शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:35 IST

नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण, संवर्धन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तालुक्यात आहेत. मात्र, काही वर्षांपासून वातावरणात अनिष्ट बदल झाल्याने बºयाच प्रजातींनी स्थलांतरण केले. तर काही प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. त्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत सुुमारे ५० पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्रांचे सहकार्य घेवून वनविभागाने जनजागृती मोहीम सुरू केली पाहिजे. कोणतेही पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाकल्यास त्या तालुक्यातील अधिवासाशी जुळवून घेतील. शिवाय, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली पाहिजे. वाढत्या वृक्षतोडीमुळे ऋतु चक्रावर वाईट परिणाम होत आहे. तप्त उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस पक्ष्यांचे दैनंदिन जीवन बदलत आहे. कावळा, चिमणी, कवडी, गोच्या सुतार, निलकंठ हरेल. मैना, पोपट, बुलबुल, सूर्यपक्षी, सुगरण, शिकरा, हुळी, गिधाड, खार, घुबड, लालपंखांचे कावळे, घोरपड, रानकोंबडी, देवपक्षी, लावे, तितीर, पिंजरा, कोकीळ, सारस, पानबुडी, ढोकरी, सातभाई हे आदी पक्षी सहजपणे दिसत होते. पण, हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. साधारणपणे मार्च ते जुलै महिन्यात पक्ष्यांच्या विनीचा काळ असतो. मात्र, निसर्गातील बदल व सिमेंटीकरणामुळे पक्ष्यांच्या विणीचा काळ बदलला. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे निरीक्षण पक्षी मित्रांनी नोंदविले. निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखणारा गिधाड पक्षी तालुक्यातून दिसेनासा होत झाला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोग तसेच पाण्याअभावी पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हानिकारक बदल झाले आहेत. पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.पेटगाव येथील विद्यालयाचा उपक्रममाणूस आपली तहान सहजपणे भागवू शकतो. मात्र, प्राणी व पक्ष्यांना जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे पक्ष्यांसाठी अंगण, वृक्ष अथवा सावलीमध्ये पाणी ठेवावे, असे आवाहन पक्षी मित्रांनी केले आहे. शिवाय, पक्ष्यांना वाचविण्यासाठी मातीची भांडी व घरट्यांचे वितरण करण्याचा उपक्रम सुरू केला. पेटगाव येथील ग्रामीण विकास विद्यालयाचे शिक्षक व पक्षीमित्र पुंडलिक बावणे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम सुरू केले. दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडांवर पक्ष्यांची घरटी ठेवली जातात. त्यामध्ये पाणी व अन्नाची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की लगेच व्यवस्था करण्यासाठी पुढाकार स्वत:हून पुढाकार घेतात. त्यामुळे झाडांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पक्षी व वन्यप्राण्यांचे संवर्धन काळाची गरज आहे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजविला जात आहे.