शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

हातपंप बंद पडल्याने पाटण परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:49 IST

महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दुरूस्ती पथकाची प्रतीक्षा, उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी महिलांची भटकंती

अनवर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : जिवती तालुक्यातील कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा या गावांतील हातपंप नादुरूस्त असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. संगमनापूर गावाला भेट दिली असता नागरिकांचे हाल दिसून आले. भीमराव मुट्टेलु, चिंनू राजू, मारोती भिमराव मुटटेलु, भीमराव बुततेलु, बापूराव भित्तेलु, महेश मुट्टेलु, मैसु मुट्टेलु, येल्ला, किसन, संतोष, देवराव राजू मुट्टेलु आदींनी गावातील जलसंकटाची माहिती दिली. सहा महिन्यांपासून हातपंप बंद असल्यामुळे हरी कुंडगिरी यांच्या खासगी विहिरीतून पाण्याची गरज भागवावी लागत असल्याचे पोलीस पाटील भीमराव मुहूलू यांनी सांगितले. परमडोली, कोठा, शंकरलोधी, लेंडीगुडा, महाराजगुडा, पद्मावती, आंतरगाव, इंदिरानगर, येसापूर, पळसगाव, नारायणगुडा, भोलापाठर, गौरी या वादग्रस्त गावांमध्येही टंचाईची चाहूल लागली आहे.विकास योजना पोहोचवाजिवती तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये विकासाच्या अनेक योजना पोहोचल्या नाही. शेतकरी आजही पारंपरिक शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत. महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाºया योजनांचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीच्या विकासासोबतच सामाजिक न्याय व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक झाले आहे.उपाययोजना करण्याची मागणीमहाराष्ट्रातील भाईपठार व कोलामगुडा येथील कुटुंबांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नापिकी व तेलंगणा सरकारच्या योजनांसाठी स्थलांतर केले. या गावांमध्येही पाणी टंचाईची चाहूल सुरू झाली. कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा येथील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी