शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

या २३ गावांत सौरऊर्जेच्या माध्यमातून होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:43 IST

Chandrapur : प्रति व्यक्तीला प्रति दिवस ५५ लिटर पाण्याचे केले आहे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या अनुषंगाने जलजीवन मिशन अंतर्गत कालबद्ध कार्यक्रम आखून अस्तित्वात असलेल्या नळ योजनांचे पुनर्जीवन करणे व नवीन नळ योजनांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. सदर योजनेचा आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रति दिवस ५५ लिटर पाणी पुरविण्याचे नियोजन ठेवून ९९ योजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहे. यात २३ गावात सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये एकूण ९९ योजनांचा आराखडा तयार करून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरापर्यंत पाणी पोहचविण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. सद्यस्थितीत ९९ पैकी ५५ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्यात आली असून, ४४ योजनांची नळ जोडणीची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे एकूण आराखड्यापैकी २३ योजना सौर ऊर्जेवर आधारित तयार करण्यात आल्या असून, विद्युत बिलाच्या तणावामधून ग्रामस्थांना कायम मुक्त करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर योजनांचा आराखडा तयार करण्यापासून ते कार्यान्वित करण्यापर्यंतची सर्वच इत्तंभूत माहिती दिली. 

वरिष्ठांचे होतेय मार्गदर्शनसदर योजनांची कामे करताना येणाऱ्या प्रशासकीय तांत्रिक अडचणी, तसेच स्थानिक अडचणी आल्या, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात सोडवून यशस्वी करण्यात आल्याचे व उर्वरित योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम यांनी सांगितले.

९१ योजनांचेआराखडे तयार करण्यात आले असून, लवकरच या योजना नागरिकांसाठी कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

१५ योजनांचा पाणीपुरवठा अविरत सुरू१५ योजनांचा पाणीपुरवठा अविरत सुरू आहे. या यशस्वी योजनांपैकी गायडोंगरी, परसोडी (झिलबोडी) व माहेर या तिन्ही योजनांचा पाणीपुरवठा सौर पंपाद्वारे होत असल्याने, ग्रामस्थांना पाणीपट्टीच्या करापासून कायम मुक्तता झाली. या तिन्ही योजनांद्वारे सर्व कुटुंबांना आवश्यक व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असून, शाळा, अंगणवाडी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योजनांच्या यशस्वी कार्यान्वयाबाबत सरपंच सचिव व ग्रामस्थांनी आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

"गायडोंगरी, परसोडी, माहेर यासारख्या २३ गावांतील नळयोजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आल्या असून, याठिकाणी विद्युतची गरज नसल्याने विद्युत बिलापासून मुक्तता झाली आहे."- साहेबलाल मेश्राम, शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग ब्रम्हपुरी.

टॅग्स :water transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर