शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

जलयुक्त शिवारने ‘जलसंजीवनी’

By admin | Updated: September 30, 2015 01:24 IST

वरुणराजाच्या अवकृपेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट झेलावे लागते. मान्सून कालावधीत

मंगेश भांडेकर ल्ल चंद्रपूरवरुणराजाच्या अवकृपेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट झेलावे लागते. मान्सून कालावधीत कमी पर्जन्यमान झाले तर भूजल पातळीत घट येऊन शेतपिकांना पाणी देणे अवघड जाते. मात्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामुळे ही अडचण आता काही प्रमाणात दूर झाली आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून अनेक गावात पाण्याचे स्त्रोत वाढले असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार २१८ कामे करण्यात आली आहेत. या कामांवर ३६ कोटी ६२ लाख रूपये खर्च झाले आहे.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने राज्यभरात जलयुक्त शिवार अभियान १ जानेवारीपासून सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावांना पाणी टंचाईमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रत्येक जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देऊन उपलब्ध जलस्त्रोताच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला. त्यामुळे अनेक गावांना याचा फायदा झाला आहे. जिल्हाभरात विविध विभागाच्या निधीतून ४ हजार २१८ कामे करण्यात आली असून यासाठी ८६ कोटी २७ लाख ३० हजार रूपयाचा निधी उपलब्ध झाला. यात प्रत्यक्षात ३६ कोटी ६२ लाख ५० हजार रूपये खर्च झाले आहेत. अभियानाच्या माध्यमातून झालेली कामेअभियानाच्या माध्यमातून कृषी, लघुसिंचन, जलसंपदा व जिल्हा परिषदेच्या वतीने गाव तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, सिमेंट क्रॉक्रीट बंधारे बांधकाम, जुन्या जलसंरचनाचे पुनर्जीवन, जोड प्रकल्प राबविणे, कालवा दुरुस्ती, वृक्ष लागवड, तलावातील गाळ काढणे, मोठ्या व मध्यम प्रकल्पाची उपयोगीता वाढविणे आदी कामे करण्यात आली. ही कामे जिल्हास्तरावर उपलब्ध होणाऱ्या निधीतून झाली आणि कामांचे मूल्यमापनही करण्यात आले. असा आहे अभियानाचा उद्देशलोकसहभागातून जलस्त्रोतांचा साठा वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पावसाचे पाणी शिवारात अडविणे, भुर्गभातील पाणी पातळी वाढविणे, सिंचन क्षेत्र वाढवून शेतीला पाणी देणे, पाणी वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, नविन कामे हाती घेणे, अस्तीत्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता पुर्नस्थापीत करणे आदी कामे या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आली.शेतकऱ्यांना झाला लाभयावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. पेरणी केल्यानंतर पावसाने दगा दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र जलयुक्त शिवारच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या तलाव, बोड्यामध्ये पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे सोयीचे ठरले.जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जमिनीत पाणी मुरविणे व पाणी पातळी वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. यावर्षी या अभियानाच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण झाली असून अत्यल्प पावसात या अभियानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या तलाव, बोड्यांचे पाणी शेतकऱ्यांना कामी आले. पहिल्या वर्षी या अभियानासाठी २१८ गावांची निवड करण्यात आली असून पाच वर्षात या अभियानाची कामे करायची आहेत. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा लाभ शेतकरी व नागरिकांना होईल.- डॉ. दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी, चंद्रपूर.