शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीमुळे ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:39 IST

राजुरा तालुक्यातील भूमीगत व खुल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. वेकोलि कोळसा खाणीत पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने परिसरातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.

ठळक मुद्देखाणीत पाण्याचा उपसा : वेकोलि परिसरातील सात गावांवर जलसंकट

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील भूमीगत व खुल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. वेकोलि कोळसा खाणीत पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने परिसरातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव, चिंचोली, परिसरात वेकोलिच्या खुल्या व भूमिगत कोळसा खाणी आहेत. वेकोलि प्रशासनाने पाण्याचा प्रचंड उपसा सुरू केला. त्यामुळे अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे. हातपंप, बोअरवेल आटले आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर हाच प्रकार घडतो. पाण्यासाठी गावकऱ्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. वेकोलिने कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग केली जाते. परिणामी, शेतातील बोअरवेल, घरगुती हातपंपांना धक्का बसून त्या बंद पडत आहेत. वेकोलिच्या मनमानी कारभारामुळेच गावकºयांना नेहमी त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी अल्प पाऊस पडला. त्यामुळे या परिसरातील पाण्याची पातळी दिवाळीपासूनच खालावली. जनावरांना प्यायला पाणी नाही. नदी व नाले कोरडे पडले. वेकोलिने मनमानी उपसा सुरू केल्याने परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेकोलिच्या खाणी सुरू होण्यापूर्वी गावात पाणीटंचाई नव्हती. मात्र, कोळसा खाणी सुरू होताच पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेकोलिवर प्रतिबंध घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.भाजीपाला पिकांनाही फ टकागोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव व चिंचोली परिसरातील अनेक शेतकरी विविध पिकांसह भाजापाल्याची पिकेही घेत आहेत. पारंपरिक शेतीला टाळून नगदी पिकांंकडे त्यांचा कल वाढू लागला. काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी खोदल्या. तर काहींनी स्वबळावर विहिर खोदून विविध पिके घेण्याचे धाडस केले. मात्र, वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या. अनेक हातपंप बंद झाले. त्यामुळे भाजीपाल्याची पिके धोक्यात आली आहेत. बºयाच शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली. उत्पन्नच झाले नाही तर कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न पुढे आला. वेकोलिने बेसुमार उपसा बंद केला नाही तर आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घालावामार्च महिना सुरू झाल्यापासूनच सात गावांमध्ये पाणी टंचाई सुरू झाली. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळा कसा काढावा, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी वेकोलिच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.