारणपणे मार्च ते जुलै महिन्यात पक्ष्यांच्या विनीचा काळ असतो. मात्र, निसर्गातील बदल व सिमेंटीकरणामुळे पक्ष्यांच्या विणीचा काळ बदलला. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे निरीक्षण पक्षी मित्रांनी नोंदविले. निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखणारा गिधाड पक्षी तालुक्यातून दिसेनासा होत झाला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोग तसेच पाण्याअभावी पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हानिकारक बदल झाले आहेत. पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.पेटगाव येथील विद्यालयाचा उपक्रममाणूस आपली तहान सहजपणे भागवू शकतो. मात्र, प्राणी व पक्ष्यांना जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे पक्ष्यांसाठी अंगण, वृक्ष अथवा सावलीमध्ये पाणी ठेवावे, असे आवाहन पक्षी मित्रांनी केले आहे. शिवाय, पक्ष्यांना वाचविण्यासाठी मातीची भांडी व घरट्यांचे वितरण करण्याचा उपक्रम सुरू केला. पेटगाव येथील ग्रामीण विकास विद्यालयाचे शिक्षक व पक्षीमित्र पुंडलिक बावणे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम सुरू केले. दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडांवर पक्ष्यांची घरटी ठेवली जातात. त्यामध्ये पाणी व अन्नाची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की लगेच व्यवस्था करण्यासाठी पुढाकार स्वत:हून पुढाकार घेतात. त्यामुळे झाडांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पक्षी व वन्यप्राण्यांचे संवर्धन काळाची गरज आहे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजविला जात आहे.