शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

या २३ गावांत सौरऊर्जेच्या माध्यमातून होणार पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:43 IST

Chandrapur : प्रति व्यक्तीला प्रति दिवस ५५ लिटर पाण्याचे केले आहे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या अनुषंगाने जलजीवन मिशन अंतर्गत कालबद्ध कार्यक्रम आखून अस्तित्वात असलेल्या नळ योजनांचे पुनर्जीवन करणे व नवीन नळ योजनांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. सदर योजनेचा आराखडा तयार करताना गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रति दिवस ५५ लिटर पाणी पुरविण्याचे नियोजन ठेवून ९९ योजनांचे आराखडे तयार करण्यात आले आहे. यात २३ गावात सौरऊर्जेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये एकूण ९९ योजनांचा आराखडा तयार करून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरापर्यंत पाणी पोहचविण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले. सद्यस्थितीत ९९ पैकी ५५ योजनांची कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण करण्यात आली असून, ४४ योजनांची नळ जोडणीची कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे एकूण आराखड्यापैकी २३ योजना सौर ऊर्जेवर आधारित तयार करण्यात आल्या असून, विद्युत बिलाच्या तणावामधून ग्रामस्थांना कायम मुक्त करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदर योजनांचा आराखडा तयार करण्यापासून ते कार्यान्वित करण्यापर्यंतची सर्वच इत्तंभूत माहिती दिली. 

वरिष्ठांचे होतेय मार्गदर्शनसदर योजनांची कामे करताना येणाऱ्या प्रशासकीय तांत्रिक अडचणी, तसेच स्थानिक अडचणी आल्या, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनात सोडवून यशस्वी करण्यात आल्याचे व उर्वरित योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे शाखा अभियंता साहेबलाल मेश्राम यांनी सांगितले.

९१ योजनांचेआराखडे तयार करण्यात आले असून, लवकरच या योजना नागरिकांसाठी कार्यान्वित केल्या जाणार आहेत.

१५ योजनांचा पाणीपुरवठा अविरत सुरू१५ योजनांचा पाणीपुरवठा अविरत सुरू आहे. या यशस्वी योजनांपैकी गायडोंगरी, परसोडी (झिलबोडी) व माहेर या तिन्ही योजनांचा पाणीपुरवठा सौर पंपाद्वारे होत असल्याने, ग्रामस्थांना पाणीपट्टीच्या करापासून कायम मुक्तता झाली. या तिन्ही योजनांद्वारे सर्व कुटुंबांना आवश्यक व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत असून, शाळा, अंगणवाडी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. योजनांच्या यशस्वी कार्यान्वयाबाबत सरपंच सचिव व ग्रामस्थांनी आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

"गायडोंगरी, परसोडी, माहेर यासारख्या २३ गावांतील नळयोजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आल्या असून, याठिकाणी विद्युतची गरज नसल्याने विद्युत बिलापासून मुक्तता झाली आहे."- साहेबलाल मेश्राम, शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग ब्रम्हपुरी.

टॅग्स :water transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर