शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२०० गावांचा पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:23 IST

जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींची देयके थकीत : जि.प.चे दुर्लक्ष

शशीकांत गणवीर ।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : जानेवारी महिन्यापासून कंत्राटदारांच्या कोट्यवधी रूपयांचे देयक अदा करण्यासाठी जि.प.ने निष्क्रीयता दाखविली. परिणामी आर्थिकदृष्ट्या हैराण झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद केला आहे. कंत्राटदारांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील तब्बल दोनशे गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील ३५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभालची जबाबदारी कंत्राटदारांकडे देण्यात आली. करारानुसार या योजनेची मूदत ३१ मार्च २०१८ ला संपूनही मुदतवाढ देण्यात आली नाही.तेव्हापासून कंत्राटदारांमध्ये अस्वस्थता सुरू आहे. दरम्यान, विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार उन्हाळा व पाणी टंचाई लक्षात घेऊन कंत्राटदारांनी आजपर्यंत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत चालु ठेवला. मात्र सन २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांतील सर्व प्रादेशिक योजनांची अंतिम देयके कंत्राटदारांना अजूनपर्यंत देण्यात आले नाही.कंत्राटदारांनी केला होता पाठपुरावायाबाबत कंत्राटदारांनी जिल्हा परिषदचे पदाधिकारी व संबंधित विभागाकडे वारंवार पत्र व्यवहार केला होता. मात्र या पत्रांचा काहीही उपयोग झाला नाही. पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाकपणा केला. त्यामुळे कंत्राटदारांकडे कार्यरत असणाºया कामगारांचे वेतन, ब्लिचिंग पावडर खरेदी करणे, पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरूस्तीचा खर्च कसा करावा, हा प्रश्न उभा ठाकला. या गंभीर प्रश्नाकडे जि. प. ने दुर्लक्ष केल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी सोमवारपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला.३५ योजनाही बंदजिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता दोनशे गावांकरिता जिल्हा परिषदअंतर्गत प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या ३५ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांची देखभाल दुरूस्ती, ब्लिचिंग टाकणे, कामगारांना वेतन देण्याची जबाबदारी कंत्राटदारांकडे सोपविण्यात आली.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतकडे पाणीकर थकित असल्यामुळे अडचण निर्माण होत आहेत. निधी नसल्यामुळे कंत्राटदारांची देयके अदा करण्यात आली नाही. निधीची तरतूद करून सर्व गावांचा पाणी पुरवठा सुरू होईल, यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे.-टी. सी. पिपरे, कार्यकारी अभियंता,ग्रामीण पाणी पुरवठा, जि.प. चंद्रपूर