शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
4
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
5
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
6
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
9
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
10
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
11
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
12
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
13
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
14
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
15
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
16
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
17
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
18
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
19
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
20
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 

विरईत दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प

By admin | Updated: December 18, 2014 22:52 IST

विरई येथे पाणी समस्या गंभीर असून पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विरईत पाच वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वित केली होती.

भेजगाव : विरई येथे पाणी समस्या गंभीर असून पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे. विरईत पाच वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वित केली होती. परंतु ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वीज देयक थकित राहिले. वीज देयकाच्या थकित रकमेमुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा दहा दिवसांपूर्वीपासून बंद केला आहे. त्यामुळे विरईवासीयांचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून परिसरातील बोरचांदली व १९ गावांकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विरईत पाणी पुरवठा सुरू झाला. अन् विरईची जनता सुखावली. मात्र अल्पावधीतच या योजनेने रंग बदलविणे सुरू केले. त्यामुळे विरईत पाणी प्रश्न पेटला. या योजनेचे पाणी वाटपाचे काम कंत्राटारामार्फत चालत असल्याचे समजते. ठेकेदाराच्या कामचुकार व पैसे खाऊ धोरणामुळे विरईत चार दिवसा आड पाणी पुरवठा केला जातो. परंतु तिथेही मुबलक पाणी पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य ठिकाणापासून विरई गाव अगदी जवळ आहे. विरईत जर अशी स्थिती असेल तर उर्वरित गावाची काय अवस्था असेल. गावातील नागरिकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व पाणी पुरवठा कंत्राटदारांना माहिती दिली. परंतु यांचा काहीही उपयोग झालेला नाही. अधिकारी व कंत्रादार आपण नियमित पाणी पुरवठा करत असल्याचा आव आणून मूग गिळून गप्प बसले आहेत.गावातील हातपंपाची व विहिरीची पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंपाचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे महिलांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हिवाळ्यातच ही स्थिती आहे तर पुढे उन्हाळ्यात परिस्थिती कशी असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे शासनाच्या पाणी पुरवठा विभाग व जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)