शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

प्राचीन विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:48 IST

चिमूर तालुक्यातील चिमूर ते मासळ (बु.) मार्गावरील तुकुम गावाजवळ सम्राट अशोककालिन पायऱ्यांची ऐतिहासिक विहिर प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही वरदान आहे. इतिहासाची साक्ष देणाºया विहिरीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्य तीव्र नाराजी पसरली.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : विहिरीचे जतन केल्यास जलसंकटावर मात करणे शक्य

प्रकाश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमासळ (बु.) : चिमूर तालुक्यातील चिमूर ते मासळ (बु.) मार्गावरील तुकुम गावाजवळ सम्राट अशोककालिन पायऱ्यांची ऐतिहासिक विहिर प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही वरदान आहे. इतिहासाची साक्ष देणाºया विहिरीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्य तीव्र नाराजी पसरली.चिमूर ते मासळ मार्गावर इसवी सनपूर्व सम्राट अशोक कालखंडात पायऱ्यांची विहिर बांधण्यात आली. मासळ परिसरात पूर्वी दळणवळणाची सुविधा नव्हती. त्यामुळे पायदळ, बैलगाडी अथवा सायकलने प्रवास करून जीवनावश्यक वस्तु व कार्यालयीन कामाकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाताना पायºयाच्या विहिरीजवळ विसावा घेणारे शेकडो साक्षीदार परिसरात आहेत. शेतकरी व बैलांची तहान भागविण्यासाठी पायºयांच्या विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. ही विहिर परिसरातील एकमेव ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा आहे. पायऱ्यांची विहिर म्हणूनच तालुक्यात प्रसिद्ध आहे. विहिरीचे बांधकाम सम्राट अशोकालिन पद्धतीची आहे. मासळ परिसर हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाचे कोलारा, मदनापूर अलीझंजा असे तीन प्रवेशद्वार आहेत. देश-विदेशातील पर्यटक व्याघ्र प्रकल्पात येतात. ऐतिहासिक पायºयांच्या विहिरीला भेट देतात. परंतु विहिरीकडे पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली. अस्वच्छतेमुळे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. पण, प्रशासनाला या विहिरीचे महत्त्व अजुनही कळले नाही. विहिरीमध्ये कचरा साचला. झुडपांमुळे विहिरीचे निरीक्षण करणे कठीण जाते. पुरातत्त्व विभागाने अभ्यासकांचे पथक पाठवून सर्वेक्षण करण्याची गरज आहे. यातून इतिहासाच्या तेजस्वी कालखंडावर प्रकाश पडू शकते.लोकप्रतिनिधी उदासीनप्राचीन पायऱ्यांच्या विहिरीचे जतन केल्यास जलसंकटावर मात करता येते. शिवाय, अभ्यासकांना इतिहासाचे दुवे शोधण्यास मदत होते. पुरातत्त्व विभागाकडे दुर्लक्ष असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासीन आहे.