शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळणार

By admin | Updated: November 11, 2015 00:37 IST

येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

लघु सिंचन उपविभाग कर्मचाऱ्याविना : शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा डावब्रह्मपुरी : येथे लघु सिंचन (जलसंधारण) उपविभाग कार्यालय आहे. मात्र या कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने या विभागाद्वारे राबविली जाणारी जलयुक्त शिवार अभियानाची कामे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.ब्रह्मपुरी लघु सिंचन (जलसंधारण) उपविभागांतर्गत नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा समावेश आहे. या विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान, कोल्हापुरी बंधारे, सन २०१४ ते २०१९ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. परंतु या विभागात पाच शाखा अभियंता पदे मंजूर असताना केवळ एका शाखा अभियंताच्या खांद्यावर ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्याचा भार आहे. एक शाखा अभियंता कार्यरत असून ३१ जानेवारी २०१६ ला सेवानिवृत्त होत असल्याने केवळ उपविभागीय अधिकारी शिल्लक सेवेत राहणार आहे. म्हणजे पाचही शाखा अभियंत्यांची पदे येत्या काही काळात रिक्त राहणार असल्याने जलशिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे कसे तयार करावे, असा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यासमोर उभा ठाकला आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. परंतु दुसरीकडे योजनांची पूर्तता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पदे भरली जात नसल्याने चारही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करण्याचा डाव रचला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या बैठकीला उपस्थित रहावयचे की शाखा अभियंत्याची कामे करायची, असा मोठा प्रश्न उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यासह अन्य तालुक्याचे मोठे नुकसान शाखा अभियंत्याच्या रिक्त पदांमुळे होत आहे. शाखा अभियंता पदे भरत नसल्याने हे कार्यालयच बंद पाडण्याची योजना केली असावी असाही सूर व्यक्त केला जात आहे. प्रत्यक्ष ग्रामीण जनतेशी थेट संबंध येत असल्याने या कार्यालयाला साधे निरीक्षण वाहन कायमस्वरूपी नसल्याने कामांना गती मिळत नाही. शासन अनेक योजना सुरू करताना त्या योजना राबविणाऱ्या यंत्रणेचा पर्यायी विचार न केल्याने किंवा या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा रोष अधिकाऱ्यावर काढला जात आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरणारे जलयुक्त शिवार अभियान व कोल्हापुरी बंधारे शासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेऊन चारही तालुक्यातील रिक्त पदे ताबडतोब भरण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)