शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

२०० गावांचा पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:23 IST

जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची देयके थकीत : जि.प.चे दुर्लक्ष

शशीकांत गणवीर ।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभालची जबाबदारी कंत्राटदारांकडे देण्यात आली. करारानुसार या योजनेची मूदत ३१ मार्च २०१८ ला संपूनही मुदतवाढ देण्यात आली नाही.तेव्हापासून कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता सुरू आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार उन्हाळा व पाणी टंचाई लक्षात घेऊन कंत्राटदारांनी आजपर्यंत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत चालु ठेवला. मात्र सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांतील सर्व प्रादेशिक योजनांची अंतिम देयके कंत्राटदारांना अजूनपर्यंत देण्यात आले नाही.कंत्राटदारांनी केला होता पाठपुरावायाबाबत कंत्राटदारांनी जिल्हा परिषदचे पदाधिकारी व संबंधित विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार केला होता. मात्र या पत्रांचा काहीही उपयोग झाला नाही. पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाकपणा केला. त्यामुळे कंत्राटदारांकडे कार्यरत असणाºया कामगारांचे वेतन, ब्लिचिंग पावडर खरेदी करणे, पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरूस्तीचा खर्च कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला. या गंभीर प्रश्नाकडे जि. प. ने दुर्लक्ष केल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.३५ योजनाही बंदजिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता दोनशे गावांकरिता जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या ३५ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांची देखभाल दुरूस्ती, ब्लिचिंग टाकणे, कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतकडे पाणीकर थकित असल्यामुळे अडचण निर्माण होत आहेत. निधी नसल्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाही. निधीची तरतूद करून सर्व गावांचा पाणी पुरवठा सुरू होईल, यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे.-टी. सी. पिपरे, कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प. चंद्रपूर