शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: October 28, 2015 02:19 IST

नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. सारेच त्यात व्यस्त आहेत. यात गावात गत तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही,

सारेच निवडणुकीत व्यस्त : थकीत रकमेसाठी पाणीपुरवठा बंदची चर्चाआष्टी (शहीद) : नगरपंचायतची निवडणूक लागली आहे. सारेच त्यात व्यस्त आहेत. यात गावात गत तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळाले नाही, याची कुणाला खंतही नसल्याचे दिसून आले आहे. २० हजार लोकसंख्या असलेल्या या शहरातील नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहे. येथील पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुरूस्तीकरिता केवळ दहा मिनिटांचा कालावधी लागत असून नगर पंचायत प्रशासन दुरुस्तीकरिता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरात शनिवारी कसाबसा पाणीपुरवठा झाला. त्याचदिवशी ममदापूर गावाजवळ लोखंडी पाईप गंजल्यामुळे फुटला. त्याला वेल्डींग करण्यासाठी अवघ्या दहा मिनीटांचा अवधी पाहिजे; मात्र यासाठी प्रशासकाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न पाहून प्रशासक तहसीलदार सीमा गजभिये यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तरी देखील दुरुस्तीकडे डोळेझाक केल्या जात आहे. सध्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून नगरपंचायतीला पाणीपुरवठा सुरू आहे. त्याच्या करापोटी ३८ लक्ष रुपयांचे देयक थकित असल्यामुळे पाणीपुरवठा बंद केल्याची चर्चा आहे.पाण्याकरिता येथील नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. भर हिवाळ्याच्या दिवसात ही वेळ आली आहे. यामुळे नगर पंचायतीच्या निवडणुकीनंतर नेमकी काय स्थिती येथील नागरिकांवर ओढवेल या बाबत दबक्या आवाजात चर्चा करताना सुरू आहे. नागरिकांच्या वाढत्या समस्यांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.याप्रकरणी माजी आमदार दादाराव केचे यांनी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फुटलेल्या भागाची पाहणी केली. पाईपलाईन तात्काळ दुरूस्त करून नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. माजी सरपंच सौदानसिंग टाँक यांनी प्रशासक गजभिये यांची भेट घेवून पाईपलाईनचे काम दोन तासात दुरुस्त होणे शक्य असून त्याकरिता २० हजारांचा खर्च असल्याचे सांगितले. मात्र प्रशासकांनी दीड लाखाचे ईस्टीमेट बनविले असून दुरुस्तीसाठी सांगतो अशी भूमिका घेतल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाचे अधिकारी शासनालाच चुणा लावत असल्याचा आरोप टाँक यांनी यावेळी केला. निवडणूक प्रचारामध्ये उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहे; परंतु बंद असलेला पाणीपुरवठ्याचा मुद्दा एकानेही रेटून धरला नाही, हे विशेष. याकडे लक्ष देण्याची गरज वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)