शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

चेक ठाणेवासना येथील पाण्याची टाकी ठरली शोभेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST

घोसरी : चेक ठाणेवासना येथील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने लाखो रुपये खर्चून जल स्वराज्य प्रकल्प ...

घोसरी : चेक ठाणेवासना येथील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने लाखो रुपये खर्चून जल स्वराज्य प्रकल्प १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. परंतु निकृष्ट बांधकामामुळे टाकीमध्ये पाणी संचय होत नसल्याने येथील जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेकठाणेवासना येथे १५ वर्षांपूर्वी जल स्वराज्य प्रकल्प कार्यान्वित करण्यात आली होती. याकरिता ३७ लाख खर्ची करण्यात येऊन १० टक्के लोकसहभागाचा समावेश होता.

सदर प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याने टाकीत साठविण्यात आलेल्या पाण्याची गळती होऊन टाकी रिकामी होत असते. परिणामी लाखो रुपये खर्चूनसुध्दा येथील जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित राहून अन्य स्तोत्रातील पाण्यावर तृष्णा भागविण्याची नामुष्की जनतेवर ओढवली आहे.

तद्वतच नदीवरील पंप हाऊस व तेथील मोटारसुध्दा शोभेची ठरली आहे. सदर प्रकल्पाच्या कामात गैरप्रकार झाला असल्याने याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे व गावकऱ्यांनी केलेली आहे.