शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

हातपंप बंद पडल्याने पाटण परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:49 IST

महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । दुरूस्ती पथकाची प्रतीक्षा, उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी महिलांची भटकंती

अनवर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : जिवती तालुक्यातील कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा या गावांतील हातपंप नादुरूस्त असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.महाराष्ट्रातील काही गावांना तेलंगणातून नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. तेलंगणातील सीमेवरील गावांमध्ये तेलंगणा सरकारकडून विकासाची कामे सुरू आहेत. वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांची विकास यंत्रणा कार्यरत असली चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. संगमनापूर गावाला भेट दिली असता नागरिकांचे हाल दिसून आले. भीमराव मुट्टेलु, चिंनू राजू, मारोती भिमराव मुटटेलु, भीमराव बुततेलु, बापूराव भित्तेलु, महेश मुट्टेलु, मैसु मुट्टेलु, येल्ला, किसन, संतोष, देवराव राजू मुट्टेलु आदींनी गावातील जलसंकटाची माहिती दिली. सहा महिन्यांपासून हातपंप बंद असल्यामुळे हरी कुंडगिरी यांच्या खासगी विहिरीतून पाण्याची गरज भागवावी लागत असल्याचे पोलीस पाटील भीमराव मुहूलू यांनी सांगितले. परमडोली, कोठा, शंकरलोधी, लेंडीगुडा, महाराजगुडा, पद्मावती, आंतरगाव, इंदिरानगर, येसापूर, पळसगाव, नारायणगुडा, भोलापाठर, गौरी या वादग्रस्त गावांमध्येही टंचाईची चाहूल लागली आहे.विकास योजना पोहोचवाजिवती तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये विकासाच्या अनेक योजना पोहोचल्या नाही. शेतकरी आजही पारंपरिक शेती करून उदरनिर्वाह करीत आहेत. महिला व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणाºया योजनांचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीच्या विकासासोबतच सामाजिक न्याय व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक झाले आहे.उपाययोजना करण्याची मागणीमहाराष्ट्रातील भाईपठार व कोलामगुडा येथील कुटुंबांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नापिकी व तेलंगणा सरकारच्या योजनांसाठी स्थलांतर केले. या गावांमध्येही पाणी टंचाईची चाहूल सुरू झाली. कामतगुडा, सिंगरेगोंदी, लखमापूर, शंकरपठार, सांगनापूर, पोचीगुड, चौपणगुडा येथील हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणी