शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:35 IST

नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देपक्षीमित्रांमध्ये चिंता : दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण, संवर्धन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : नागरिकांची अनास्था, बेसुमार वृक्षतोड आणि तीव्र उष्णतेमुळे तालुक्यातील सुमारे ५० दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्षी संवर्धनासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास हे पक्षी कायमचे नष्ट होतील, अशी भिती पक्षी मित्रांनी व्यक्त केली आहे.अतिसंवेदनशील वर्गात मोडणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तालुक्यात आहेत. मात्र, काही वर्षांपासून वातावरणात अनिष्ट बदल झाल्याने बºयाच प्रजातींनी स्थलांतरण केले. तर काही प्रजाती बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत. त्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत सुुमारे ५० पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे संवर्धनासाठी नागरिक व पक्षी मित्रांचे सहकार्य घेवून वनविभागाने जनजागृती मोहीम सुरू केली पाहिजे. कोणतेही पक्षी घराच्या आश्रयाला आले तर मुठभर धान्य टाकल्यास त्या तालुक्यातील अधिवासाशी जुळवून घेतील. शिवाय, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली पाहिजे. वाढत्या वृक्षतोडीमुळे ऋतु चक्रावर वाईट परिणाम होत आहे. तप्त उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस पक्ष्यांचे दैनंदिन जीवन बदलत आहे. कावळा, चिमणी, कवडी, गोच्या सुतार, निलकंठ हरेल. मैना, पोपट, बुलबुल, सूर्यपक्षी, सुगरण, शिकरा, हुळी, गिधाड, खार, घुबड, लालपंखांचे कावळे, घोरपड, रानकोंबडी, देवपक्षी, लावे, तितीर, पिंजरा, कोकीळ, सारस, पानबुडी, ढोकरी, सातभाई हे आदी पक्षी सहजपणे दिसत होते. पण, हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. साधारणपणे मार्च ते जुलै महिन्यात पक्ष्यांच्या विनीचा काळ असतो. मात्र, निसर्गातील बदल व सिमेंटीकरणामुळे पक्ष्यांच्या विणीचा काळ बदलला. त्यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे निरीक्षण पक्षी मित्रांनी नोंदविले. निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखणारा गिधाड पक्षी तालुक्यातून दिसेनासा होत झाला आहे. मांसाहारी अन्न मिळण्यात अडथळा, शिकार, विषप्रयोग तसेच पाण्याअभावी पक्ष्यांची संख्या रोडावली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे हानिकारक बदल झाले आहेत. पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट केला जात आहे. याला आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.पेटगाव येथील विद्यालयाचा उपक्रममाणूस आपली तहान सहजपणे भागवू शकतो. मात्र, प्राणी व पक्ष्यांना जीवाचे रान करावे लागते. त्यामुळे पक्ष्यांसाठी अंगण, वृक्ष अथवा सावलीमध्ये पाणी ठेवावे, असे आवाहन पक्षी मित्रांनी केले आहे. शिवाय, पक्ष्यांना वाचविण्यासाठी मातीची भांडी व घरट्यांचे वितरण करण्याचा उपक्रम सुरू केला. पेटगाव येथील ग्रामीण विकास विद्यालयाचे शिक्षक व पक्षीमित्र पुंडलिक बावणे यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम सुरू केले. दरवर्षी शाळेच्या मैदानावरील झाडांवर पक्ष्यांची घरटी ठेवली जातात. त्यामध्ये पाणी व अन्नाची व्यवस्था केली जाते. पाणी संपले की लगेच व्यवस्था करण्यासाठी पुढाकार स्वत:हून पुढाकार घेतात. त्यामुळे झाडांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्य करीत आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पक्षी व वन्यप्राण्यांचे संवर्धन काळाची गरज आहे, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रूजविला जात आहे.