शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारने ‘जलसंजीवनी’

By admin | Updated: September 30, 2015 01:24 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट झेलावे लागते. मान्सून कालावधीत

मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूरवरुणराजाच्या अवकृपेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट झेलावे लागते. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाले तर भूजल पातळीत घट येऊन शेतपिकांना पाणी देणे अवघड जाते. मात्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे ही अडचण आता काही प्रमाणात दूर झाली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक गावात पाण्याचे स्त्रोत वाढले असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २१८ कामे करण्यात आली आहेत. या कामांवर ३६ कोटी ६२ लाख रूपये खर्च झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान १ जानेवारीपासून सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावांना पाणी टंचाईमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देऊन उपलब्ध जलस्त्रोताच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला. त्यामुळे अनेक गावांना याचा फायदा झाला आहे. जिल्हाभरात विविध विभागाच्या निधीतून ४ हजार २१८ कामे करण्यात आली असून यासाठी ८६ कोटी २७ लाख ३० हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला. यात प्रत्यक्षात ३६ कोटी ६२ लाख ५० हजार रूपये खर्च झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून झालेली कामेअभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात आली. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून झाली आणि कामांचे मूल्यमापनही करण्यात आले. असा आहे अभियानाचा उद्देशलोकसहभागातून जलस्त्रोतांचा साठा वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पावसाचे पाणी शिवारात अडविणे, भुर्गभातील पाणी पातळी वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढवून शेतीला पाणी देणे, पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, नविन कामे हाती घेणे, अस्तीत्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुर्नस्थापीत करणे आदी कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.शेतकऱ्यांना झाला लाभयावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. पेरणी केल्यानंतर पावसाने दगा दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या तलाव, बोड्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सोयीचे ठरले.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरविणे व पाणी पातळी वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. यावर्षी या अभियानाच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण झाली असून अत्यल्प पावसात या अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या तलाव, बोड्यांचे पाणी शेतकऱ्यांना कामी आले. पहिल्या वर्षी या अभियानासाठी २१८ गावांची निवड करण्यात आली असून पाच वर्षात या अभियानाची कामे करायची आहेत. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा लाभ शेतकरी व नागरिकांना होईल.- डॉ. दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी, चंद्रपूर.