शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कोळसा खाणीमुळे ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:39 IST

राजुरा तालुक्यातील भूमीगत व खुल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. वेकोलि कोळसा खाणीत पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने परिसरातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.

ठळक मुद्देखाणीत पाण्याचा उपसा : वेकोलि परिसरातील सात गावांवर जलसंकट

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील भूमीगत व खुल्या कोळसा खाणींमुळे वेकोलि परिसरातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांची भटकंती सुरू झाली आहे. वेकोलि कोळसा खाणीत पाण्याचा बेसुमार उपसा सुरू असल्याने परिसरातील पाण्याची पातळी खाली गेली आहे.गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव, चिंचोली, परिसरात वेकोलिच्या खुल्या व भूमिगत कोळसा खाणी आहेत. वेकोलि प्रशासनाने पाण्याचा प्रचंड उपसा सुरू केला. त्यामुळे अनेक गावांत टंचाई निर्माण झाली आहे. हातपंप, बोअरवेल आटले आहेत. दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यानंतर हाच प्रकार घडतो. पाण्यासाठी गावकऱ्यांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. वेकोलिने कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टिंग केली जाते. परिणामी, शेतातील बोअरवेल, घरगुती हातपंपांना धक्का बसून त्या बंद पडत आहेत. वेकोलिच्या मनमानी कारभारामुळेच गावकºयांना नेहमी त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षी अल्प पाऊस पडला. त्यामुळे या परिसरातील पाण्याची पातळी दिवाळीपासूनच खालावली. जनावरांना प्यायला पाणी नाही. नदी व नाले कोरडे पडले. वेकोलिने मनमानी उपसा सुरू केल्याने परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वेकोलिच्या खाणी सुरू होण्यापूर्वी गावात पाणीटंचाई नव्हती. मात्र, कोळसा खाणी सुरू होताच पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने वेकोलिवर प्रतिबंध घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.भाजीपाला पिकांनाही फ टकागोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव व चिंचोली परिसरातील अनेक शेतकरी विविध पिकांसह भाजापाल्याची पिकेही घेत आहेत. पारंपरिक शेतीला टाळून नगदी पिकांंकडे त्यांचा कल वाढू लागला. काही शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून सिंचन विहिरी खोदल्या. तर काहींनी स्वबळावर विहिर खोदून विविध पिके घेण्याचे धाडस केले. मात्र, वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे या परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या. अनेक हातपंप बंद झाले. त्यामुळे भाजीपाल्याची पिके धोक्यात आली आहेत. बºयाच शेतकºयांनी कर्ज काढून शेती केली. उत्पन्नच झाले नाही तर कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न पुढे आला. वेकोलिने बेसुमार उपसा बंद केला नाही तर आंदोलन करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घालावामार्च महिना सुरू झाल्यापासूनच सात गावांमध्ये पाणी टंचाई सुरू झाली. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे उन्हाळा कसा काढावा, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी वेकोलिच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टमंडळ नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.