शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:35 IST

नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण, संवर्धन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तालुक्यात आहेत. मात्र, काही वर्षांपासून वातावरणात अनिष्ट बदल झाल्याने बºयाच प्रजातींनी स्थलांतरण केले. तर काही प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. त्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत सुुमारे ५० पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्रांचे सहकार्य घेवून वनविभागाने जनजागृती मोहीम सुरू केली पाहिजे. कोणतेही पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाकल्यास त्या तालुक्यातील अधिवासाशी जुळवून घेतील. शिवाय, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली पाहिजे. वाढत्या वृक्षतोडीमुळे ऋतु चक्रावर वाईट परिणाम होत आहे. तप्त उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस पक्ष्यांचे दैनंदिन जीवन बदलत आहे. कावळा, चिमणी, कवडी, गोच्या सुतार, निलकंठ हरेल. मैना, पोपट, बुलबुल, सूर्यपक्षी, सुगरण, शिकरा, हुळी, गिधाड, खार, घुबड, लालपंखांचे कावळे, घोरपड, रानकोंबडी, देवपक्षी, लावे, तितीर, पिंजरा, कोकीळ, सारस, पानबुडी, ढोकरी, सातभाई हे आदी पक्षी सहजपणे दिसत होते. पण, हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. साधारणपणे मार्च ते जुलै महिन्यात पक्ष्यांच्या विनीचा काळ असतो. मात्र, निसर्गातील बदल व सिमेंटीकरणामुळे पक्ष्यांच्या विणीचा काळ बदलला. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे निरीक्षण पक्षी मित्रांनी नोंदविले. निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखणारा गिधाड पक्षी तालुक्यातून दिसेनासा होत झाला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोग तसेच पाण्याअभावी पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हानिकारक बदल झाले आहेत. पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.पेटगाव येथील विद्यालयाचा उपक्रममाणूस आपली तहान सहजपणे भागवू शकतो. मात्र, प्राणी व पक्ष्यांना जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे पक्ष्यांसाठी अंगण, वृक्ष अथवा सावलीमध्ये पाणी ठेवावे, असे आवाहन पक्षी मित्रांनी केले आहे. शिवाय, पक्ष्यांना वाचविण्यासाठी मातीची भांडी व घरट्यांचे वितरण करण्याचा उपक्रम सुरू केला. पेटगाव येथील ग्रामीण विकास विद्यालयाचे शिक्षक व पक्षीमित्र पुंडलिक बावणे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम सुरू केले. दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडांवर पक्ष्यांची घरटी ठेवली जातात. त्यामध्ये पाणी व अन्नाची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की लगेच व्यवस्था करण्यासाठी पुढाकार स्वत:हून पुढाकार घेतात. त्यामुळे झाडांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पक्षी व वन्यप्राण्यांचे संवर्धन काळाची गरज आहे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजविला जात आहे.