शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळणार

By admin | Updated: November 11, 2015 00:37 IST

येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लघु सिंचन उपविभाग कर्मचाऱ्याविना : शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा डावब्रह्मपुरी : येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.ब्रह्मपुरी लघु सिंचन (जलसंधारण) उपविभागांतर्गत नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा समावेश आहे. या विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान, कोल्हापुरी बंधारे, सन २०१४ ते २०१९ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. परंतु या विभागात पाच शाखा अभियंता पदे मंजूर असताना केवळ एका शाखा अभियंताच्या खांद्यावर ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा भार आहे. एक शाखा अभियंता कार्यरत असून ३१ जानेवारी २०१६ ला सेवानिवृत्त होत असल्याने केवळ उपविभागीय अधिकारी शिल्लक सेवेत राहणार आहे. म्हणजे पाचही शाखा अभियंत्यांची पदे येत्या काही काळात रिक्त राहणार असल्याने जलशिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे कसे तयार करावे, असा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. परंतु दुसरीकडे योजनांची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसल्याने चारही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करण्याचा डाव रचला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या बैठकीला उपस्थित रहावयचे की शाखा अभियंत्याची कामे करायची, असा मोठा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यासह अन्य तालुक्याचे मोठे नुकसान शाखा अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे होत आहे. शाखा अभियंता पदे भरत नसल्याने हे कार्यालयच बंद पाडण्याची योजना केली असावी असाही सूर व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष ग्रामीण जनतेशी थेट संबंध येत असल्याने या कार्यालयाला साधे निरीक्षण वाहन कायमस्वरूपी नसल्याने कामांना गती मिळत नाही. शासन अनेक योजना सुरू करताना त्या योजना राबविणाऱ्या यंत्रणेचा पर्यायी विचार न केल्याने किंवा या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकाऱ्यावर काढला जात आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जलयुक्त शिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन चारही तालुक्यातील रिक्त पदे ताबडतोब भरण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)