शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

प्राचीन विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 21:48 IST

चिमूर तालुक्यातील चिमूर ते मासळ (बु.) मार्गावरील तुकुम गावाजवळ सम्राट अशोककालिन पायऱ्यांची ऐतिहासिक विहिर प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही वरदान आहे. इतिहासाची साक्ष देणाºया विहिरीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्य तीव्र नाराजी पसरली.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : विहिरीचे जतन केल्यास जलसंकटावर मात करणे शक्य

प्रकाश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमासळ (बु.) : चिमूर तालुक्यातील चिमूर ते मासळ (बु.) मार्गावरील तुकुम गावाजवळ सम्राट अशोककालिन पायऱ्यांची ऐतिहासिक विहिर प्रसिद्ध आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही वरदान आहे. इतिहासाची साक्ष देणाºया विहिरीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्य तीव्र नाराजी पसरली.चिमूर ते मासळ मार्गावर इसवी सनपूर्व सम्राट अशोक कालखंडात पायऱ्यांची विहिर बांधण्यात आली. मासळ परिसरात पूर्वी दळणवळणाची सुविधा नव्हती. त्यामुळे पायदळ, बैलगाडी अथवा सायकलने प्रवास करून जीवनावश्यक वस्तु व कार्यालयीन कामाकरिता तालुक्याच्या ठिकाणी जाताना पायºयाच्या विहिरीजवळ विसावा घेणारे शेकडो साक्षीदार परिसरात आहेत. शेतकरी व बैलांची तहान भागविण्यासाठी पायºयांच्या विहिरीतील पाण्याचा वापर केला जात होता. ही विहिर परिसरातील एकमेव ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा आहे. पायऱ्यांची विहिर म्हणूनच तालुक्यात प्रसिद्ध आहे. विहिरीचे बांधकाम सम्राट अशोकालिन पद्धतीची आहे. मासळ परिसर हा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी व्याघ्र प्रकल्पाचे कोलारा, मदनापूर अलीझंजा असे तीन प्रवेशद्वार आहेत. देश-विदेशातील पर्यटक व्याघ्र प्रकल्पात येतात. ऐतिहासिक पायºयांच्या विहिरीला भेट देतात. परंतु विहिरीकडे पुरातत्त्व विभाग आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली. अस्वच्छतेमुळे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. पण, प्रशासनाला या विहिरीचे महत्त्व अजुनही कळले नाही. विहिरीमध्ये कचरा साचला. झुडपांमुळे विहिरीचे निरीक्षण करणे कठीण जाते. पुरातत्त्व विभागाने अभ्यासकांचे पथक पाठवून सर्वेक्षण करण्याची गरज आहे. यातून इतिहासाच्या तेजस्वी कालखंडावर प्रकाश पडू शकते.लोकप्रतिनिधी उदासीनप्राचीन पायऱ्यांच्या विहिरीचे जतन केल्यास जलसंकटावर मात करता येते. शिवाय, अभ्यासकांना इतिहासाचे दुवे शोधण्यास मदत होते. पुरातत्त्व विभागाकडे दुर्लक्ष असले तरी स्थानिक लोकप्रतिनिधीही उदासीन आहे.