शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चेक ठाणेवासना येथील पाण्याची टाकी ठरली शोभेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST

घोसरी : चेक ठाणेवासना येथील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने लाखो रुपये खर्चून जल स्वराज्य प्रकल्प ...

घोसरी : चेक ठाणेवासना येथील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, या हेतूने लाखो रुपये खर्चून जल स्वराज्य प्रकल्प १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आले होते. परंतु निकृष्ट बांधकामामुळे टाकीमध्ये पाणी संचय होत नसल्याने येथील जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत चेकठाणेवासना येथे १५ वर्षांपूर्वी जल स्वराज्य प्रकल्प कार्यान्वित करण्यात आली होती. याकरिता ३७ लाख खर्ची करण्यात येऊन १० टक्के लोकसहभागाचा समावेश होता.

सदर प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याने टाकीत साठविण्यात आलेल्या पाण्याची गळती होऊन टाकी रिकामी होत असते. परिणामी लाखो रुपये खर्चूनसुध्दा येथील जनतेला शुद्ध पाण्यापासून वंचित राहून अन्य स्तोत्रातील पाण्यावर तृष्णा भागविण्याची नामुष्की जनतेवर ओढवली आहे.

तद्वतच नदीवरील पंप हाऊस व तेथील मोटारसुध्दा शोभेची ठरली आहे. सदर प्रकल्पाच्या कामात गैरप्रकार झाला असल्याने याबाबत सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य वैभव पिंपळशेंडे व गावकऱ्यांनी केलेली आहे.