शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चंद्रपूरकरांना दररोज पाणी पुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:47 IST

मागील तीन महिन्यांपासून इरई धरणाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मनपा देत आहेत. परंतु आता इरई धरणातील पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना दररोज पाणी द्या, अशा मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशहर काँग्रेस कमिटीची मागणी : महानगर पालिका आयुक्तांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील तीन महिन्यांपासून इरई धरणाला पाणी नसल्यामुळे नागरिकांना एक दिवसाआड पाणी मनपा देत आहेत. परंतु आता इरई धरणातील पाण्याची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना दररोज पाणी द्या, अशा मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.मागील वर्षीच्या साठ्यापेक्षा यावर्षी इरई धरणात जास्त जलसाठा झाला आहे. परंतु अद्यापही महापालिकेकडून नागरिकांना रोज सुरळीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करीत नाही. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे. आणि त्यांच्यावर दोषारोपण होत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता धरणावरील फिल्टर पंपमध्ये ३ आणि दाताळा येथे एक असे ४ पंप बसवायचे आहे. हे काम युध्द पातळीवर सुरू आहे. म्हणून आम्ही दररोज पाणी पुरवठा करू शकत नाही, असे सांगण्यात आले. येत्या १० दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करू, असेही सांगण्यात आले. दहा दिवसात चंद्रपूर शहराला नियमित पाणी दिले नाही तर चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, नगरसेविका सुनिता लोढीया, बंडोपंत तातावार व असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल सुरपम, माजी नगरसेविका वंदना भागवत, हरीदास डाखरे, राजेंद्र आत्राम, कुमार स्वामी, पोजलवार आदी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त संजय काकडे यांनी निवेदन देणाºया शिष्टमंडळाशी चर्चा करून लवकरच चंद्रपूरकरांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन दिले.